शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

२०४७ गावांमध्ये टंचाई जाहीर

By admin | Updated: July 3, 2014 23:48 IST

जिल्ह्यात मागील वर्षातील खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार ४७ गावांचा

यवतमाळ : जिल्ह्यात मागील वर्षातील खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार ४७ गावांचा समावेश आहे. टंचाई घोषित झालेल्या गावांमध्ये शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या सवलती देण्यात येणार असून तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यासाठी खरीप हंगाम निराशाजनक गेला. बहुतांश शेतकऱ्यांना चांगल्या शेतीमालाची अपेक्षा असताना उत्पादनात घट आली. त्यामुळे या हंगामात जिल्ह्याची पैसेवारीही घसरली. जिल्ह्यातील ज्या गावांची गेल्या वर्षीच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. टंचाई घोषित गावांमध्ये यवतमाळ तालुक्यातील १३६ गावांचा समावेश आहे. कळंब तालुक्यातील १४०, बाभूळगाव १२७, आर्णी १०६, दारव्हा १४६, दिग्रस ८१, नेर १२१, पुसद १८८, उमरखेड १३६, महागाव ११४, केळापूर १३१, घाटंजी १०७, राळेगाव १३२, वणी १५७, मारेगाव १०८ आणि झरीजामणी तालुक्यातील ११७ गावांचा समावेश आहे. टंचाई घोषित गावांमध्ये आठ प्रकारच्या अतिरिक्त सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये जमिनी महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रूपांतरण, शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, वीज बिलात ३३ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाईग्रस्त गावात शेतीपंपाची वीज जोडणी खंडित करण्यात येणार नाही आदी बाबींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)