शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उभ्या शेतात आली बैल चारण्याची वेळ

By admin | Updated: August 20, 2014 23:48 IST

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३३ टक्के पाऊस पडला. तब्बल एक महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यातच उन्हाचा पारा ३४ अंश सेल्सीअस पर्यंत वर चढला आहे. यातून हलक्या

पिके करपायला लागली : भरकाड जमिनीची स्थिती गंभीर, पाऊस गेला कुणीकडे ?ंरुपेश उत्तरवार - यवतमाळजिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३३ टक्के पाऊस पडला. तब्बल एक महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यातच उन्हाचा पारा ३४ अंश सेल्सीअस पर्यंत वर चढला आहे. यातून हलक्या जमिनीतील पिके करपण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील खरिपाचा हंगाम धोक्यात सापडला आहे. यातून जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत. जिल्हयात यावर्षी आठ लाख ५० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. मात्र अपुऱ्या पावसाने मुरमाड जमिनीवरील अडीच लाख हेक्टरवरचे पीक करपण्यास सुरवात झाली आहे. इतर पिकांनी माना टाकल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अपुऱ्या पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. कापसाच्या पात्या गळत आहेत. तर सोयाबीनचा बार झडण्यास सुरवात झाली आहे. जमीनीचा पोेत हलका असलेल्या भागात उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने पिकांनी माना खाली टाकल्या आहेत. पिके वाढण्याच्या सुमारास पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी पूर्णत: खचला आहे. शेतशिवारात जनावरे तर चारावे लागणार नाही ना, अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. काही भागात उशीरा पाऊस दाखल झाला. नंतर त्या ठिकाणी पाण्याचा थेंबही बरसला नाही. या ठिकाणची पिके जमिनीच्या वर उगवले. त्यानंतर ही पिके कोमजन्यास सुरवात झाली. या ठिकाणी पिके हाती येणार किंवा नाही अशी भयावह परिस्थीती निर्माण झाली आहे. ज्वारी, मुग आणि उडीदाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे. पिकांवर औषधी फवारायची म्हटले तर जमिनीत ओलावा असावा लागतो. यानंतरही काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भारी औषधांची फवारणी केली. त्याचा परिणाम पिकांवर झाला. पिके पिवळी पडायला लागली. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.