शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

नव्या वसाहतीमधील विहिरी ‘मौत का कुआँ’

By admin | Updated: May 13, 2017 00:25 IST

शहराच्या चोहोबाजूंनी नव्या वसाहती विस्तारल्या आहेत. मात्र, ले-आऊट पडण्यापूर्वीपासून या भागात असलेल्या अनेक विहिरी आज बेवारस आहेत.

मृतदेहांमुळे पिण्याच्या पाण्याचे वांदे : कठडे बसविण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराच्या चोहोबाजूंनी नव्या वसाहती विस्तारल्या आहेत. मात्र, ले-आऊट पडण्यापूर्वीपासून या भागात असलेल्या अनेक विहिरी आज बेवारस आहेत. त्यामुळे विहिरीत पडून प्राणी दगावण्याचे प्रकार घडत आहेत. लोहारा परिसरात तर चक्क खुनातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अशा विहिरीचा वापर करण्यात आला. त्यामुळे ‘मौत का कुआं’ ठरत असलेल्या या विहिरींवर लोखंडी कठडे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. लोहारा, उमरसरा, भोसा, पिंपळगाव आदी परिसरातील खुल्या भूखंडांवर अनेक विहिरी आहेत. ले-आऊट पडण्यापूर्वी असलेल्या यातील बहुतांश विहिरी आजही बेवारस स्थितीत आहेत. काहींना भरपूर पाणी आहे, तर काही कोरड्याठाक आहेत. मात्र या दोन्ही प्रकारच्या विहिरी जिवितहानीसाठी निमंत्रण ठरत आहेत. अनेक विहिरी भूपृष्ठाशी समतल आहेत. त्याच बाजूने ‘ओपन स्पेस’ असल्याने बहुतांश नव्या वसाहतींमधील मुले अशा विहिरींच्या आसपास खेळताना दिसतात. मोकाट जनावरे विहिरीत पडून दगावण्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. भोसा परिसरातील विहिरीत डुक्कर पडून दगावल्याची घटना ताजी आहे. ते डुक्कर काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. लोहाराच्या सानेगुरुजी नगरातील विहिरींमध्ये तर चार महिन्यांच्या कालावधीत दोन मानवी मृतदेहच सापडले. लोहारातील तरुणाचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याला अर्धवट जाळण्यात आले आणि विल्हेवाट लावण्यासाठी रात्रीतून आरोपींनी हा मृतदेह विहिरीत आणून टाकला. विशेष म्हणजे, याच विहिरीतून पाच ते सहा घरांमध्ये पिण्याचे पाणी वापरले जाते. मृतदेह विहिरीत असताना तब्बल दोन दिवस नागरिकांनी पाणी पिले. घटना उघडकीस आल्यावर त्यांच्या मनावर काय बेतली, याची काळजी प्रशासनाने केली नाही. याच भागातील दुसऱ्या एका विहिरीत लोहाऱ्यातीलच एका अल्पवयीन मुलाने रात्रीदरम्यान आत्महत्या केली. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत विहिरीतच होता. सानेगुरुजी नगराच्या प्रवेशद्वारातच अत्यंत मोठ्या गाल्याची विहिरी कठड्याविना आहे. भरपूर पाणी असलेल्या या विहिरीतही दुर्दैवी घटना घडल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे वांदे होण्याची शक्यता आहे. नव्या वसाहतींमधील मोकळ्या विहिरींवर लोखंडी कठडे बसविण्याची मागणी आहे. बोअरवेल खुल्याच पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नव्या वसाहतींमध्ये भरमसाठ बोअरवेल केल्या जात आहेत. मात्र, त्यातील मोजक्याच बोअरवेलला पाणी लागत असून इतर व्यर्थ ठरत आहे. मात्र एकदा खोदलेली ही बोअरवेल बुजविण्याचे कष्ट कोणीही घेताना दिसत नाही. अशा बोअरवेलचे तोंड बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.