शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बंद साखर कारखान्यांची चाके पुन्हा फिरणार

By admin | Updated: June 20, 2014 00:07 IST

विविध कारणांंनी अवसायनात निघालेल्या गुंज येथील सुधाकरराव नाईक आणि बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक झाली

रितेश पुरोहित - महागाव विविध कारणांंनी अवसायनात निघालेल्या गुंज येथील सुधाकरराव नाईक आणि बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर बैठक झाली असून दीर्घ मुदती भाडे तत्वावर साखर कारखाने देण्याची तयारी सुरू आहे. लवकरच दोनही कारखान्यांच्या चिमण्यातून धूर निघण्याची आशा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहकारातील साखर कारखान्यांना घरघर लागली असून पोफाळी येथील वसंत साखर कारखाना वगळता सर्वच कारखाने बंद पडले आहे. महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक साखर कारखाना आणि बोदेगाव येथील जयकिसान सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला. काही वर्षापूर्वी या दोनही साखर कारखान्यांना वारणा समूहाने भाडे तत्वावर घेतले. मात्र दोन वर्षांपासून सुधाकरराव नाईक साखर कारखाना आणि तीन वर्षांपासून जयकिसान साखर कारखाना बंद पडला आहे. शेतकऱ्यांची कामधेनू बंद पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. कर्मचारी देशोधडीला लागले आहे. आता दोनही कारखाने सुरू करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहे. साखर कारखाना सुरू करण्यासाठी मंत्रालयात १३ जून रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, वारणा समूहाचे विनय कोरे, आमदार विजय खडसे, राज्य बँकेचे प्रशासक अग्रवाल उपस्थित होते. या बैठकीत कारखाना दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देऊन सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली. याच बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार सहकार सचिव राजगोपाल देवरा, साखर आयुक्त विजय सिंघल, प्रादेशिक सहसंचालक शशी घोरपडे, सुधाकरराव नाईक साखर कारखान्याचे अवसायक जी.एन. नाईक, जयकिसानचे अवसायक सुनील भालेराव, मुख्य सहायक यु.एन. वानखडे यांची १६ जून रोजी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत दोनही कारखान्याचे शासकीय देणे, बँकांचे देणे, व्यापारी, शेतकरी आणि मजुरांचे देणे याचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच भाडेतत्वावर कारखाना देण्यासंदर्भात एक अहवाल सहकार सचिवांना सादर करण्यात आला. यावरून राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून त्याला मंजुरी मिळण्याची आशा आहे. मुख्यमंत्री कारखान्यांबाबत सकारात्मक असल्याने दोनही कारखाने सुरू होण्याची चिन्हे आहे.सुधाकरराव नाईक आणि जयकिसान साखर कारखान्याकडे प्रत्येकी १०० कोटींच्या आसपास कर्ज आहे. शासकीय कर्ज माफ करण्याच्या हालचाली असून खासगी देण्यासाठी दीर्घ मुदती वेळ मिळू शकते. तसेच हा साखर कारखाना भाडे तत्वावर दिल्यास त्यांच्याकडूनही कर्जासाठी वसुली केली जाऊ शकते. विशेष म्हणजे वारणा समूहाने दोनही साखर कारखाने भाडे तत्वावर घेतले होते. त्यामुळे याच समूहाला साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोनही साखर कारखाने सुरू करण्यासाठी पंजाबराव देशमुख खडकेकर गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्नात आहे. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांनी यासाठी प्रयत्न केले.