शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिबार पेरणीचे आर्थिक संकट

By admin | Updated: July 14, 2014 01:37 IST

परिसरात दुबार पेरणीही उलटल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे

सरूळ परिसर : जनावरांचाही जीव टांगणीला, चाऱ्याचा प्रश्न, काय पेरावे याची चिंतासरूळ : परिसरात दुबार पेरणीही उलटल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शिवाय चारा नसल्याने जनावरांचाही जीव टांगणीला लागला आहे. परिसरात कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजाला आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पाण्याचे स्रोतही आटत चालल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परसोडी, घारफळ, शिंदी, पाचखेड, वरूड, रेणुकापूर, येरणगाव, सारफळी, गवंडी, खर्डा, कोल्ही-बारड, फाळेगाव, बागवाडी, महंमदपूर आदी गावातील शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट आहे. मृगाच्या पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी बियाणे टोबले. अंकुरलेले बियाणे पावसाअभावी कोमेजले. यानंतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र मेघराजाने हुलकावणी देत शेतकऱ्यांच्या स्वप्नांची होळी केली. परिसराच्या डझनावर गावातील शेतकऱ्यांपुढे मेघराजा आपत्ती घेवून उभा ठाकला आहे. शेतात महागडी बियाणे पेरली. यासाठी बँकांचे कर्ज घेतले. दुबार पेरणीसाठी घरातील दागदागिने मोडले. यातही बळीराजाला जबर फटका बसला. पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीही उलटली. आता त्याच्यापुढे तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यासाठी पैसा आणायचा कोठून याची चिंता त्यांना सतावत आहे. बँकांचे कर्ज घेतले. घरातील दागदागिने मोडले. आता त्यांच्यापुढे सावकार हाच एक पर्याय शिल्लक राहिला आहे. अशा स्थितीत शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा आहे.परिसरातील जनावरांना तृष्णा भागविण्यासाठी पाणी नाही. शिवाय वैरणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. या दोनही समस्यांमुळे जनावरांचा जीव टांगणीला लागला आहे. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी परिसरातील गावागावात धोंडी, जलाभिषेक, पूजा-अर्चा, पारायण, महापंगत आदी कार्यक्रम घेतले जात आहे. त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पेरणीसाठी शासनाकडून मदतीची गरज आहे. (वार्ताहर)सावळीसदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी-पळशी सर्कलमधील जवळपास २७ गावांमधील शेतकरी पावसाअभावी अडचणीत आले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी १५ जूनपूर्वीच खरिपाची पेरणी केली. महागडे बियाणे शेतात टाकले. मात्र पावसाअभावी मातीमोल झाले. काही ठिकाणी कपाशीचे बियाणे निघालेच नाही. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. यासाठी शासनाने आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)खैरी : पावसासाठी साकडेखैरी : गुरूपौर्णिमेनिमित्त ग्रामवासीयांनी पावसासाठी मारूतीला साकडे घातले़ महापूजा, अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ पावसाळ्याची नक्षत्रे सुरू होऊन महिना लोटला मात्र फक्त दोन पाऊस आले़ त्यामुळे शेतजमीन अजुनही कोरडीच आहे़ काही शेतकऱ्यांनी कोरड्यातच सरकीची टोबणी केली तर बहुतांश शेतकरी पाण्याची वाट बघत आहे़ या परिसरातील ८० टक्के पेरण्या उलटल्या व दुबार पेरण्या करून नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे़ या परिसरात कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जाते़ पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना सतावून सोडत आहे़ तिन ते चारही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे़ एकीकडे बियाणाचा तुटवडा आहे़ तर बियाणाचे भाव चढत आहे़ या चक्रव्युहात बळीराजा भरडला जात आहे़ ग्रामस्थांनी बजरंगबलीकडे पावसासाठी साकडे घातले़ त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़ यावेळी पुंडलीक महाजन, जनार्धन वानखडे, श्रीधर पांगुड, नथ्थु वरटकर, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते़ (वार्ताहर)