शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद ठप्पच

By admin | Updated: April 20, 2017 00:22 IST

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प पडले आहे.

यवतमाळ : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प पडले आहे. विषय समित्यांचे गठन रखडल्याने सर्वच विभागांचा मासीक आढावा गुलदस्त्यात आहे. जानेवारी महिन्यात आचारसंहिता लागू झाली. त्याच महिन्यात तत्कालीन काही विषय समितींची शेवटची बैठक झाली. त्यानंतर अद्याप सर्व विभागांची बैठकच झाली नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिना आचारसंहिता व निवडणुकीत गेला. २३ फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर मार्चमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली. तोपर्यंत जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीविहीन होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवड झाली खरी, मात्र अद्याप समित्यांचे गठन झाले नाही. त्यामुळे दोन सभापती केवळ नाममात्र ठरले. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात कोणत्याच विभागाची मासिक आढावा बैठक झाली नाही. परिणामी जिल्हा परिषद ठप्प पडल्याचे दिसून येत आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश देणे सुरू केले. मात्र संबंधित विभागांचा मासीक आढावा अद्याप कुणीच घेतला नाही. त्यामुळे सर्वच विभाग प्रमुख निर्धास्त आहे. पुन्हा किमान महिनाभर तरी विषय समितीची मासीक बैठक होण्याची शक्यता नाही. समिती गठनानंतरच ती होणार आहे. तोपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसारच कामकाज चालणार आहे. जिल्हा परिषदेचे संपूर्ण नियंत्रण संपूर्णणे प्रशासनाच्या हाती एकवटले आहे. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रशासनाचे ‘कासरे’ आपल्या हातात ओढण्यासाठी प्रयत्नरत आहे. मात्र जोपर्यंत सर्वसाधारण सभा होत नाही, तोपर्यंत प्रशासन वरचढ राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)