शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
3
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
4
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
7
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
9
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
10
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
11
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
12
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
13
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
14
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
15
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
16
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
17
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
18
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
19
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
20
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा

भरपावसात विराट दर्शन

By admin | Updated: September 26, 2016 02:35 IST

धो-धो कोसळणाऱ्या पावसात मराठा-कुणबी समाजबांधवांनी आपल्या मागण्यांसाठी विराट दर्शन मोर्चाच्या माध्यमातून घडविले.

यवतमाळात घडला इतिहास : मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा यवतमाळ : धो-धो कोसळणाऱ्या पावसात मराठा-कुणबी समाजबांधवांनी आपल्या मागण्यांसाठी विराट दर्शन मोर्चाच्या माध्यमातून घडविले. प्रत्येकासाठी खरेच ऐतिहासिक ठरावा असा हा क्षण होता. कधी नव्हे ती महिला आणि युवतींची लक्षणीय उपस्थिती मोर्चाचे वैशिष्ट ठरले. लाखोंच्या संख्येत उपस्थिती असूनही येथील शिस्तबद्धता प्रशिक्षित दलातील सदस्यांनाही लाजविण्यासारखी होती. समता मैदानावर (पोस्टल ग्राऊंड) सकाळपासून जिल्हाभरातील मराठा-कुणबी समाजबांधव दाखल होऊ लागले. मैदान खचाखच भरल्यानंतर प्रवीण देशमुख यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. उरी हल्ल्यातील शहीद आणि कोपर्डीसह देशभरात अत्याचाराने प्राण गमवावा लागलेल्या तरुणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिजाऊ वंदना झाली. १ वाजताच्या सुमारास महिला, युवती यांच्या पुढाकारात मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा पुनम चौक, हनुमान आखाडा चौक, पाचकंदिल चौक, जाजू चौक, अणे महिला महाविद्यालयासमोरून, दत्त चौक, नेताजी चौक, बसस्थानक चौक असे मार्गक्रमण करीत एलआयसी चौकात पोहोचला. मोर्चा निघताना पावसाला जी सुरूवात झाली, ती संपेपर्यंत कायम होती. मात्र, मराठा-कुणबी समाजबांधवांनी पावसातही मोर्चाची शिस्त मोडली नाही. एलआयसी चौकात मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मनिषा काटे, सोनाली वादाफळे, समृद्धी राऊत, मयुरी कदम, सृष्टी दिवटे, श्रावणी कडू या तरुणींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवलेसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर मोर्चाला स्नेहल टोम्पे (लांडगे), रूबाली शिर्के, शितल साळुंके, सृष्टी दिवटे, साईश्वरी गायकवाड यांनी संबोधित केले. हा मोर्चा कुणा जाती-धर्माविरोधात नसून न्याय्य मागण्यांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कोपर्डीच नव्हेतर त्यासारख्या इतर कुठल्याही घटनांमध्ये आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या आरोपींना फासावर लटकवावे, असा एकमुखी सूर या तरुणींच्या भाषणाचा होता. या सभेचे आभार वैदेही देशमुख हिने मानले. संचलन कैलास राऊत यांनी केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. (कार्यालय प्रतिनिधी)