शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

दारू-जुगारावर लोकप्रतिनिधी गप्प का?

By admin | Updated: April 7, 2015 01:47 IST

जिल्ह्यात दारू, जुगार व अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पोलिसांच्या मूकसंमतीने ते सुरू असले तरी

संघटित गुन्हेगारीला रसद : टोळ्यांमध्ये युद्ध पेटण्याची भीती, लाभार्थ्यांची संख्या मोठीयवतमाळ : जिल्ह्यात दारू, जुगार व अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पोलिसांच्या मूकसंमतीने ते सुरू असले तरी सत्ताधारी लोकप्रतिनिधींनाही त्याबाबत कोणताच आक्षेप नसल्याचे दिसून येते. कारण या धंद्यांबाबत आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने ब्र सुद्धा काढला नाही. हे लोकप्रतिनिधी मूग ‘गिळून’ असल्याने आता दाद कुणाला मागावी, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. प्रशासनावर वचक ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आहे. त्यासाठीच जनता आपल्या पसंतीनुसार त्यांना निवडून देते. मात्र जेथे लोकप्रतिनिधीच प्रशासनाच्या पाठिशी अवैध कामांसाठी अप्रत्यक्ष उभे राहात असेल तेथे जनतेने कुणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न निर्माण होतो. यवतमाळ जिल्ह्यात चहुबाजूने दारू, जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थांची विक्री, चोरीतील साहित्याची नाममात्र रकमेत खुलेआम खरेदी, अवैध सावकारी यासारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात सुरू असलेले हे धंदे भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये नियंत्रणात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात युती शासनात या धंद्यांनाच व ते बंद करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाला अभय मिळाल्याने हे धंदे आणखी फोफावले. आघाडीच्या तुलनेत युतीच्या काळात या धंद्यांची संख्या दुप्पट झाली. आघाडीत हे धंदे चोरून-लपून चालविले जात होते. त्यामुळे पोलिसांची काहीतरी भीती शिल्लक आहे, असे वाटत होते. मात्र आजच्या घडीला हे सर्व धंदे अगदी रस्त्यावर आले आहेत. शहरात कुठे अवैध धंदा सुरू आहे, याची माहिती लहान मुलगाही देवू शकेल, अशी स्थिती आहे. विशेष असे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील विदर्भातील, अमरावती परिक्षेत्रातील असूनही हे धंदे नियंत्रित होण्याऐवजी आणखी वाढले. अवैध धंद्यांची संख्या दुप्पट होण्यामागेसुद्धा ‘राजकारण’ आहे. या धंद्याचे ‘वाटेकरी’ केवळ खाकी वर्तुळातच नव्हे तर राजकीय पटलावरील पांढऱ्या पोषाखातही असल्याचे सांगितले जाते. अवैध धंद्यांमुळे शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. कारण शहरातील संघटित गुन्हेगारीला या धंद्यांमधून ‘रसद’ मिळत आहे. भविष्यात गुन्हेगारी टोळ्यांमध्ये त्यातूनच युद्ध पेटण्याचीही भीती व्यक्त होत आहे. या धंद्यांवर अंकुश लावण्यात पोलीस अपयशी ठरले असूनही लोकप्रतिनिधी त्यांना जाब विचारण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधींनी या अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांनाच पाठबळ देत असल्याचे दिसून येते. कारण जिल्हाभरात सत्ताधारी पक्षाचा कुणीही लोकप्रतिनिधी अवैध धंदे वाढले म्हणून ब्र सुद्धा काढण्यास तयार नाही. त्यामुळे या लोकप्रतिनिधींचे पोलिसांच्या आडोशाने अप्रत्यक्ष अवैध धंद्यांनाही संरक्षण मिळते आहे. पोलिसांकडून अनेकदा ‘मॅनेज’ धाड घालून कारवाईची खानापूर्ती केली जाते. जिल्हा पोलिसांवर महानिरीक्षकांचा वॉच असतो. मात्र येथे महानिरीक्षकच प्रभारी आहेत. सेवानिवृत्ती तोंडावर असल्याने तेही आहे तसे चालू द्या, अशा मानसिकतेत असल्याचे निदर्शनास येते. (जिल्हाप्रतिनिधी)पोलिसांची पकड सैल, गुन्हेगारी वाढली, डिटेक्शन मंदावलेपोलिसांची जिल्ह्यात पकड सैल झाल्याचे दिसते. त्यामुळेच चोऱ्या वाढणे, डिटेक्शन नसणे, धंदे खुलेआम चालणे, कुणीही कुणाला न घाबरणे, पोलिसांचा वचक नसणे हे प्रकार सुरू आहेत. ज्या पक्षाकडे गृहखाते आहे त्याच पक्षाचे एक नव्हे तब्बल पाच आमदार जिल्ह्यात आहे. मात्र कुणीही काहीच बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या ‘चुप्पी’चे रहस्य मात्र गुलदस्त्यात आहे.मोक्याच्या ठिकाणी खुलेआम मटका-जुगारकॉटन मार्केट चौक, अप्सरा टॉकीज परिसर, छोटी गुजरी, आठवडी बाजार, पोलीस मुख्यालय परिसर, आर्णी रोड, दारव्हा रोड, रेल्वे स्टेशन आदी मोक्याच्या ठिकाणी मटका जुगार चालविला जात आहे. कॉटन मार्केटच्या अड्ड्याला पानठेल्याचा आडोसा दिला गेला आहे. या अड्ड्याचे दररोज ८०० ते हजार रुपये भाडे वसूल केले जाते.