शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यातील उर्दू माध्यमाच्या मुलींवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

माध्यमिक शिक्षणाचे वांधे, आठवीनंतर शाळाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागात उर्दू विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी घराजवळ शाळाच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना अचानक माध्यम बदलण्याची आणि मुलींना तर चक्क शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याची मागणी शिक्षकांनी शिक्षणमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.

राज्यात जिल्हा परिषदेच्या १७४६, नगर परिषदांच्या २८३ आणि महापालिकांच्या ६४६ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. महापालिका वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुतांश शाळा खेड्यापाड्यात आहेत. तेथे प्राथमिक किंवा फार तर उच्च प्राथमिक स्तरापर्यंतचे शिक्षण आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण उर्दूतून घेतल्यानंतर अचानक माध्यमिकसाठी मराठी माध्यम घ्यावे लागते. या माध्यम बदलाने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. मुलींच्या बाबतीत तर ही परिस्थिती अत्यंत विदारक बनते. खेड्यातील जिल्हा परिषद शाळेत सातवी-आठवीपर्यंत उर्दूतून शिक्षण घेतल्यानंतर नववी-दहावीसाठी त्यांना तालुक्याच्या शाळेत जाणे कठीण जाते. अनेक पालक पाठविण्यासही राजी होत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विनाअट नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मंगळवारी मुंबईत प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.

तीन वर्षांपासून केवळ आश्वासनेमहाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना गेल्या तीन वर्षांपासून ही मागणी लावून धरत आहे. तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी तर ‘आठ दिवसात आदेशच निघेल’, असे आश्वासन दिले होते. ते आठ दिवस अजूनही संपलेले नाहीत अन् आदेश काही निघालेले नाहीत. महाविकास आघाडी शासनाने तरी ही अडचण लक्षात घेऊन नववी व दहावीचे वर्ग सुरू करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.