शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

तिबार पेरणीचे आर्थिक संकट

By admin | Updated: July 14, 2014 01:37 IST

परिसरात दुबार पेरणीही उलटल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे

सरूळ परिसर : जनावरांचाही जीव टांगणीला, चाऱ्याचा प्रश्न, काय पेरावे याची चिंतासरूळ : परिसरात दुबार पेरणीही उलटल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शिवाय चारा नसल्याने जनावरांचाही जीव टांगणीला लागला आहे. परिसरात कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजाला आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पाण्याचे स्रोतही आटत चालल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परसोडी, घारफळ, शिंदी, पाचखेड, वरूड, रेणुकापूर, येरणगाव, सारफळी, गवंडी, खर्डा, कोल्ही-बारड, फाळेगाव, बागवाडी, महंमदपूर आदी गावातील शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट आहे. मृगाच्या पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी बियाणे टोबले. अंकुरलेले बियाणे पावसाअभावी कोमेजले. यानंतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र मेघराजाने हुलकावणी देत शेतकऱ्यांच्या स्वप्नांची होळी केली. परिसराच्या डझनावर गावातील शेतकऱ्यांपुढे मेघराजा आपत्ती घेवून उभा ठाकला आहे. शेतात महागडी बियाणे पेरली. यासाठी बँकांचे कर्ज घेतले. दुबार पेरणीसाठी घरातील दागदागिने मोडले. यातही बळीराजाला जबर फटका बसला. पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीही उलटली. आता त्याच्यापुढे तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यासाठी पैसा आणायचा कोठून याची चिंता त्यांना सतावत आहे. बँकांचे कर्ज घेतले. घरातील दागदागिने मोडले. आता त्यांच्यापुढे सावकार हाच एक पर्याय शिल्लक राहिला आहे. अशा स्थितीत शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा आहे.परिसरातील जनावरांना तृष्णा भागविण्यासाठी पाणी नाही. शिवाय वैरणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. या दोनही समस्यांमुळे जनावरांचा जीव टांगणीला लागला आहे. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी परिसरातील गावागावात धोंडी, जलाभिषेक, पूजा-अर्चा, पारायण, महापंगत आदी कार्यक्रम घेतले जात आहे. त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पेरणीसाठी शासनाकडून मदतीची गरज आहे. (वार्ताहर)सावळीसदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी-पळशी सर्कलमधील जवळपास २७ गावांमधील शेतकरी पावसाअभावी अडचणीत आले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी १५ जूनपूर्वीच खरिपाची पेरणी केली. महागडे बियाणे शेतात टाकले. मात्र पावसाअभावी मातीमोल झाले. काही ठिकाणी कपाशीचे बियाणे निघालेच नाही. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. यासाठी शासनाने आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)खैरी : पावसासाठी साकडेखैरी : गुरूपौर्णिमेनिमित्त ग्रामवासीयांनी पावसासाठी मारूतीला साकडे घातले़ महापूजा, अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ पावसाळ्याची नक्षत्रे सुरू होऊन महिना लोटला मात्र फक्त दोन पाऊस आले़ त्यामुळे शेतजमीन अजुनही कोरडीच आहे़ काही शेतकऱ्यांनी कोरड्यातच सरकीची टोबणी केली तर बहुतांश शेतकरी पाण्याची वाट बघत आहे़ या परिसरातील ८० टक्के पेरण्या उलटल्या व दुबार पेरण्या करून नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे़ या परिसरात कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जाते़ पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना सतावून सोडत आहे़ तिन ते चारही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे़ एकीकडे बियाणाचा तुटवडा आहे़ तर बियाणाचे भाव चढत आहे़ या चक्रव्युहात बळीराजा भरडला जात आहे़ ग्रामस्थांनी बजरंगबलीकडे पावसासाठी साकडे घातले़ त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़ यावेळी पुंडलीक महाजन, जनार्धन वानखडे, श्रीधर पांगुड, नथ्थु वरटकर, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते़ (वार्ताहर)