शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

गावकरी जागले, पण पुढारी झोपेतच

By admin | Updated: May 20, 2016 02:14 IST

पाणीटंचाई तालुक्यातील गावांसाठी बारमाही बनलेली आहे. टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न झाला नाही.

आढावा सभा ठरली देखावा : आर्णीसह १२ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठाआर्णी : पाणीटंचाई तालुक्यातील गावांसाठी बारमाही बनलेली आहे. टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न झाला नाही. आर्णीसह १२ गावांची मदार केवळ टँकरवर आहे. काही गावात लोक स्वत:हून टंचाईनिवारणाचे काम करीत आहे. मात्र, कायमस्वरुपी उपायांसाठी पुढाऱ्यांनी पुढाकार घेतलेला नाही.आमदार, खासदार टंचाईबाबत आढावा बैठक घेवून मोकळे होतात. या बैठका म्हणजे केवळ देखाव्यापुरत्या होत आहेत. दरवर्षी पाच-सहा गावातच टँकर लागायचे. यावेळी मात्र आर्णीसह १२ गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यात आर्णी नगरपरिषदेमध्ये ११ टँकर तर ग्रामीण भागातील ११ गावात नऊ टँकर सुरू आहे. यामध्ये पाळोदी, सुधाकरनगर, जाम, खेड, शिरपूर, जवळा, जवळा हेटी, माळेगाव, इचोरा, दहेली या गावांचा समावेश आहे. तेथे कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतलेला नाही. आमदार ख्वाजा बेग यांनी तालुक्यातील सिंचनावर काम करणाऱ्या सर्व विभागांची एक बैठक लावली होती. परंतु कृषी विभागाने कामांबाबत आमदारांना नीट माहितीसुद्धा दिली नाही. ही बाब आमदारांनी जाहीर कार्यक्रमातूनही सांगितली. परंतु कृषी विभाग ताळ्यावर आला नाही. आपले काम कुठे चालू आहे, हे माहीत झाले तर त्यावर लोकांचा वॉच राहील, बोगस कामे करता येणार नाही, या भीतीपायी आमदारांना माहिती देण्यास चालढकल करण्यात आली. आमदार ख्वाजा बेग यांनी काही गावात पायी फिरून पाण्याची, सिंचनाची माहिती घेतली. परंतु संबंधित विभागाने या प्रयत्नावर पाणी फेरले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कृषी विभागाकडून गाळ उपसण्यासाठी पैसे आले. परंतु त्याची अंमलबजावणी दिसत नाही. सुकळी गावात लोकांनी स्वत: गाळ उपसण्यास सुरुवात केली. त्याबाबत झालेल्या प्राथमिक बैठकीला कृषी विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. आर्णीत डॉ.अविनाश पौळ, पोपटराव पवार, डॉ.नीलेश हेडा ही मोठी माणसे सिंचन वाढले पाहिजे म्हणून वेळोवेळी येवून गेली. पुरुषोत्तम गावंडे, आमदार ख्वाजा बेग यांचीही तळमळ आहे. परंतु तालुक्यातील प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेवून बसले आहे. सिंचन वाढविण्यासाठी पुरुषोत्तम गावंडे यांनी सातारा येथील डॉ.अविनाश पौळ यांना सहा वर्षांपूर्वी आर्णीत आणले. मागील महिन्यात पर्यावरण तज्ज्ञ डॉ.नीलेश हेडा यांना आणले. आमदार बेग यांनी हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांना आणले. त्याचा चांगला परिणाम म्हणून तालुक्यात काही ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे पुढे आले आणि कामही सुरू झाले आहे. (शहर प्रतिनिधी)