शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या शेतात आली बैल चारण्याची वेळ

By admin | Updated: August 20, 2014 23:48 IST

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३३ टक्के पाऊस पडला. तब्बल एक महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यातच उन्हाचा पारा ३४ अंश सेल्सीअस पर्यंत वर चढला आहे. यातून हलक्या

पिके करपायला लागली : भरकाड जमिनीची स्थिती गंभीर, पाऊस गेला कुणीकडे ?ंरुपेश उत्तरवार - यवतमाळजिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३३ टक्के पाऊस पडला. तब्बल एक महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यातच उन्हाचा पारा ३४ अंश सेल्सीअस पर्यंत वर चढला आहे. यातून हलक्या जमिनीतील पिके करपण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील खरिपाचा हंगाम धोक्यात सापडला आहे. यातून जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत. जिल्हयात यावर्षी आठ लाख ५० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. मात्र अपुऱ्या पावसाने मुरमाड जमिनीवरील अडीच लाख हेक्टरवरचे पीक करपण्यास सुरवात झाली आहे. इतर पिकांनी माना टाकल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अपुऱ्या पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. कापसाच्या पात्या गळत आहेत. तर सोयाबीनचा बार झडण्यास सुरवात झाली आहे. जमीनीचा पोेत हलका असलेल्या भागात उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने पिकांनी माना खाली टाकल्या आहेत. पिके वाढण्याच्या सुमारास पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी पूर्णत: खचला आहे. शेतशिवारात जनावरे तर चारावे लागणार नाही ना, अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. काही भागात उशीरा पाऊस दाखल झाला. नंतर त्या ठिकाणी पाण्याचा थेंबही बरसला नाही. या ठिकाणची पिके जमिनीच्या वर उगवले. त्यानंतर ही पिके कोमजन्यास सुरवात झाली. या ठिकाणी पिके हाती येणार किंवा नाही अशी भयावह परिस्थीती निर्माण झाली आहे. ज्वारी, मुग आणि उडीदाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे. पिकांवर औषधी फवारायची म्हटले तर जमिनीत ओलावा असावा लागतो. यानंतरही काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भारी औषधांची फवारणी केली. त्याचा परिणाम पिकांवर झाला. पिके पिवळी पडायला लागली. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.