शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

खेड्यातील उर्दू माध्यमाच्या मुलींवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

माध्यमिक शिक्षणाचे वांधे, आठवीनंतर शाळाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागात उर्दू विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी घराजवळ शाळाच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना अचानक माध्यम बदलण्याची आणि मुलींना तर चक्क शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी शिक्षकांनी शिक्षणमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.

राज्यात जिल्हा परिषदेच्या १७४६, नगर परिषदांच्या २८३ आणि महापालिकांच्या ६४६ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. महापालिका वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुतांश शाळा खेड्यापाड्यात आहेत. तेथे प्राथमिक किंवा फार तर उच्च प्राथमिक स्तरापर्यंतचे शिक्षण आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण उर्दूतून घेतल्यानंतर अचानक माध्यमिकसाठी मराठी माध्यम घ्यावे लागते. या माध्यम बदलाने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. मुलींच्या बाबतीत तर ही परिस्थिती अत्यंत विदारक बनते. खेड्यातील जिल्हा परिषद शाळेत सातवी-आठवीपर्यंत उर्दूतून शिक्षण घेतल्यानंतर नववी-दहावीसाठी त्यांना तालुक्याच्या शाळेत जाणे कठीण जाते. अनेक पालक पाठविण्यासही राजी होत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विनाअट नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मंगळवारी मुंबईत प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.

तीन वर्षांपासून केवळ आश्वासनेमहाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना गेल्या तीन वर्षांपासून ही मागणी लावून धरत आहे. तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी तर ‘आठ दिवसात आदेशच निघेल’, असे आश्वासन दिले होते. ते आठ दिवस अजूनही संपलेले नाहीत अन् आदेश काही निघालेले नाहीत. महाविकास आघाडी शासनाने तरी ही अडचण लक्षात घेऊन नववी व दहावीचे वर्ग सुरू करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.