शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

उभ्या शेतात आली बैल चारण्याची वेळ

By admin | Updated: August 20, 2014 23:48 IST

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३३ टक्के पाऊस पडला. तब्बल एक महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यातच उन्हाचा पारा ३४ अंश सेल्सीअस पर्यंत वर चढला आहे. यातून हलक्या

पिके करपायला लागली : भरकाड जमिनीची स्थिती गंभीर, पाऊस गेला कुणीकडे ?ंरुपेश उत्तरवार - यवतमाळजिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३३ टक्के पाऊस पडला. तब्बल एक महिन्यापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यातच उन्हाचा पारा ३४ अंश सेल्सीअस पर्यंत वर चढला आहे. यातून हलक्या जमिनीतील पिके करपण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्हयातील खरिपाचा हंगाम धोक्यात सापडला आहे. यातून जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत. जिल्हयात यावर्षी आठ लाख ५० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. मात्र अपुऱ्या पावसाने मुरमाड जमिनीवरील अडीच लाख हेक्टरवरचे पीक करपण्यास सुरवात झाली आहे. इतर पिकांनी माना टाकल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अपुऱ्या पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. कापसाच्या पात्या गळत आहेत. तर सोयाबीनचा बार झडण्यास सुरवात झाली आहे. जमीनीचा पोेत हलका असलेल्या भागात उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने पिकांनी माना खाली टाकल्या आहेत. पिके वाढण्याच्या सुमारास पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी पूर्णत: खचला आहे. शेतशिवारात जनावरे तर चारावे लागणार नाही ना, अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. काही भागात उशीरा पाऊस दाखल झाला. नंतर त्या ठिकाणी पाण्याचा थेंबही बरसला नाही. या ठिकाणची पिके जमिनीच्या वर उगवले. त्यानंतर ही पिके कोमजन्यास सुरवात झाली. या ठिकाणी पिके हाती येणार किंवा नाही अशी भयावह परिस्थीती निर्माण झाली आहे. ज्वारी, मुग आणि उडीदाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे. पिकांवर औषधी फवारायची म्हटले तर जमिनीत ओलावा असावा लागतो. यानंतरही काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भारी औषधांची फवारणी केली. त्याचा परिणाम पिकांवर झाला. पिके पिवळी पडायला लागली. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.