शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तुरीचा चुकारा थकल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:49 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. यावर्षी तुरीचे पीक हाच एकमेव स्त्रोत शेतकºयांपुढे होता. तुरीला बाजारभाव अतिशय कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकली. मात्र अजूनपर्यंत या शेतकºयांनी तुरीचा मोबदला मिळालेला नाही. आता मार्च एन्डींग असल्याने बँकेचे व्यवहार व कर्जप्रकरणे ...

ठळक मुद्देमार्च एन्डींगलाही लाभ नाही : हमीभाव योजनेचे असेही धिंडवडे

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. यावर्षी तुरीचे पीक हाच एकमेव स्त्रोत शेतकºयांपुढे होता. तुरीला बाजारभाव अतिशय कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विकली. मात्र अजूनपर्यंत या शेतकºयांनी तुरीचा मोबदला मिळालेला नाही. आता मार्च एन्डींग असल्याने बँकेचे व्यवहार व कर्जप्रकरणे निल करावी लागतात. यासाठी शेतकऱ्यांकडे पैसाच नाही.शासनच शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांकडे आता कुठलीही आर्थिक तजवीज नाही. नाफेडकडे टाकलेल्या तुरीची रक्कम हेरून आर्थिक व्यवहार केले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना दोन ते तीन महिने लोटूनही तुरीचा मोबदलाच मिळालेला नाही. जवळपास ३४ कोटींपेक्षा अधिकची रक्कम अडकून पडलेली आहे. सातत्याने होत असलेल्या आघातामुळे शेतकरी खचत आहे. उत्पन्नाचा आश्वासित स्त्रोत नसल्याने आता नाफेडने नवे संकट या शेतकऱ्यांपुढे उभे केले आहे.रबी हंगामातही गहू, हरभऱ्याचे पीक गारपिटीने पूर्णत: उद्ध्वस्त केले. पाण्याची तजवीज असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळ पीक घेण्याचा प्रयत्न केला. त्यालाही बाजारभाव मिळत नसल्याने लागवड खर्चही निघेनासा झाला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याला पुन्हा खासगी सावकार व पतसंस्थांच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्च झाला दुप्पटउन्हाळी मशागतीच्या कामाला आता रोख रक्कम लागते. पूर्वी बैलाच्या साहाय्याने परंपरागत पद्धतीने मशागत होत होती. आता गावातही बैलजोड्या नसल्याने शेतकरी अल्पभूधारक असो की अधिक क्षेत्र धारण करणारा या दोघांनाही मशागतीसाठी ट्रॅक्टरचाच आधार घ्यावा लागतो. डिझेलचे दर दिवसेंदवस वाढत असल्याने मशागत खर्चही दुप्पट झाला आहे. रोख रक्कम खिशात असल्याशिवाय शेतातील मशागतीला सुरुवात करणेही शक्य नाही. वेळेत मशागत न झाल्याने उन्हाळ्यात जमीन तापत नाही. याचा परिणाम उत्पन्नावर होतो. तेथेही शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसावेच लागते.