शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जलवाहिनीची आयुष्य मर्यादा संपली

By admin | Updated: August 24, 2014 23:46 IST

शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ

रूपेश उत्तरवार - यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारी अनेक भागातील जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे. ८९ किलोमीटर पाईप लाईन तत्काळ बदलविण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने सादर केला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळला गेला आहे. यातून शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरात १९७२ मध्ये जलवाहिनीचे जाळे विणण्यात आले. त्यावेळी पीव्हीसी आणि सिमेंट पाईपचा वापर करण्यात आला. या जलवाहिनीची आयुष्य मर्यादा ३० वर्षे असून ती २००२ मध्येच संपली. यानंतर तब्बल १२ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र जीर्ण पाईप लाईन बदलविली नाही. नवीन पाईप लाईनसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठीचा प्रस्ताव प्राधिकरणाने राज्य शासनाकडे पाठविला. मात्र या प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नाही. तब्बल १२ वर्षानंतरही हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे. याबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने जलवाहिनीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. काही भागात नालीच्या खालच्या भागात पाईप लाईन आहे. नाली फुटल्याने तेथे पाईप लाईन लिक झाल्याची गंभीर बाब शहरात उघड झाली आहे. यातून जलजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात २९ हजार ३१३ नळजोडण्या आहेत. या माध्यमातून दोन लाख ७५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. ३५० किलोमीटर जलवाहिनीचा विस्तार आहे. यासाठी बिड आणि लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आला आहे. बिडच्या पाईपची आयुष्यमर्यादा ६० वर्षांची तर लोखंडी पाईपची आयुष्य मर्यादा १०० वर्षांची आहे. पाईप लाईनचा विस्तार करताना लोखंडी पाईप आणि बिडच्या पाईपचा वापर करण्यात आला आहे. अशीच जलवाहिनी इतर भागात अपेक्षित आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. एका पाण्याच्या टाकीवरून दोन किमी अंतरापर्यंत चांगल्या पध्दतीने पाणीपुरवठा करता येतो. पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. मात्र सध्याच्या स्थितीत जुनी पाईप लाईन आहे. त्याचा आकारही लहान आहे. यावरच नवीन नळजोडण्या लावण्यात आल्या आहे. त्यातच एका टाकीवरून १२ किमी अंतरापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्याही भागात पुरेसे पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या टाक्या उभारण्याची आवश्यकता आहे. तीन नवीन टाक्यांचा प्रस्ताव प्राधिकरणाने दिला आहे. त्यावर अजूनही विचार झालेला नाही. शहरासह लगतच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी दर दिवसाला ३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवशकता आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे २७ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जलवाहिनीचा दाबाचे एक सूत्र निश्चित करण्यात आले आहे. एका मिनिटाला १२ लिटर पाणी जमा होणे अपेक्षित आहे. मात्र मर्यादित जलवाहिनीवर अतिरिक्त भार असल्याने हे सूत्र जुळतच नाही. परिणामी नागरिकांना पुरेसे आणि नियमित पाणी मिळत नसल्याचे सांगितले जाते.