शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

व्हिटॅमिन व कॅल्शियम आयुष्याची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:32 IST

सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.

ठळक मुद्देप्रीती काबरा : सुरक्षित मातृत्व व सुदृढ बाळ हेच ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.गर्भवतीने कुठला आहार घ्यावा, उपचार आणि काय दक्षता घ्यावी याविषयी डॉ. काबरा यांनी माहिती दिली. गरोदरपणात पहिले चार महिने बाळ आकार घेते. याच काळात गर्भवतीला उलटी, मळमळ सुरू होण्यासोबतच अन्नाची वासना उडते. याच कारणाने बहुतेक गर्भवती माता महत्त्वाचे व्हिटॅमिन घेणे टाळतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही. गर्भवतीमध्ये बीपी, झटके, कमी दिवसात प्रसूती, गर्भजल कमी होणे आदी लक्षणे दिसू लागतात. गर्भस्थ शिशु कमी वजनाचे, त्याचे हाड विशेषत: लांब हाडांची उंची खुंटते, मेंदू व हृदयाचे विकार होते. प्रसूतीनंतर स्पेशल केअर युनीटला बाळ भरती करावे लागते.या सर्व बाबी टाळण्यासाठी गर्भवतीने जेवण दर दोन-तीन तासांनी घेणे, सकाळी उठल्याबरोबर भाकरी खाणे, शक्यतो तिखट, अती आंबट, तळलेले पदार्थ, ठेचा खाणे टाळणे गरजेचे आहे. सायंकाळी दूध पोळी, मुगाची खिचडी, पातळ सोजी आणि रात्री झोपताना एक बिस्कीट किंवा टोस्ट घेतल्यास उलटी, मळमळ कमी होते. पुढील पाच महिन्यात आयर्न, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे. एक लिटर चांगल्या दुधात एक ग्रॅम कॅल्शियम असते. कुठलीही गर्भवती दीड ते दोन लिटर दूध घेऊ शकत नाही आणि पचवू शकत नाही. म्हणून सोबत दिवसातून दोनवेळा कॅल्शियमची गोळी घेणे गरजेचे आहे. टाळल्यास शरीराच्या हाडातील कॅल्शियमचा ºहास होऊन कंबर, हात-पायदुखी वाढते, बीपीचा त्रास सुरू होतो.व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. हा घटक व्यवस्थित असल्यास कॅल्शियम व फॉस्फोरसची पातळी व्यवस्थित राहते. गर्भवती मातेची बीपी, बाळाची वाढ व्यवस्थित होते. कमी दिवसाचे, कमी वजनाचे बाळ आणि मातेला झटके येण्याचा प्रकार कमी असतो. या औषधी गर्भवतीने बाळाची गरज समजून घेतल्यास ऐन प्रसूतीच्यावेळी रक्ताची गरज भासणार नाही. सुरक्षित माता व सुदृढ बाळ हेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचे ध्येय आहे, असे डॉ. प्रीती काबरा यांनी म्हटले आहे.