शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वणी वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

वणी वनपरिक्षेत्रातील गोडगाव (ईजासन) भागातील कक्ष क्रमांक नऊमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर वाघाने शनिवारी गोडगाव येथील देवीदास विठ्ठल निब्रड यांच्या चराईसाठी जंगलात गेलेल्या गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. या घटनेवरून २४ तास लोटत नाही तोच, रविवारी गोडगाव येथीलच संजय काळे यांच्या मालकीची गाईवर हल्ला चढवून तिला ठार मारले.

ठळक मुद्देअनेक गावे दहशतीखाली : गोडगाव भागात दोन दिवसांमध्ये दोन गाईंचा फडशा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून वणी वनपरिक्षेत्रात वाघांकडून पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले केले जात असल्याने अनेक गावांमध्ये दहशतीचे वातावरण असतानाच शनिवारी व रविवारी लागोपाठ वाघाने गोडगाव भागात दोन गायींचा फडशा पाडला. विशेष म्हणजे सन २०१५ मध्ये याच गावातील एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले होते.वणी वनपरिक्षेत्रातील गोडगाव (ईजासन) भागातील कक्ष क्रमांक नऊमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर वाघाने शनिवारी गोडगाव येथील देवीदास विठ्ठल निब्रड यांच्या चराईसाठी जंगलात गेलेल्या गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. या घटनेवरून २४ तास लोटत नाही तोच, रविवारी गोडगाव येथीलच संजय काळे यांच्या मालकीची गाईवर हल्ला चढवून तिला ठार मारले. विशेष म्हणजे देवीदास निब्रड यांच्या गाईवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या घटनास्थळापासून केवळ ७० मिटरवर ही घटना घडली. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील अनेक गावे दहशतीखाली आली आहेत. वाघाच्या भीतीने नागरिक जंगलात, शेतशिवारात जाणे टाळत आहेत. घटनेची माहिती मिळताच, वणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजने व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. देवीदास निब्रड यांची गाईवर ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, तेथे चार ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, तर संजय काळे यांच्या गाईवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथे दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वन विभाग वाघाच्या हालचालीवर ‘वॉच’ ठेवून आहे.वणी वनपरिक्षेत्रात तीन वाघांचा वावर असून तीन दिवसांपूर्वी पुनवट शेतशिवारात कापूस वेचत असलेल्या महिलेला वाघाने दर्शन दिले होते. त्यामुळे या परिसरातही वाघाची दहशत आहे. वाढते व्याघ्रहल्ले लक्षात घेता, वन विभागाने सतर्कता बाळगली असून ज्या परिसरात वाघाचा वावर आहे, त्या परिसरात गस्त वाढविली आहे. गोडगाव या गावापासून घटनास्थळ केवळ तीन किलोमिटर अंतरावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे पथक गेल्या दोन दिवसांपासून गोडगाव जंगल परिसरात गस्त घालत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना या पथकाकडून दिल्या जात आहेत. गोडगावलगतचे जंगल घनदाट असून या जंगलात रोही, रानडुकरांची संख्या मोठी आहे. जंगलात पाणवठे असल्याने वाघाला हे जंगल सर्वदृष्टया सुरक्षित वाटत असल्याने हा वाघ याच जंगलात भटकत आहेत. जंगली श्वापदांसोबतच जंगलात चराईसाठी येणाºया पाळीव जनावरांनाही या वाघाने लक्ष्य बनविले आहे.चराईसाठी जनावरे नेण्यास केली मनाई४शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस गोडगावच्या जंगलात गाईवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार मारले. या पार्श्वभूमीवर वन विभागाने पाळीव जनावरे संबंधित जंगलात नेण्यास मज्जाव केला असून दुसºया जंगलात चराईसाठी जनावरे न्यावी, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :forestजंगल