शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे कत्तलखान्याच्या वाटेवर

By admin | Updated: December 29, 2014 23:52 IST

नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज हजारो जनावरे हैदराबादच्या कत्तलखान्याकडे जात आहे. त्यामुळे पांढरकवड्यासह आजूबाजूच्या परिसरातील पशूधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

तस्करीसाठी महामार्गाचा वापर : पशुधन नष्ट होण्याच्या मार्गावरनरेश मानकर - पांढरकवडानागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज हजारो जनावरे हैदराबादच्या कत्तलखान्याकडे जात आहे. त्यामुळे पांढरकवड्यासह आजूबाजूच्या परिसरातील पशूधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. खुलेआम जनावरांची तस्करी होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रखरखत्या उन्हात पाण्याची व वैरणाची समस्या भेडसावत असल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेले शेतकरी आपल्या जनावरांना कवडीमोल भावाने विकण्यास बाध्य झाले आहे. याचाच लाभ कसायांनी घेतला आहे. कसायी खेडोपाडी फिरुन अत्यल्प किंमतीत शेतकऱ्यांची जनावरे विकत घेत आहे. तालुक्यात जागोजागी कत्तलखान्याशी व्यवहार करणाऱ्या कसायांचे दलाल फिरुन गरजू शेतकऱ्यांना रोख रकमेचे आमिष दाखवून जनावरांची खरेदी करतात. संपूर्ण तालुक्यात गावोगावी ही दलाल मंडळी जाऊन प्रथम कच्चा सौदा करून ठेवतात. त्यानंतर सात-आठ दिवसांनी सर्व खरेदी केलेली जनावरे एकत्र करून ते राष्ट्रीय महामार्गाने हैदराबादच्या कत्तलखान्यात नेतात. या जनावरांमध्ये वर्धा जिल्ह्यातील जनावरांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. या जिल्ह्यातील समुद्रपूर, देवळी, सेलू या भागातूनसुध्दा मोठ्या प्रमाणात जनावरे महामार्गाने हैद्राबादच्या कत्तलखान्याकडे जात असल्याचे दिसून येत आहे. कत्तलखान्याकडे जाणारी हजारो जनावरे एकाच मोठ्या दोराने बांधून नेली जातात. या जनावरांच्या चारा-पाण्याचीही काळजी घेतली जात नाही. परिणामी जनावरांचे प्रचंड हाल होतात. दलाल व व्यावसायिकांना ही जनावरे कुठे चालली ?, जनावरांचा मालक कोण ?, याबाबत विचारणा केली असता ही मंडळी सांगायलादेखील तयार होत नाही. गोहत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना त्याची अंमलबजावणीही करायला कुणी तयार नाही. त्यामुळे हजारो मुकी जनावरे नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने कत्तलखान्याकडे जात आहेत. प्रशासनाला संपूर्ण माहिती असूनही आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला कोणतीही अडचण आल्यास सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधींची मदत घ्यावयास पाहिजे. परंतु या गंभीर प्रश्नाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.