शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

सिंचन तलाव ठरला पांढरा हत्ती

By admin | Updated: September 15, 2016 01:21 IST

शेतात सिंचन करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी, यासाठी उत्तरवाढोणा येथे निर्माण करण्यात आलेला सिंचन तलाव पांढरा हत्ती ठरत आहे.

जागोजागी लिकेज : उत्तरवाढोणा परिसरातील सिंचन थांबले, तक्रारी व सूचनांकडे दुर्लक्षपांडुरंग भोयर सोनखासशेतात सिंचन करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी, यासाठी उत्तरवाढोणा येथे निर्माण करण्यात आलेला सिंचन तलाव पांढरा हत्ती ठरत आहे. जागोजागी लिकेज असल्याने या तलावात पाणी थांबत नाही. या पावसाळ्यात हा तलाव ओव्हर फ्लो झाला. मात्र त्यातील अर्धेअधिक पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मूळ उद्देशाला मूठमाती मिळत आहे. सिंचन विभागाने १९७२-७३ मध्ये नऊ हेक्टर तलावाची निर्मिती केली. शेतकऱ्यांना या तलावाचे पाणी घेता यावे यासाठी कालवे काढण्यात आले. काही वर्षांपर्यंत सुस्थितीत राहिलेले हे कालवे पूर्णत: बुजले. तसेच अनेक ठिकाणी कालव्यावर बांधण्यात आलेले सिमेंट पूलही खचले. तलावाची भिंतही लिकेज आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी घेण्यापासून वंचित राहात आहे.या पावसाळ्यात सदर तलाव ओव्हर फ्लो झाला होता. मात्र सद्यस्थितीत या प्रकल्पामध्ये केवळ ५० टक्के पाणी आहे. तलावाच्या दुरावस्थेविषयी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचन उपविभाग दारव्हा तसेच या विभागाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. शेतकरी तथा माजी सरपंच रामूजी चावरे यांनी हा प्रश्न सदर विभागाकडे मांडला. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. गाळाने बुजलेला आणि दुरुस्तीवर आलेला हा तलाव उपयोगात यावा यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. सदर प्रकल्पाच्या आधारे अनेक शेतकरी बारमाही पीक घेत होते. यासाठी विविध साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली होती. यावर लाखो रुपये खर्च त्यांनी केला. आता मात्र पाणी उपलब्ध होत नसल्याने या वस्तू अडगळीत पडलेल्या आहेत. सदर सिंचन प्रकल्पाची दुरुस्ती झाल्यास अनेक शेतकरी त्याद्वारे सिंचन करू शकतात. यासाठी संबंधितांकडून प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.दीड लाख मत्स्यबीज धोक्यातउत्तरवाढोणा सिंचन तलाव मत्स्य व्यवसायासाठी भारतीबाबा मत्स्य व्यवसाय संस्थेला पाच वर्षांसाठी देण्यात आला आहे. या तलावात संस्थेने एक लाख ५० हजार बोटुकले आणि मत्स्य जिरा टाकल्या आहे. परंतु तलावातून पाणी वाहून जात आहे. लवकरच तलाव कोरडा पडण्याची शक्यता असल्याने मत्स्यबीज धोक्यात येण्याची भीती आहे. भारतीबाबा मत्स्य व्यवसाय संस्थेने पाच वर्षांपूर्वीही सदर तलावाच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. त्यावेळी सिंचन उपविभागाने पाहणी केली. पण, दुरुस्तीसाठी उपाययोजना केल्या नाहीत.