शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींच्या नावावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

माहूर : आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी गिळंकृत केल्याची हजारो प्रकरणे राज्यात न्यायप्रविष्ट आहेत. आदिवासींच्या जमिनीची लूट त्या-त्या भागातील अधिकाऱ्यांच्या ...

माहूर : आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी गिळंकृत केल्याची हजारो प्रकरणे राज्यात न्यायप्रविष्ट आहेत. आदिवासींच्या जमिनीची लूट त्या-त्या भागातील अधिकाऱ्यांच्या सहमतीने झाली. त्यामुळे आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींच्या नावावर करून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केली.

प्रा. पुरके यांनी गुरुवारी माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. प्रथम दोसानी परिवार व पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एस. एस. पाटील यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नंतर पत्रकारांशी बातचीत करताना माजी मंत्री प्रा. पुरके यांनी बोगस आदिवासींच्या प्रकरणावर प्रकाश टाकला. राज्यातील इतर भागांसह माहूर, किनवट तालुक्यातसुध्दा मोठ्या प्रमाणत आदिवासी समाजाच्या हक्काच्या नोकऱ्या, शैक्षणिक व इतर सवलती बोगस आदिवासींनी बळकावल्याचे त्यांनी सांगितले.

हजारो कोटींच्या आदिवासींच्या जमिनीवर गैर आदिवासींचा ताबा आहे. तालुक्यातील सारखणी येथील सीताराम रामजी डोनीकर यांच्या ३२ एकर भूखंडाप्रमाणे राज्यात हजारो प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. माझ्या मतदार संघातसुद्धा एका आदिवासी कोलम समाजातील शेतकऱ्याची जमीन रेल्वेमध्ये गेली. मात्र, गैर आदिवासींनी शासनाकडून मिळणारा मोबदला लाटण्यासाठी ती आपल्या नावावर करून घेतली होती, असे सांगितले. ६ कोटी १९ लाख रुपयांच्या मोबदल्याचे हे प्रकरण व देवधरी, ता. राळेगाव येथील कोवे नामक शेतकऱ्याची २५ एकर जमीन एका माजी आदिवासी मंत्र्याने शेतकऱ्यांच्या मानसिक दुर्बलतेचा फायदा उचलून घेतली होती, असेही स्पष्ट केले. ही दोन्ही प्रकरणे न्यायालयात असून, एका प्रकारात मी स्वतः याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

बॉक्स

लवकरच महसूल मंत्र्यांना भेटणार

आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचे प्रा. पुरके यांनी स्पष्ट केले. ज्या अधिकाऱ्यांनी आदिवासी जमिनीचे वाटोळे केले, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शिक्षा व्हावी, अशी मागणी आपण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रघुनाथ कापर्तीवार, संतोष अग्रवाल, नंदू संतान, हाजी कादर दोसानी, गजानन कुलकर्णी, सरफराज दोसानी आदी उपस्थित होते.