शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तिबार पेरणीचे आर्थिक संकट

By admin | Updated: July 14, 2014 01:37 IST

परिसरात दुबार पेरणीही उलटल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे

सरूळ परिसर : जनावरांचाही जीव टांगणीला, चाऱ्याचा प्रश्न, काय पेरावे याची चिंतासरूळ : परिसरात दुबार पेरणीही उलटल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शिवाय चारा नसल्याने जनावरांचाही जीव टांगणीला लागला आहे. परिसरात कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजाला आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पाण्याचे स्रोतही आटत चालल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परसोडी, घारफळ, शिंदी, पाचखेड, वरूड, रेणुकापूर, येरणगाव, सारफळी, गवंडी, खर्डा, कोल्ही-बारड, फाळेगाव, बागवाडी, महंमदपूर आदी गावातील शेतकऱ्यांपुढे तिबार पेरणीचे संकट आहे. मृगाच्या पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी बियाणे टोबले. अंकुरलेले बियाणे पावसाअभावी कोमेजले. यानंतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र मेघराजाने हुलकावणी देत शेतकऱ्यांच्या स्वप्नांची होळी केली. परिसराच्या डझनावर गावातील शेतकऱ्यांपुढे मेघराजा आपत्ती घेवून उभा ठाकला आहे. शेतात महागडी बियाणे पेरली. यासाठी बँकांचे कर्ज घेतले. दुबार पेरणीसाठी घरातील दागदागिने मोडले. यातही बळीराजाला जबर फटका बसला. पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीही उलटली. आता त्याच्यापुढे तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. यासाठी पैसा आणायचा कोठून याची चिंता त्यांना सतावत आहे. बँकांचे कर्ज घेतले. घरातील दागदागिने मोडले. आता त्यांच्यापुढे सावकार हाच एक पर्याय शिल्लक राहिला आहे. अशा स्थितीत शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा आहे.परिसरातील जनावरांना तृष्णा भागविण्यासाठी पाणी नाही. शिवाय वैरणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. या दोनही समस्यांमुळे जनावरांचा जीव टांगणीला लागला आहे. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी परिसरातील गावागावात धोंडी, जलाभिषेक, पूजा-अर्चा, पारायण, महापंगत आदी कार्यक्रम घेतले जात आहे. त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पेरणीसाठी शासनाकडून मदतीची गरज आहे. (वार्ताहर)सावळीसदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी-पळशी सर्कलमधील जवळपास २७ गावांमधील शेतकरी पावसाअभावी अडचणीत आले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी १५ जूनपूर्वीच खरिपाची पेरणी केली. महागडे बियाणे शेतात टाकले. मात्र पावसाअभावी मातीमोल झाले. काही ठिकाणी कपाशीचे बियाणे निघालेच नाही. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. यासाठी शासनाने आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)खैरी : पावसासाठी साकडेखैरी : गुरूपौर्णिमेनिमित्त ग्रामवासीयांनी पावसासाठी मारूतीला साकडे घातले़ महापूजा, अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ पावसाळ्याची नक्षत्रे सुरू होऊन महिना लोटला मात्र फक्त दोन पाऊस आले़ त्यामुळे शेतजमीन अजुनही कोरडीच आहे़ काही शेतकऱ्यांनी कोरड्यातच सरकीची टोबणी केली तर बहुतांश शेतकरी पाण्याची वाट बघत आहे़ या परिसरातील ८० टक्के पेरण्या उलटल्या व दुबार पेरण्या करून नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे़ या परिसरात कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जाते़ पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांना सतावून सोडत आहे़ तिन ते चारही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे़ एकीकडे बियाणाचा तुटवडा आहे़ तर बियाणाचे भाव चढत आहे़ या चक्रव्युहात बळीराजा भरडला जात आहे़ ग्रामस्थांनी बजरंगबलीकडे पावसासाठी साकडे घातले़ त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले़ यावेळी पुंडलीक महाजन, जनार्धन वानखडे, श्रीधर पांगुड, नथ्थु वरटकर, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते़ (वार्ताहर)