शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

अधिवेशनात गुंजणार आदिवासींचे प्रश्न; ७ डिसेंबरला महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 12:48 IST

Yawatmal news aadivasi आदिवासींच्या प्रश्नांवर सतत दुर्लक्ष होत असल्याने येत्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर आदिवासी संघटनांचा आवाज दणाणणार आहे. २२ संघटनांनी त्यासाठी एकजूट केली असून ७ डिसेंबरला नागपूर येथे संयुक्त महामोर्चा काढला जाणार आहे.

ठळक मुद्दे राज्यातील विविध २२ संघटनांची एकजूट 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासींच्या प्रश्नांवर सतत दुर्लक्ष होत असल्याने येत्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर आदिवासी संघटनांचा आवाज दणाणणार आहे. २२ संघटनांनी त्यासाठी एकजूट केली असून ७ डिसेंबरला नागपूर येथे संयुक्त महामोर्चा काढला जाणार आहे. त्यादृष्टीने विविध संघटनांनी माेर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न गंभीर स्वरुपाचे असूनही व संघटनांनी पाठपुरावा करूनही शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विधानभवनावर महामोर्चा काढला जाणार आहे.

यात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, बिरसा क्रांती दल, आफ्रोट, बिरसा ब्रिगेड, गोंडवाणा गणतंत्र पार्टी, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य आदिवासी जंगल कामगार सहकारी संघ, आदिवासी बचाव समिती, हलबा हलबी कर्मचारी संघटना, आदिवासी विकास परिषद, आदिवासी विद्यार्थी परिषद, आदिवासी महिला परिषद, परधान महासंघ, आदिवासी बचाव अभियान, आदिवासी नोकरवर्ग ठाकूर व ठाकर समाज, उत्कर्ष संस्था, तोफ यासह अनेक संघटना सहभागी होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जगदिश बहिरा प्रकरणात ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार  गैरआदिवासी कर्मचाऱ्यांना  सेवामुक्त न करता त्यांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले.  खऱ्या आदिवासींची भरती प्रक्रियाही अर्धवट आहे. याबाबत आदिवासींमध्ये संताप आहे. आता गैरआदिवासी कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण देण्यासाठी ना. छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेत अभ्यासगट नेमण्यात आला आहे. या अभ्यासगटालाही आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.

आता अशा समस्यांना वाचा फोडण्यासाठी दिवाळीच्या दिवसात आमदार-खासदारांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. पदोन्नतीमधील आरक्षण, आदिवासींच्या रिक्त जागांचा अनुशेष तात्काळ भरण्यात याव्या, वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांच्या बिंदूनामावलीची चौकशी करणे, आदिवासी संशोधन परिषदेतील कंत्राटी भरती बंद करणे व कायम स्वरुपी भरती करणे, आदिवासी विकास विभागातील गैरव्यवहारांची चौकशी करणे, क्वेस्ट संस्था बरखास्त करणे, आदिवासी विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आमदारांची उपसमिती तत्काळ नेमणे आदी मागण्यांसाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे.विविध समस्यांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे १० महिन्यांपासून वेळ मागत आहोत. परंतु, अद्यापही प्रतिसाद मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ जुलै २०१७ च्या निर्णयाची अमलबजावणीस टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे महामोर्चा काढला जाणार आहे. - प्रा. मधुकर उईके, केंद्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन