शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडात वादळी पावसाचे तांडव

By admin | Updated: May 28, 2017 00:54 IST

रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने शनिवारी सायंकाळी सर्वांचीच दाणादाण उडविली. सुसाट वादळासह आलेल्या या मुसळधार पावसाने

घरांवरील छपरे उडाली : राजूरजवळ आॅटोरिक्षा उलटला, वणी विश्रामगृहाचे छत उडाले, लाखोंचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क वणी : रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने शनिवारी सायंकाळी सर्वांचीच दाणादाण उडविली. सुसाट वादळासह आलेल्या या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरावरील छपरे उडवून नेली. वणीच्या विश्रामगृहावरील चारही खोल्यांवरची छपरे वादळाने उडून गेली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. राजूर फाट्यावर एक आॅटो उलटला. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. त्यामुळे वणी शहर व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. या वादळामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शनिवारी सायंकाळी अचानक आभाळात ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता, की या वादळादरम्यान राजूर फाट्यावर वणीकडे येणारा एक मालवाहू आॅटो उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वणी पोलीस ठाण्यातील दक्षता भवनाच्या इमारतीवर असलेले सोलर यंत्रणा खाली कोसळली. ही यंत्रणा इमारतीच्या सज्जावर कोसळल्याने सज्जाही वाकला. त्याखाली उभ्या असलेल्या दोन दुचाकींचाही यात चुराडा झाला. वणीच्या विश्रामगृहातील व्हिआयपी खोली, दोन अन्य खोल्या व भोजन कक्षावरील छप्पर उडून मागील बाजूस कोसळले. या परिसरातील एक झाडही उन्मळून पडले. वणी ग्रामीण रूग्णालयातील ट्रामा केअर रूग्णालयात मजुरांसाठी बांधण्यात आलेले टिनाचे शेड उडून गेले. वणी बसस्थानक परिसरातील दोन मोठे जाहिरातींचे फलकही कोसळले. शहरातील काही भागात विजेचे खांब वाकले. काही ठिकाणी तारा तुटल्या. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यातही वादळाने तांडव घातले. यात मोठे नुकसान झाले. वीज पुरवठ्यातील त्रुट्या दूर करण्याचे काम सुरू वादळ सुरू होताच वणी शहरातील सर्वच भागातील वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास तासभर या वादळी पावसाने तांडव घातले. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाल्याने वीज वितरणातील त्रुट्या दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती वीज वितरणचे अभियंता झाडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. रात्री ८ वाजतानंतरही अनेक भागातील वीज पुरवठा सुरू झाला नव्हता. पाऊस येऊन गेल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.