शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

आदिवासींना ‘अच्छे दिन’ येणार

By admin | Updated: December 10, 2014 23:03 IST

आदिवासींना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, वीज, शिक्षण यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. केंद्रात ‘अच्छे दिन’ येईल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र राज्यात आदिवासींसाठी नक्कीच

राज्यपालांची ग्वाही : आकोली बुद्रुक येथील नागरिकांसोबत संवाद प्रवीण पिन्नमवार - आकोली बुद्रुक (पांढरकवडा )आदिवासींना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, वीज, शिक्षण यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. केंद्रात ‘अच्छे दिन’ येईल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र राज्यात आदिवासींसाठी नक्कीच ‘अच्छे दिन येईल’अशी ग्वाही महामहिम राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी दिली. पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूरजवळील आकोली बुद्रुक येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बुधवारी आयोजित ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव बोलत होते. यावेळी आमदार प्रा.राजू तोडसाम, राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमल सिंह, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, गाडगे महाराज मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील उपस्थित होते. आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, कुमरन भीम, रामजी गोंड हे जल, जमीन, जंगल या आदिवासींच्या हक्कासाठी लढले. त्यांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. तथापि आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले नाही. त्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. म्हणूनच आदिवासींचे हक्क, त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा, योजना कितपत देण्यात आल्या व सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व आदिवासी बांधवांना भेटण्यासाठी आलो आहे. यापुढील काळात आदिवासींच्या हक्कासाठी मी स्वत: राज्याचा राज्यपाल या नात्याने लढणार आहे, असे राज्यपाल म्हणाले. लाखो डॉलरची ताकद आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे. ती आपण ओळखली पाहीजे. स्वच्छ भारताच्या कामाची सुरूवात भारतात सर्वप्रथम गाडगे महाराजांनी केली. ते काम आपण सर्वांनी यापुढे सुरू ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.तत्पूर्वी सकाळी ११.५० वाजता त्यांचे गोपालपूर जवळील आकोली बुदु्रक येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेत आगमन झाले. मुलींच्या लेझीम पथकाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास राज्यपालांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच दिवंगत राजाराम बापू घोंगटे सभागृहाचे उद्घाटन केले. यानंतर आश्रमशाळेतील प्रांगणात ‘विद्यार्थी संवाद‘ कार्यक्रम झाला.प्रास्ताविक गाडगे महाराज आश्रमशाळेचे संचालक सचिन घोंगटे यांनी केले. तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतावर आदिवासी लोकनृत्य सादर केले. नंतर राज्यपालांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह राकेश नेमनवार, विजय पाटील चालबर्डीकर, नरसिंगराव सातुरवार, मुन्ना बोलेनवार, दिवाकर चौधरी, आकाश कनाके, अंकित नैताम, दिनेश सुरपाम, रामकृष्ण पाटील, नारायण भानारकर, मंगेश वारेकर व आकोली, गोपालपूर व परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या. संचालन रवींद्र बावीसकर यांनी मानले.निवेदनासाठी नागरिकांची गर्दीआश्रमशाळा कार्यालयात राज्यपालांना निवेदन देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी नागरिकांनी अनेक निवेदन दिले. तसेच राज्यपालांना विविध विषयावर आपले म्हणणे व गाहाणे सांगितले.