शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
4
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
5
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
6
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
7
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
8
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
9
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
10
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
11
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
12
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
13
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
14
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
15
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
16
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
17
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
19
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
20
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

जिल्ह्यातील धरणे भागविणार मराठवाड्याची तहान

By admin | Updated: September 10, 2015 03:00 IST

मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील धरणांमधून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविण्याची सरकारची योजना आहे.

यवतमाळ : मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील धरणांमधून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील काही धरणांवर सरकारची नजर आहे. या धरणांमधून मराठवाड्याची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठवाड्यात निसर्गाने दगा दिल्याने यंदा प्रचंड दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सिंचन आणि जनावरांसाठी पाणी तर दूर माणसांनाही पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. या दुष्काळाने राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारची चिंता वाढविली आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी नवनवीन उपाययोजना शोधल्या जात आहे. मराठवाड्याला लागून असलेल्या आणि रेल्वे ट्रॅकच्या जवळपास असलेल्या विदर्भातील धरणांचा आढावा घेतला जात आहे. विदर्भातील कोणते मोठे प्रकल्प भरले, त्यात किती पाणीसाठा आहे आणि या धरणापासून जवळचे रेल्वे स्टेशन कोणते यावर अभ्यास केला जात आहे. अर्थात रेल्वेने मराठवाड्यात पाणी पोहोचविण्याची सरकारची योजना आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याचेही योगदान राहणार आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाबाबत सरकारचा विचार सुरू आहे. बेंबळा धरणापासून अवघ्या २५ ते ३० किलोमीटर अंतरावर धामणगाव रेल्वे स्टेशन आहे. धरणातील पाणी टँकरने या स्टेशनपर्यंत पोहोचवून तेथून वॅगनद्वारे ते मराठवाड्यात नेण्याचा विचार केला जात आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बेंबळा प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. कालव्याद्वारे हे पाणी वर्धा जिल्ह्यातील रेल्वे ट्रॅकचे अंतर गाठू शकते का या दृष्टीनेही चाचपणी केली जात आहे. मराठवाड्यात रेल्वेने पाणी पोहोचविण्याच्या दृष्टीने मारेगाव तालुक्यातील नवरगाव, पुसद तालुक्यातील उर्ध्व पैनगंगा नदीवरील इसापूर या धरणांचाही विचार केला जाऊ शकतो. नवरगाव हा मध्यम प्रकल्प असून निर्गुडा नदी काठावरील गावांची तहान भागवितो. येथून रेल्वे ट्रॅक ३० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. हे धरण सध्या ६५ टक्के भरले आहे. त्यातील पाण्याचा सिंचनासाठी फार उपयोग होत नाही. पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथेही धरण आहे. मात्र तेथून रेल्वे ट्रॅक बराच दूर आहे. इसापूर धरणापासून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीला ३० किलोमीटरवर रेल्वे ट्रॅक असल्याचे सांगितले जाते. पुसद तालुक्यातील पूस नदीतून पाणी न्यायचे असल्यास १२० किलोमीटर नांदेड व ९० किलोमीटर किनवट एवढे अंतर रेल्वे ट्रॅक गाठण्यासाठी पाण्याची वाहतूक करावी लागणार आहे. जिल्ह्यात दारव्हा तालुक्यातील अडाण, दिग्रसमधील अरुणावती हीसुद्धा मोठी धरणे आहेत. मात्र त्यातील पाणी रेल्वेने पोहोचविणे सरकारला परवडणारे नाही. (जिल्हा प्रतिनिधी)