शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

व्हिटॅमिन व कॅल्शियम आयुष्याची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:32 IST

सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.

ठळक मुद्देप्रीती काबरा : सुरक्षित मातृत्व व सुदृढ बाळ हेच ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.गर्भवतीने कुठला आहार घ्यावा, उपचार आणि काय दक्षता घ्यावी याविषयी डॉ. काबरा यांनी माहिती दिली. गरोदरपणात पहिले चार महिने बाळ आकार घेते. याच काळात गर्भवतीला उलटी, मळमळ सुरू होण्यासोबतच अन्नाची वासना उडते. याच कारणाने बहुतेक गर्भवती माता महत्त्वाचे व्हिटॅमिन घेणे टाळतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही. गर्भवतीमध्ये बीपी, झटके, कमी दिवसात प्रसूती, गर्भजल कमी होणे आदी लक्षणे दिसू लागतात. गर्भस्थ शिशु कमी वजनाचे, त्याचे हाड विशेषत: लांब हाडांची उंची खुंटते, मेंदू व हृदयाचे विकार होते. प्रसूतीनंतर स्पेशल केअर युनीटला बाळ भरती करावे लागते.या सर्व बाबी टाळण्यासाठी गर्भवतीने जेवण दर दोन-तीन तासांनी घेणे, सकाळी उठल्याबरोबर भाकरी खाणे, शक्यतो तिखट, अती आंबट, तळलेले पदार्थ, ठेचा खाणे टाळणे गरजेचे आहे. सायंकाळी दूध पोळी, मुगाची खिचडी, पातळ सोजी आणि रात्री झोपताना एक बिस्कीट किंवा टोस्ट घेतल्यास उलटी, मळमळ कमी होते. पुढील पाच महिन्यात आयर्न, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे. एक लिटर चांगल्या दुधात एक ग्रॅम कॅल्शियम असते. कुठलीही गर्भवती दीड ते दोन लिटर दूध घेऊ शकत नाही आणि पचवू शकत नाही. म्हणून सोबत दिवसातून दोनवेळा कॅल्शियमची गोळी घेणे गरजेचे आहे. टाळल्यास शरीराच्या हाडातील कॅल्शियमचा ºहास होऊन कंबर, हात-पायदुखी वाढते, बीपीचा त्रास सुरू होतो.व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. हा घटक व्यवस्थित असल्यास कॅल्शियम व फॉस्फोरसची पातळी व्यवस्थित राहते. गर्भवती मातेची बीपी, बाळाची वाढ व्यवस्थित होते. कमी दिवसाचे, कमी वजनाचे बाळ आणि मातेला झटके येण्याचा प्रकार कमी असतो. या औषधी गर्भवतीने बाळाची गरज समजून घेतल्यास ऐन प्रसूतीच्यावेळी रक्ताची गरज भासणार नाही. सुरक्षित माता व सुदृढ बाळ हेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचे ध्येय आहे, असे डॉ. प्रीती काबरा यांनी म्हटले आहे.