शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

बंद साखर कारखान्यांची चाके पुन्हा फिरणार

By admin | Updated: June 20, 2014 00:07 IST

विविध कारणांंनी अवसायनात निघालेल्या गुंज येथील सुधाकरराव नाईक आणि बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक झाली

रितेश पुरोहित - महागाव विविध कारणांंनी अवसायनात निघालेल्या गुंज येथील सुधाकरराव नाईक आणि बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक झाली असून दीर्घ मुदती भाडे तत्वावर साखर कारखाने देण्याची तयारी सुरू आहे. लवकरच दोनही कारखान्यांच्या चिमण्यातून धूर निघण्याची आशा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहकारातील साखर कारखान्यांना घरघर लागली असून पोफाळी येथील वसंत साखर कारखाना वगळता सर्वच कारखाने बंद पडले आहे. महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक साखर कारखाना आणि बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला. काही वर्षापूर्वी या दोनही साखर कारखान्यांना वारणा समूहाने भाडे तत्वावर घेतले. मात्र दोन वर्षांपासून सुधाकरराव नाईक साखर कारखाना आणि तीन वर्षांपासून जयकिसान साखर कारखाना बंद पडला आहे. शेतकऱ्यांची कामधेनू बंद पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. कर्मचारी देशोधडीला लागले आहे. आता दोनही कारखाने सुरू करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहे. साखर कारखाना सुरू करण्यासाठी मंत्रालयात १३ जून रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, वारणा समूहाचे विनय कोरे, आमदार विजय खडसे, राज्य बँकेचे प्रशासक अग्रवाल उपस्थित होते. या बैठकीत कारखाना दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देऊन सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली. याच बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार सहकार सचिव राजगोपाल देवरा, साखर आयुक्त विजय सिंघल, प्रादेशिक सहसंचालक शशी घोरपडे, सुधाकरराव नाईक साखर कारखान्याचे अवसायक जी.एन. नाईक, जयकिसानचे अवसायक सुनील भालेराव, मुख्य सहायक यु.एन. वानखडे यांची १६ जून रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत दोनही कारखान्याचे शासकीय देणे, बँकांचे देणे, व्यापारी, शेतकरी आणि मजुरांचे देणे याचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच भाडेतत्वावर कारखाना देण्यासंदर्भात एक अहवाल सहकार सचिवांना सादर करण्यात आला. यावरून राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून त्याला मंजुरी मिळण्याची आशा आहे. मुख्यमंत्री कारखान्यांबाबत सकारात्मक असल्याने दोनही कारखाने सुरू होण्याची चिन्हे आहे.सुधाकरराव नाईक आणि जयकिसान साखर कारखान्याकडे प्रत्येकी १०० कोटींच्या आसपास कर्ज आहे. शासकीय कर्ज माफ करण्याच्या हालचाली असून खासगी देण्यासाठी दीर्घ मुदती वेळ मिळू शकते. तसेच हा साखर कारखाना भाडे तत्वावर दिल्यास त्यांच्याकडूनही कर्जासाठी वसुली केली जाऊ शकते. विशेष म्हणजे वारणा समूहाने दोनही साखर कारखाने भाडे तत्वावर घेतले होते. त्यामुळे याच समूहाला साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोनही साखर कारखाने सुरू करण्यासाठी पंजाबराव देशमुख खडकेकर गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्नात आहे. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांनी यासाठी प्रयत्न केले.