शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

भाड्याच्या वास्तूत आदिवासी वसतिगृहे

By admin | Updated: November 8, 2015 02:23 IST

तालुकास्थळीसुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाची एकही ईमारत नसल्याने विद्यार्थ्यांना...

विद्यार्थ्यांची कुचंबणा : शासकीय इमारतीची प्रतीक्षाच, किमान दोन वास्तूंची गरजवणी : तालुकास्थळीसुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाची एकही ईमारत नसल्याने विद्यार्थ्यांना भाड्याच्या ईमारतीतच कोंडवाड्याप्रमाणे गुजराण करून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबना होत असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होणार ?, याचे उत्तर शासनाजवळही उरले नाही.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना इतर उन्नत समाजाबरोबर आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. भारतीय राज्यघटनेतसुद्धा मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद केली गेली आहे. वणी तालुक्यात १४ टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. मात्र या प्रवर्गातील बहुतांश नागरिक अजूनही अज्ञान व गरिबीच्या छाताखालीच गुजराण करीत आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण संस्थेत शिकविण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे सुज्ञ पालक स्वत: शिकले नसले, तरी आपला पाल्य शिकून मोठा व्हावा, त्याच्या कमाईने कुटुंबाचे दारिद्र्य दूर व्हावे, अशी आशा धरून आहे. आदिवासी बांधव आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी शहरातील शाळा, कॉलेजात दाखल करतात. त्यांच्या निवासाची सोय म्हणून शासनाच्या वसतिगृहाकडे पाहिले जाते. दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासाची व्यवस्थाही असावी, अशी त्यांची ईच्छा असते. मात्र वणीमध्ये अशी दर्जेदार व्यवस्था नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्नच आता भंगण्याची वेळ आली आहे. शहरात कधीकाळी दूरसंचार कार्यालयाजवळ शासकीय वसतिगृहाची ईमारत होती. मात्र गेल्या काही वर्षापूर्वी ही इमारत जीर्ण झाल्याने आदिवासी विभागाने वसतिगृहाचा डेरा भाड्याच्या ईमारतीत हलविला. आता या ईमारतीची दारे, खिडक्या व साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. ईमारतीच्या चारही बाजूंनी अतिक्रमणाने विळखा घातला आहे. आदिवासी विभागाने वणीत वसतिगृहाच्या बांधकामाचा विचार का केला नाही, हे समजायला मार्ग नाही. येथे वसतिगृहाच्या ईमारतीसाठी आवश्यक असणारी मोठी शासकीय जागा उपलब्ध आहे. तरीही वसतिगृहाच्या ईमारतीसाठी येथील लोकप्रतिनिधीही प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येते. शहरात भाड्याच्या ईमारती घेऊन वेळोवेळी वसतिगृहाचा डेरा इकडून-तिकडे हलविला जात आहे. दोन-तीन ठिकाणच्या ईमारती भाड्याने घेऊन तेथे एका खोलीत अनेक विद्यार्थ्यांना राहण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होणार, असा प्रश्न आहे. सतत गोंगाट सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. भाड्याच्या वास्तूत पुरेशी स्वच्छता गृहे, भोजन कक्ष, वाचन कक्ष, क्रीडा मैदान यांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना स्वयंपाकगृहातून जेवणाचे डब्बे नेऊन खोलीतच भोजन करावे लागते. वास्तूत वाचनालय नसल्याने अवांतर वाचन करून सामान्य ज्ञान मिळविण्याचा मार्गच बंद झाला. मग आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये तगणार कसे ? त्यामुळे नोकऱ्यांमधील आदिवासींसाठी राखीव असलेल्या अनेक जागा अजूनही रिकाम्या आहेत. शहरात शासकीय वसतिगृहाची प्रशस्त ईमारत नसल्याने आदिवासी पालक विद्यार्थ्यांना वसतिगृहात टाकण्याचा दहादा विचार करतात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना मधूनच शिक्षण सोडून पोटापाण्याला लावले जाते. (स्थानिक प्रतिनिधी)