शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जलवाहिनीची आयुष्य मर्यादा संपली

By admin | Updated: August 24, 2014 23:46 IST

शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ

रूपेश उत्तरवार - यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ बदलविण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळला गेला आहे. यातून शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरात १९७२ मध्ये जलवाहिनीचे जाळे विणण्यात आले. त्यावेळी पीव्हीसी आणि सिमेंट पाईपचा वापर करण्यात आला. या जलवाहिनीची आयुष्य मर्यादा ३० वर्षे असून ती २००२ मध्येच संपली. यानंतर तब्बल १२ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र जीर्ण पाईप लाईन बदलविली नाही. नवीन पाईप लाईनसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठीचा प्रस्ताव प्राधिकरणाने राज्य शासनाकडे पाठविला. मात्र या प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नाही. तब्बल १२ वर्षानंतरही हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने जलवाहिनीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. काही भागात नालीच्या खालच्या भागात पाईप लाईन आहे. नाली फुटल्याने तेथे पाईप लाईन लिक झाल्याची गंभीर बाब शहरात उघड झाली आहे. यातून जलजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात २९ हजार ३१३ नळजोडण्या आहेत. या माध्यमातून दोन लाख ७५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. ३५० किलोमीटर जलवाहिनीचा विस्तार आहे. यासाठी बिड आणि लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आला आहे. बिडच्या पाईपची आयुष्यमर्यादा ६० वर्षांची तर लोखंडी पाईपची आयुष्य मर्यादा १०० वर्षांची आहे. पाईप लाईनचा विस्तार करताना लोखंडी पाईप आणि बिडच्या पाईपचा वापर करण्यात आला आहे. अशीच जलवाहिनी इतर भागात अपेक्षित आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. एका पाण्याच्या टाकीवरून दोन किमी अंतरापर्यंत चांगल्या पध्दतीने पाणीपुरवठा करता येतो. पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. मात्र सध्याच्या स्थितीत जुनी पाईप लाईन आहे. त्याचा आकारही लहान आहे. यावरच नवीन नळजोडण्या लावण्यात आल्या आहे. त्यातच एका टाकीवरून १२ किमी अंतरापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्याही भागात पुरेसे पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या टाक्या उभारण्याची आवश्यकता आहे. तीन नवीन टाक्यांचा प्रस्ताव प्राधिकरणाने दिला आहे. त्यावर अजूनही विचार झालेला नाही. शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी दर दिवसाला ३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवशकता आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे २७ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जलवाहिनीचा दाबाचे एक सूत्र निश्चित करण्यात आले आहे. एका मिनिटाला १२ लिटर पाणी जमा होणे अपेक्षित आहे. मात्र मर्यादित जलवाहिनीवर अतिरिक्त भार असल्याने हे सूत्र जुळतच नाही. परिणामी नागरिकांना पुरेसे आणि नियमित पाणी मिळत नसल्याचे सांगितले जाते.