शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नव्या वसाहतीमधील विहिरी ‘मौत का कुआँ’

By admin | Updated: May 13, 2017 00:25 IST

शहराच्या चोहोबाजूंनी नव्या वसाहती विस्तारल्या आहेत. मात्र, ले-आऊट पडण्यापूर्वीपासून या भागात असलेल्या अनेक विहिरी आज बेवारस आहेत.

मृतदेहांमुळे पिण्याच्या पाण्याचे वांदे : कठडे बसविण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराच्या चोहोबाजूंनी नव्या वसाहती विस्तारल्या आहेत. मात्र, ले-आऊट पडण्यापूर्वीपासून या भागात असलेल्या अनेक विहिरी आज बेवारस आहेत. त्यामुळे विहिरीत पडून प्राणी दगावण्याचे प्रकार घडत आहेत. लोहारा परिसरात तर चक्क खुनातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अशा विहिरीचा वापर करण्यात आला. त्यामुळे ‘मौत का कुआं’ ठरत असलेल्या या विहिरींवर लोखंडी कठडे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. लोहारा, उमरसरा, भोसा, पिंपळगाव आदी परिसरातील खुल्या भूखंडांवर अनेक विहिरी आहेत. ले-आऊट पडण्यापूर्वी असलेल्या यातील बहुतांश विहिरी आजही बेवारस स्थितीत आहेत. काहींना भरपूर पाणी आहे, तर काही कोरड्याठाक आहेत. मात्र या दोन्ही प्रकारच्या विहिरी जिवितहानीसाठी निमंत्रण ठरत आहेत. अनेक विहिरी भूपृष्ठाशी समतल आहेत. त्याच बाजूने ‘ओपन स्पेस’ असल्याने बहुतांश नव्या वसाहतींमधील मुले अशा विहिरींच्या आसपास खेळताना दिसतात. मोकाट जनावरे विहिरीत पडून दगावण्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. भोसा परिसरातील विहिरीत डुक्कर पडून दगावल्याची घटना ताजी आहे. ते डुक्कर काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. लोहाराच्या सानेगुरुजी नगरातील विहिरींमध्ये तर चार महिन्यांच्या कालावधीत दोन मानवी मृतदेहच सापडले. लोहारातील तरुणाचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याला अर्धवट जाळण्यात आले आणि विल्हेवाट लावण्यासाठी रात्रीतून आरोपींनी हा मृतदेह विहिरीत आणून टाकला. विशेष म्हणजे, याच विहिरीतून पाच ते सहा घरांमध्ये पिण्याचे पाणी वापरले जाते. मृतदेह विहिरीत असताना तब्बल दोन दिवस नागरिकांनी पाणी पिले. घटना उघडकीस आल्यावर त्यांच्या मनावर काय बेतली, याची काळजी प्रशासनाने केली नाही. याच भागातील दुसऱ्या एका विहिरीत लोहाऱ्यातीलच एका अल्पवयीन मुलाने रात्रीदरम्यान आत्महत्या केली. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत विहिरीतच होता. सानेगुरुजी नगराच्या प्रवेशद्वारातच अत्यंत मोठ्या गाल्याची विहिरी कठड्याविना आहे. भरपूर पाणी असलेल्या या विहिरीतही दुर्दैवी घटना घडल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे वांदे होण्याची शक्यता आहे. नव्या वसाहतींमधील मोकळ्या विहिरींवर लोखंडी कठडे बसविण्याची मागणी आहे. बोअरवेल खुल्याच पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नव्या वसाहतींमध्ये भरमसाठ बोअरवेल केल्या जात आहेत. मात्र, त्यातील मोजक्याच बोअरवेलला पाणी लागत असून इतर व्यर्थ ठरत आहे. मात्र एकदा खोदलेली ही बोअरवेल बुजविण्याचे कष्ट कोणीही घेताना दिसत नाही. अशा बोअरवेलचे तोंड बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.