शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खळ्यांची जागा घेतली मळणी यंत्राने

By admin | Updated: November 17, 2014 23:02 IST

पूर्वीच्या काळी ज्वारीची मळणी करण्यासाठी बैलांचा वापर केल्या जात असे. यंत्राचा वापर केवळ कारखान्यातच होत होता. पण अलीकडे काळ बदलला असून आधुनिक काळात हळूहळू शेतीत यंत्रांचा वापर

पुसद : पूर्वीच्या काळी ज्वारीची मळणी करण्यासाठी बैलांचा वापर केल्या जात असे. यंत्राचा वापर केवळ कारखान्यातच होत होता. पण अलीकडे काळ बदलला असून आधुनिक काळात हळूहळू शेतीत यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आता धान्य मळणीची कामे शेतात जोरात सुरू असून शेतातील खळ््याची जागा मळणी यंत्राने घेतली आहे. मजुरांच्या हातांना मात्र कामे राहिले नाहीत.पूर्वीपासून विदर्भात ज्वारीचे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. पूर्वी ज्वारीची मळणी बैलांच्या साहाय्याने होत होती. या पद्धतीमध्ये बैलांच्या खुरांच्या साहाय्याने कणसे मळली जायची. त्यासाठी शेतकऱ्यांना बराच कालावधी लागायचा. पण आता काळ बदलला आहे. आधुनिक काळात आता सर्व धानरू पिकांची मळणी थ्रेशर मशीनव्दारे होत असून, थ्रेशर मशीनला आता शेतीत अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. थे्रशर मशीनच्या वापरामुळे खेड्यातील सुशिक्षित बेरोजगारांनासुद्धा एकीकडे व्यवसाय प्राप्त झाला आहे तर दुसरीकडे वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मजुरांच्या हातांना काम मिळेनासे झाले आहे. शेतकरी आता बरीचशी कामे ट्रॅक्टरच्याच सहाय्याने करताना दिसतात. ट्रॅक्टरमुळे कमी वेळात शेतीच्या मशागतीची कामे व्यवस्थित व सुलभ हाताना दिसतात. तसेच ट्रॅक्टरव्दारे मळणी यंत्रेसुद्धा चालविली जातात. ग्रामीण भागातील पात्र व सुशिक्षित बेरोजगारांना ट्रॅक्टर व मळणी यंत्र विकत घेण्यासाठी शासनाने सबसिडीवर निधी उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील बेकारीवर काही प्रमाणात अंकुश लावता येईल व तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शासनाने कर्ज उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुलभ व सुटसुटीत करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)