शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:33 IST

सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने इचोरा या गावातील नागरिकांनी एकजूट होत पाणी टंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला.

ठळक मुद्देरात्रीचे बारा अन् इचोरात कामाला सुरुवात : पाणीदार गावासाठी नागरिक सरसावले

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने इचोरा या गावातील नागरिकांनी एकजूट होत पाणी टंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशी जणू काही स्थितीच निर्माण झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेत या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला आहे.खऱ्या अर्थाने रविवार, ८ एप्रिलपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. रात्री बारा वाजता पूर्ण गावाने अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जल व्यवस्थापनाचा निर्धार केला. सुरुवातील गावातील मालती महाजन, उषा नेहारे, प्रीतम वाघमारे, वैभव नागोसे व रामचंद्र वºहाडे यांनी स्पर्धेसंबधी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना उपसरपंच अनिता खोकले, पोलीस पाटील नारायण वºहाडे, शिक्षक सचिन मेश्राम, गणेश वºहाडे, विनोद नेहारे, प्रवीण नागोेसे, साहेबराव वºहाडे, सुभाष नेहारे, सुरेश जुनगरे आदींची साथ लाभली.विशेष म्हणजे गावातील सर्वच वयोगटातील सदस्य या कामात स्वयंस्फूर्तीने उतरला आहे. मालती महाजन यांच्या पुढाकारातून सर्वच बचत गटाने प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत दिली. हाच आदर्श ठेवत इतरांनीही आपला वाटा उचलला. विशेष म्हणजे सत्यसाई सेवा समितीने या गावाला दत्तक घेतले. त्यामुळे येणाºया काळात गावात सकारात्मक बदत घडून येणे क्रमप्राप्त झाले आहे.दिव्यांगाचे श्रमदान ऊर्जा देणारेछत्रपती भागोजी किन्नाके हे एका पायाने पूर्ण अपंग आहे. त्यांचा श्रमदानात असलेला पुढाकार सर्वांना हत्तीचे बळ देणारा ठरतो आहे. एक वयोवृध्द अपंग व्यक्ती करू शकते, तर आपण का नाही? अशी भावनाही यानिमित्ताने अनेकांच्या मनात जागृत झाली आहे.तहसीलदाराचे प्रोत्साहनस्पर्धेच्या माध्यमातून गावे पाणीदार व्हावीत, यासाठी प्रशासनही सरसावले आहे. तहसीलदार रणजित भोसले यांनी बहुतांश वेळ गावकºयांना मार्गदर्शन व त्यांच्यासोबत श्रमदान करण्यात दिला आहे. आजही त्यांनी इचोरा व नरसापूर येथे श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले. तहसीलदार रणजित भोसले यांची पाणीदार गावासाठी असलेली पोटतिडक अनेक गावांसाठी टानिकचे काम करणारी ठरत आहे.अनेक गावात प्रयत्नांची पराकाष्टाइचोरा येथील नागरिक ज्याप्रमाणे प्रेरीत होऊन कामाला लागले, तशीच स्थिती तालुक्यातील अनेक गावाची आहे. यामध्ये नरसापूर, पोटगव्हाण, नांझा, गणेशवाडी, पालोती, सावंगी (डाफ), रासा, गांढा आदी गावाचा समावेश आहे. त्यामुळे या गावातही पेटलेल्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी विझविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली जात आहे.