शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

ग्रामसभा महासंघाचा दोन ट्रक तेंदूपत्ता वनविभागाने पळविला

By admin | Updated: June 11, 2017 00:23 IST

आदिवासी पेसाअंतर्गत येणाऱ्या मारेगाव व झरी तालुक्यातील १७ गावांमधील ग्रामसभा महासंघाने तालुक्यातील खेकडवाई गावात

मजुरांचा ट्रकसमोर ठिय्या : महासंघाची पोलिसात तक्रार, पेसा कायद्याची वनाधिकाऱ्यांकडून पायमल्ली लोकमत न्यूज नेटवर्क मारेगाव : आदिवासी पेसाअंतर्गत येणाऱ्या मारेगाव व झरी तालुक्यातील १७ गावांमधील ग्रामसभा महासंघाने तालुक्यातील खेकडवाई गावात संकलित केलेल्या तेंदुपत्त्यापैकी दोन ट्रक तेंदूपत्ता मारेगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने बळजबरीने नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यावेळी शेकडो तेंदुपत्ता मजुर ट्रकसमोर आडवे झाले. परंतु मजुरांना न जुमानता वन विभागाने बळजबरीने तेंदुपत्ता पळवून नेला. दरम्यान वन विभागाने तेंदूपत्ता चोरून नेल्याची तक्रार ग्रामसभा महासंघाने शुक्रवारी रात्री उशिरा मारेगाव पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी आता पोलीस वन विभागाच्या विरोधात काय कारवाई करतात, याकडे तेंदूपत्ता मजुरांचे लक्ष लागले आहे. पेसाअंतर्गत येणाऱ्या आदिवासी गावांना वनहक्क मान्यता कायदा सुधारणा नियम २०१२ च्या नियम २ (१) (घ) नुसार ग्रामसभांना वनउपजाचे संकलन करणे, विक्री करणे, मालाची वाहतूक करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. या नियमाचा आधार घेत मारेगाव तालुक्यातील आवळगाव, खेकडवाई, वाघदरा, खंडणी, तर झरी तालुक्यातील मांडवा, मजरा, पाचपोहर, आंबेझरी, वल्हासा, येवती, खापरी, सालेभट्टी आदी १७ गावांतील नागरिकांनी एकत्र येत ग्रामसभा महासंघाची स्थापना केली. तेंदूपत्ता संकलित केला. संकलित तेंदूपत्त्याची रितसर माहिती महासंघाने वन विभाग पांढरकवडा व मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना दिली होती. संकलित केलेला तेंदूपत्ता जिल्हा महासंघाने निविदा स्विकारून सहजानंद ट्रेडर्स गोंदिया यांना विकण्याचा निर्णय घेतला. कंपनीने सर्व माल वाहतूक करण्याच्या दृष्टीने दास्तान केंद्र म्हणून खेकडवाई येथे संकलित केला आणि पहिला ट्रक कंपनीने नेत ३५ लाख रूपये ग्रामस्थांना अदा केले. आताही ग्रामस्थांना जवळपास २० लाख रूपये कंपनीकडून घेणे बाकी आहे. परंतु शुक्रवारी मारेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी जे.व्ही.घुगे, मोबाईल पथक वनपरीक्षेत्र अधिकारी वारे, वनरक्षक आय.जी.धानोरकर यांनी पोलिसांची मदत घेत संकलित केलेल्या तेंदूपत्त्यापैकी दोन ट्रक माल बळजबरीने भरून नेला. नागरिकांना तेंदूपत्ता नेत असल्याचे कळताच, शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. महिलांनी ट्रकसमोर बसून माल नेण्यास विरोध केला. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोणत्या अधिकारात तेंदुपत्ता नेता, याची विचारणा केली. परंतु वन विभागाने ग्रामस्थांचे काहीही न ऐकता सुरक्षितता साधण्यासाठी तेंदुपत्ता नेत असल्याचे सांगत दोन ट्रक तेंदूपत्ता उचलून नेला. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेतली. वन विभागाचे अधिकारी बळजबरीने तेंदुपत्ता नेत असल्याने हतबल झालेल्या ग्रामसभा महासंघाने दोन ट्रक तेंदूपत्ता वन विभागाने चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिली. ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्यात तेंदुपत्ता संकलनावरून वाद असल्याने तशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशावरून माल खराब होऊ नये म्हणून खेकडवाई येथे असलेला तेंदुपत्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने पांढरकवडा येथे हलविण्यात आला आहे. पण ग्रामसभेच्या महिला व पुरूषांनी विरोध केल्याने दोन ट्रक तेंदुपत्ता नेऊन पुढील कारवाई तात्पुरती स्थगीत करण्यात आली आहे. - जे.व्ही.घुगे वनपरीक्षेत्र अधिकारी, मारेगाव मजूर म्हणतात, आम्ही आत्महत्या करावी काय? वन विभागाच्या कारवाईने तेंदूपत्ता मजुरांमध्ये भितीचे वातावरण असून आपल्या मालाचे आता काय होईल, आपले पैसे बुडणार काय, ज्या कंपनीकडून अग्रीम रक्कम घेतली, त्यांना आता तेंदूपत्ता कोठून द्यायचा, असा प्रश्न या आदिवासी मजुरांपुढे निर्माण झाला आहे. तेंदूपत्ता परत न मिळाल्यास आम्ही आता आत्महत्या करावी काय, असा प्रश्न मजुरांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, वन या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने हादरून गेलेल्या वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तेंदूपत्ता बळजबरीने नेण्याची कार्यवाही थांबविली आहे.