शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन तलाव ठरला पांढरा हत्ती

By admin | Updated: September 15, 2016 01:21 IST

शेतात सिंचन करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी, यासाठी उत्तरवाढोणा येथे निर्माण करण्यात आलेला सिंचन तलाव पांढरा हत्ती ठरत आहे.

जागोजागी लिकेज : उत्तरवाढोणा परिसरातील सिंचन थांबले, तक्रारी व सूचनांकडे दुर्लक्षपांडुरंग भोयर सोनखासशेतात सिंचन करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी, यासाठी उत्तरवाढोणा येथे निर्माण करण्यात आलेला सिंचन तलाव पांढरा हत्ती ठरत आहे. जागोजागी लिकेज असल्याने या तलावात पाणी थांबत नाही. या पावसाळ्यात हा तलाव ओव्हर फ्लो झाला. मात्र त्यातील अर्धेअधिक पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मूळ उद्देशाला मूठमाती मिळत आहे. सिंचन विभागाने १९७२-७३ मध्ये नऊ हेक्टर तलावाची निर्मिती केली. शेतकऱ्यांना या तलावाचे पाणी घेता यावे यासाठी कालवे काढण्यात आले. काही वर्षांपर्यंत सुस्थितीत राहिलेले हे कालवे पूर्णत: बुजले. तसेच अनेक ठिकाणी कालव्यावर बांधण्यात आलेले सिमेंट पूलही खचले. तलावाची भिंतही लिकेज आहे. या सर्व कारणांमुळे शेतकरी या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी घेण्यापासून वंचित राहात आहे.या पावसाळ्यात सदर तलाव ओव्हर फ्लो झाला होता. मात्र सद्यस्थितीत या प्रकल्पामध्ये केवळ ५० टक्के पाणी आहे. तलावाच्या दुरावस्थेविषयी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सिंचन उपविभाग दारव्हा तसेच या विभागाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. शेतकरी तथा माजी सरपंच रामूजी चावरे यांनी हा प्रश्न सदर विभागाकडे मांडला. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. गाळाने बुजलेला आणि दुरुस्तीवर आलेला हा तलाव उपयोगात यावा यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. सदर प्रकल्पाच्या आधारे अनेक शेतकरी बारमाही पीक घेत होते. यासाठी विविध साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली होती. यावर लाखो रुपये खर्च त्यांनी केला. आता मात्र पाणी उपलब्ध होत नसल्याने या वस्तू अडगळीत पडलेल्या आहेत. सदर सिंचन प्रकल्पाची दुरुस्ती झाल्यास अनेक शेतकरी त्याद्वारे सिंचन करू शकतात. यासाठी संबंधितांकडून प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.दीड लाख मत्स्यबीज धोक्यातउत्तरवाढोणा सिंचन तलाव मत्स्य व्यवसायासाठी भारतीबाबा मत्स्य व्यवसाय संस्थेला पाच वर्षांसाठी देण्यात आला आहे. या तलावात संस्थेने एक लाख ५० हजार बोटुकले आणि मत्स्य जिरा टाकल्या आहे. परंतु तलावातून पाणी वाहून जात आहे. लवकरच तलाव कोरडा पडण्याची शक्यता असल्याने मत्स्यबीज धोक्यात येण्याची भीती आहे. भारतीबाबा मत्स्य व्यवसाय संस्थेने पाच वर्षांपूर्वीही सदर तलावाच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. त्यावेळी सिंचन उपविभागाने पाहणी केली. पण, दुरुस्तीसाठी उपाययोजना केल्या नाहीत.