शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडच्या तिघांची एमपीएससी परीक्षेत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

१९ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये मरसूळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बेबीताई गायकवाड यांची कन्या स्नेहल दीपक राहटे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये स्नेहल राहटे यांची नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून निवड झाली होती. सध्या त्या बार्शिटाकळी (जि. अकोला) नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

ठळक मुद्देपरिस्थितीवर मात करीत यशस्वी, दोन उपजिल्हाधिकारी, तर एक तहसीलदार, तरुणीचा समावेश

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : एमपीएससीच्या ताज्या निकालात तालुक्यातील तिघांनी भरारी घेतली. उमरखेड शहरातील स्नेहल दीपक राहटे व बिटरगाव येथील गौरव साहेबराव इंगोले यांची उपजिल्हाधिकारी म्हणून तर नागापूर येथील निरंजन तुकाराम कदम यांची तहसीलदार पदी निवड झाली. या तिघांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाने उमरखेडचा सन्मान वाढला आहे.१९ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये मरसूळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बेबीताई गायकवाड यांची कन्या स्नेहल दीपक राहटे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये स्नेहल राहटे यांची नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून निवड झाली होती. सध्या त्या बार्शिटाकळी (जि. अकोला) नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात येणाऱ्या बिटरगावातील मूळ रहिवासी व नांदेडच्या पिपल्स कॉलेजचे निवृत्त उपप्राचार्य साहेबराव इंगोले यांचा मुलगा गौरव साहेबराव इंगोले यांचीही उपजिल्हधिकारी म्हणून निवड झाली आहे. गौरव इंगोले सध्या कौशल्य विकास सहायक आयुक्त, नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. उमरखेड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागापूर येथील जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम व माजी पंचायत समिती सभापती सविता कदम यांचा पुतण्या निरंजन तुकाराम कदम यांचीही तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत आहे. या तिघांच्या घवघवीत यशामुळे उमरखेड तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.मी आईचे स्वप्न पूर्ण केलेमी उपजिल्हाधिकारी व्हावे हे माझ्या आईचे स्वप्न होते. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी २०१५ पासून परिश्रम घेत आहे. त्याला आज यश मिळाले. या यशाचे श्रेय माझ्या आईलाच आहे.- स्नेहल राहटे,मुख्याधिकारी बार्शिटाकळीशेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झालामाझे काका जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम व माजी सभापती सविताताई कदम उमरखेड तालुक्यात लोकसेवा करत आहे. माझे आईवडील शांताबाई व तुकाराम हे शेती करतात. शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले, याच मला आनंद आहे.- निरंजन कदम, नागापूरविद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावेस्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेताना परीक्षा का द्यायची आहे, हे विद्यार्थ्यांनी निश्चित केले पाहिजे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर समाजाभिमुख कार्य करण्याची मनाची तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित ठेवले तर यश मिळणारच.- गौरव इंगोले, बिटरगाव

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा