शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचा चुकारा थकल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:49 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. यावर्षी तुरीचे पीक हाच एकमेव स्त्रोत शेतकºयांपुढे होता. तुरीला बाजारभाव अतिशय कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकली. मात्र अजूनपर्यंत या शेतकºयांनी तुरीचा मोबदला मिळालेला नाही. आता मार्च एन्डींग असल्याने बँकेचे व्यवहार व कर्जप्रकरणे ...

ठळक मुद्देमार्च एन्डींगलाही लाभ नाही : हमीभाव योजनेचे असेही धिंडवडे

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. यावर्षी तुरीचे पीक हाच एकमेव स्त्रोत शेतकºयांपुढे होता. तुरीला बाजारभाव अतिशय कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकली. मात्र अजूनपर्यंत या शेतकºयांनी तुरीचा मोबदला मिळालेला नाही. आता मार्च एन्डींग असल्याने बँकेचे व्यवहार व कर्जप्रकरणे निल करावी लागतात. यासाठी शेतकऱ्यांकडे पैसाच नाही.शासनच शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांकडे आता कुठलीही आर्थिक तजवीज नाही. नाफेडकडे टाकलेल्या तुरीची रक्कम हेरून आर्थिक व्यवहार केले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना दोन ते तीन महिने लोटूनही तुरीचा मोबदलाच मिळालेला नाही. जवळपास ३४ कोटींपेक्षा अधिकची रक्कम अडकून पडलेली आहे. सातत्याने होत असलेल्या आघातामुळे शेतकरी खचत आहे. उत्पन्नाचा आश्वासित स्त्रोत नसल्याने आता नाफेडने नवे संकट या शेतकऱ्यांपुढे उभे केले आहे.रबी हंगामातही गहू, हरभऱ्याचे पीक गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त केले. पाण्याची तजवीज असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळ पीक घेण्याचा प्रयत्न केला. त्यालाही बाजारभाव मिळत नसल्याने लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याला पुन्हा खासगी सावकार व पतसंस्थांच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्च झाला दुप्पटउन्हाळी मशागतीच्या कामाला आता रोख रक्कम लागते. पूर्वी बैलाच्या साहाय्याने परंपरागत पद्धतीने मशागत होत होती. आता गावातही बैलजोड्या नसल्याने शेतकरी अल्पभूधारक असो की अधिक क्षेत्र धारण करणारा या दोघांनाही मशागतीसाठी ट्रॅक्टरचाच आधार घ्यावा लागतो. डिझेलचे दर दिवसेंदवस वाढत असल्याने मशागत खर्चही दुप्पट झाला आहे. रोख रक्कम खिशात असल्याशिवाय शेतातील मशागतीला सुरुवात करणेही शक्य नाही. वेळेत मशागत न झाल्याने उन्हाळ्यात जमीन तापत नाही. याचा परिणाम उत्पन्नावर होतो. तेथेही शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसावेच लागते.