शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

व्हिटॅमिन व कॅल्शियम आयुष्याची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:32 IST

सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.

ठळक मुद्देप्रीती काबरा : सुरक्षित मातृत्व व सुदृढ बाळ हेच ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुरक्षित मातृत्व आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम आयुष्याची शिदोरी ठरू शकते. यासाठी गर्भवतीसह कुटुंबातील जबाबदार व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रीती काबरा यांनी मांडले आहे.गर्भवतीने कुठला आहार घ्यावा, उपचार आणि काय दक्षता घ्यावी याविषयी डॉ. काबरा यांनी माहिती दिली. गरोदरपणात पहिले चार महिने बाळ आकार घेते. याच काळात गर्भवतीला उलटी, मळमळ सुरू होण्यासोबतच अन्नाची वासना उडते. याच कारणाने बहुतेक गर्भवती माता महत्त्वाचे व्हिटॅमिन घेणे टाळतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही. गर्भवतीमध्ये बीपी, झटके, कमी दिवसात प्रसूती, गर्भजल कमी होणे आदी लक्षणे दिसू लागतात. गर्भस्थ शिशु कमी वजनाचे, त्याचे हाड विशेषत: लांब हाडांची उंची खुंटते, मेंदू व हृदयाचे विकार होते. प्रसूतीनंतर स्पेशल केअर युनीटला बाळ भरती करावे लागते.या सर्व बाबी टाळण्यासाठी गर्भवतीने जेवण दर दोन-तीन तासांनी घेणे, सकाळी उठल्याबरोबर भाकरी खाणे, शक्यतो तिखट, अती आंबट, तळलेले पदार्थ, ठेचा खाणे टाळणे गरजेचे आहे. सायंकाळी दूध पोळी, मुगाची खिचडी, पातळ सोजी आणि रात्री झोपताना एक बिस्कीट किंवा टोस्ट घेतल्यास उलटी, मळमळ कमी होते. पुढील पाच महिन्यात आयर्न, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे. एक लिटर चांगल्या दुधात एक ग्रॅम कॅल्शियम असते. कुठलीही गर्भवती दीड ते दोन लिटर दूध घेऊ शकत नाही आणि पचवू शकत नाही. म्हणून सोबत दिवसातून दोनवेळा कॅल्शियमची गोळी घेणे गरजेचे आहे. टाळल्यास शरीराच्या हाडातील कॅल्शियमचा ºहास होऊन कंबर, हात-पायदुखी वाढते, बीपीचा त्रास सुरू होतो.व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. हा घटक व्यवस्थित असल्यास कॅल्शियम व फॉस्फोरसची पातळी व्यवस्थित राहते. गर्भवती मातेची बीपी, बाळाची वाढ व्यवस्थित होते. कमी दिवसाचे, कमी वजनाचे बाळ आणि मातेला झटके येण्याचा प्रकार कमी असतो. या औषधी गर्भवतीने बाळाची गरज समजून घेतल्यास ऐन प्रसूतीच्यावेळी रक्ताची गरज भासणार नाही. सुरक्षित माता व सुदृढ बाळ हेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचे ध्येय आहे, असे डॉ. प्रीती काबरा यांनी म्हटले आहे.