शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

काट्यातून आता वजनेच झाली गायब

By admin | Updated: March 14, 2015 02:24 IST

जवळपास तालुक्यातील प्रत्येक आठवडीबाजारातून वजने गायब झाली आहे. त्याऐवजी चक्क दगड, आलू, कांदे आदी जिन्नसांचा वापर वजन म्हणून केला जात आहे.

मारेगाव : जवळपास तालुक्यातील प्रत्येक आठवडीबाजारातून वजने गायब झाली आहे. त्याऐवजी चक्क दगड, आलू, कांदे आदी जिन्नसांचा वापर वजन म्हणून केला जात आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होत असतानाही वजन व मापे विभाग मात्र अद्याप निद्रावस्थेतच दिसत आहे.बाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली जाते. त्याचवेळी नकळपतणे आपली जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते, हे ग्राहकांच्या लक्षातच येत नाही. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभर पैसे कमी झाल्याचे समाधान प्राप्त होते. मात्र त्यातून आपलीच फसगत होते. आठवडीबाजारात तर सर्रास ‘दांडी’ मारण्याचा प्रकार सुरू असतो. सर्वच आठवडीबाजारात हिच स्थिती आहे. आठडीबाजारात किरकोळ व्यापारी लांबवरून जातात. त्यांना वजन व माप दर दोन वर्षातून एकदा संबंधित विभागाकडून प्रमाणित करवून घ्यावे लागते. मात्र आठवडीबाजारात जाणारे अनेक छोटे व्यापारी वजन व मापे नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी प्रमाणितच करीत नाही. संबंधित वजन मापे विभागाकडून त्यांची साधी कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता खूपच निर्ढावलेले आहेत. परिणामी ते सर्रास वस्तू मोजण्यासाठी खुलेआम दगड, बटाटे, कांदे आदींचा वापर करताना आढळून येतात.एखादवेळी वजन व मापे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आलेच तर ते अशा विक्रेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून परत जातात. त्यामुळे कायद्याची पायमल्ली सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक किरकोळ व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरतात. त्यामुळे ती अत्यंत जीर्ण होतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही कमी होते. त्याच वजन व मापांनी वस्तू तोलून ग्राहकांच्या माथी मारली जाते. ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिली, तरी त्या वस्तूचे वजन अनेकदा किलोपेक्षा कमीच असते. त्यातच आठबाजारातील काही विक्रेते ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत असतात. त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन, तर सोडाच दुसरेही पर्यायी वजन व माप नसते. वस्तू तोलताना ते प्रचंड हातसफाई करतात. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लावून हातसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो, त्या बाजूला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही, हे बघताच तराजूची दांडी वरील बाजूला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो. आठवडीबाजारातील विक्रेते अशा अनेक ‘टॅक्ट’ वापरून वजनात हेराफेरी करतात. सध्या तर बाजारात ‘डुप्लीकेट’ वजन मापेही दिसून येतात. वजनावर एक किलो असे नमूद असते, प्रत्यक्षात त्याचे वजन ८०० ग्रॅमच असते. बरेचदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक कारण असते. (शहर प्रतिनिधी)ग्राहकांची सर्रास लूटआठवडीबाजारात ग्राहकांची सर्रास लूट होते. वजन व मापे विभागाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कधी आठवडीबाजारात वजन तपासण्यासाठी आल्याचे दिसत नाहीत. जागृत ग्राहकाने वजन मापाबद्दल विक्रेत्याला विचारल्यास विक्रेते त्यांच्याशी हुज्जत घालतात. परिणामी ग्राहक नसती भानगड मागे नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावते. कायदे कठोर असले, तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही. संबंधित अधिकारी, कर्मचारी आपली सोय करवून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसतो. त्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसते. त्यांची फसवणूक अद्याप सुरूच आहे.