शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

समाजकल्याणचे तीन कोटी रुपये गेले परत

By admin | Updated: May 25, 2016 00:02 IST

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी बीडीएस प्रणालीवर आलेले तीन कोटी रुपये परत गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जिल्हा परिषद : वसतिगृहातील आठ हजार विद्यार्थी वाऱ्यावरयवतमाळ : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी बीडीएस प्रणालीवर आलेले तीन कोटी रुपये परत गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध वसतिगृहातील आठ हजार विद्यार्थी वाऱ्यावर आहे. या प्रकाराबाबत पुणे येथील समाज कल्याण आयुक्तांनी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून वसतिगृह चालविले जाते. त्यासाठी संस्थांना प्रति विद्यार्थी ९०० रुपये प्रमाणे अनुदान दिले जाते. समाज कल्याण विभागाकडून वसतिगृह अनुदानासाठी दहा कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली. त्यापैकी तीन कोटी ४४ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले. ही रक्कम बीडीएस प्रणालीवर आल्यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्यांनी खात्यात वळती करुन घेणे आवश्यक होते. मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले. परिणामी ही रक्कम शासन जमा झाली. मार्च २०१५ पासून ते मे २०१६ पर्यंत वसतिगृहांसाठी एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे वसतिगृह चालक विद्यार्थ्यांना कोणतीच सुविधा देत नाही. अतिशय बिकट परिस्थितीत या विद्यार्थ्यांना येथे रहावे लागत आहे.पुणे येथे नुकतीच समाज कल्याण आयुक्तांनी बैठक घेतली. या बैठकीत समाज कल्याण अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची माहिती असून समाज कल्याण आयुक्तांनी याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच २०१५-१६ या आर्थिक वर्षात एकाही वस्तूची खरेदी करण्यात आली नाही. बजेटमध्ये प्रस्तावित निधी अखर्चित आहे. निविदा प्रक्रिया झाली, पुरवठा आदेश दिला. त्यावरच भलावन केली जात आहे. समाज कल्याण विभागातील अनागोंदी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (कार्यालय प्रतिनिधी)जिल्हा परिषद समाज कल्याण आणि अनागोंदी हे समीकरणच झाले आहे. या विभागातून अनेक योजना चालविल्या जातात. परंतु येथील वेळ काढू धोरण लाभार्थ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृह अनुदानाप्रमाणेच शिष्यवृत्तीसुद्धा मिळालेली नाही. शैक्षणिक सत्र संपून दोन महिने झाले तरी कोणीच दखल घ्यायला तयार नाही. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक सत्रात तीन वेळा वाटप करण्याचे निर्देश आहे. मात्र समाज कल्याण अधिकाऱ्यांनी एकदाही शिष्यवृत्ती दिलेली नाही. वसतिगृह अनुदानाची रक्कम ३१ मार्च रोजी उशिरा बीडीएस प्रणालीवर आली. तांत्रिक अडचणीमुळे लिंक कॅरी फॉरवर्ड करता आली नाही. त्यामुळे पैसे परत गेले. याबाबत आयुक्तांनी केलेल्या विचारणेला उत्तरही देण्यात आले आहे. आता अनुदानाचे एक कोटी रुपये आले असून थकबाकी देणे सुरू आहे.- जया राऊतसमाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद