शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:33 IST

सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने इचोरा या गावातील नागरिकांनी एकजूट होत पाणी टंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला.

ठळक मुद्देरात्रीचे बारा अन् इचोरात कामाला सुरुवात : पाणीदार गावासाठी नागरिक सरसावले

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. मग ती पाणीटंचाई का असेना. अशाच पध्दतीने इचोरा या गावातील नागरिकांनी एकजूट होत पाणी टंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. त्यामुळे या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं या’ अशी जणू काही स्थितीच निर्माण झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेत या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला आहे.खऱ्या अर्थाने रविवार, ८ एप्रिलपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. रात्री बारा वाजता पूर्ण गावाने अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जल व्यवस्थापनाचा निर्धार केला. सुरुवातील गावातील मालती महाजन, उषा नेहारे, प्रीतम वाघमारे, वैभव नागोसे व रामचंद्र वºहाडे यांनी स्पर्धेसंबधी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना उपसरपंच अनिता खोकले, पोलीस पाटील नारायण वºहाडे, शिक्षक सचिन मेश्राम, गणेश वºहाडे, विनोद नेहारे, प्रवीण नागोेसे, साहेबराव वºहाडे, सुभाष नेहारे, सुरेश जुनगरे आदींची साथ लाभली.विशेष म्हणजे गावातील सर्वच वयोगटातील सदस्य या कामात स्वयंस्फूर्तीने उतरला आहे. मालती महाजन यांच्या पुढाकारातून सर्वच बचत गटाने प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत दिली. हाच आदर्श ठेवत इतरांनीही आपला वाटा उचलला. विशेष म्हणजे सत्यसाई सेवा समितीने या गावाला दत्तक घेतले. त्यामुळे येणाºया काळात गावात सकारात्मक बदत घडून येणे क्रमप्राप्त झाले आहे.दिव्यांगाचे श्रमदान ऊर्जा देणारेछत्रपती भागोजी किन्नाके हे एका पायाने पूर्ण अपंग आहे. त्यांचा श्रमदानात असलेला पुढाकार सर्वांना हत्तीचे बळ देणारा ठरतो आहे. एक वयोवृध्द अपंग व्यक्ती करू शकते, तर आपण का नाही? अशी भावनाही यानिमित्ताने अनेकांच्या मनात जागृत झाली आहे.तहसीलदाराचे प्रोत्साहनस्पर्धेच्या माध्यमातून गावे पाणीदार व्हावीत, यासाठी प्रशासनही सरसावले आहे. तहसीलदार रणजित भोसले यांनी बहुतांश वेळ गावकºयांना मार्गदर्शन व त्यांच्यासोबत श्रमदान करण्यात दिला आहे. आजही त्यांनी इचोरा व नरसापूर येथे श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले. तहसीलदार रणजित भोसले यांची पाणीदार गावासाठी असलेली पोटतिडक अनेक गावांसाठी टानिकचे काम करणारी ठरत आहे.अनेक गावात प्रयत्नांची पराकाष्टाइचोरा येथील नागरिक ज्याप्रमाणे प्रेरीत होऊन कामाला लागले, तशीच स्थिती तालुक्यातील अनेक गावाची आहे. यामध्ये नरसापूर, पोटगव्हाण, नांझा, गणेशवाडी, पालोती, सावंगी (डाफ), रासा, गांढा आदी गावाचा समावेश आहे. त्यामुळे या गावातही पेटलेल्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी विझविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली जात आहे.