शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

प्रत्येक रविवार दोन तास निसर्गासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:40 IST

पांढरकवडा : निसर्ग मित्रमंडळातर्फे मागील अनेक वर्षापासून ‘दर रविवारी दोन दोन तास निसर्गासाठी’ हा उपक्रम सुरू ...

पांढरकवडा : निसर्ग मित्रमंडळातर्फे मागील अनेक वर्षापासून ‘दर रविवारी दोन दोन तास निसर्गासाठी’ हा उपक्रम सुरू आहे.

या उपक्रमाअंतर्गत वनविभागाने लावलेल्या झाडांची काळजी घेणे, त्यांना पाणी देणे, निंदन-खुरपण करणे आदी कामे प्रत्येक रविवारी न चुकता केली जातात. आतापर्यंत १४० रविवार अखंडपणे हा उपक्रम श्रीकृष्ण टेकडी येथील वन उद्यानात सुरू आहे. वनविभाग आणि निसर्ग मित्रमंडळातर्फे लावण्यात आलेल्या या झाडांना पाणी देणे, त्याची साफसफाई करणे, फांद्यांची कटाई करणे या प्रकारचे कार्य केले जात आहे. त्याचप्रमाणे दर रविवारी वेगवेगळ्या प्रकारची झाडेसुध्दा लावली जातात. टेकडी परिसरात मागील काही आठवड्यात लावण्यात आलेल्या झाडांच्या मुळाजवळ मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत रविवारी साफ करण्यात आले. निसर्ग मित्रमंडळातर्फे दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या बांधून वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन करून वृक्षसंवर्धन केल्या जात आहे. मागील १० वर्षापासून हा उपक्रम अखंडपणे राबविला जात आहे. निसर्ग मित्रमंडळातर्फे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची १४० फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, धार्मिक महत्त्व असणारी झाडे आणि वेलवर्गीय तसेच वड, पिंपळ, कडुलिंब अशी मोठी वाढ होणारी झाडे लावण्यात आलेली आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक असून त्यादृष्टीने निसर्ग मित्रमंडळाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया निसर्गप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहे. निसर्ग मित्रमंडळाचे अध्यक्ष सुबोध काळबांडे, स्वप्नील बोमेनवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे.