शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

डिमांड भरूनही वीज जोडणी नाही

By admin | Updated: January 19, 2017 01:16 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे.

महावितरणचे दुर्लक्ष : वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मनस्ताप वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे. मात्र वीज जोडणीचे डिमांड नोट भरूनही अद्याप शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. अनेक शेतकरी कार्यालयात उंबरठे झिजवत असूनसुद्धा त्यांना कार्यालयातील कर्मचारी ‘सर्कल झोन’चे नाव सांगून परत पाठवित आहेत. ‘आमच्या कार्यालयात कोणतीही माहिती नाही’, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोअरवेल, शेततळे, विहिरी असून पाण्याचा उपयोग घेता येत नाही. त्यामुळे या सुविधा कोणत्या कामाच्या, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी शेतकऱ्यांना योजनाचे नाव समोर करून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा देखावा करतात. यवतमाळ जिल्ह्याची ‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ या नावाने ओळख बनली आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहिर, शेततळे ही योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी शेतात विहिरी, शेततळे खोदले. मात्र पिकांना पाणी देण्यासाठी वीज जोडणी न झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी पावसाने मध्येच दगा दिल्याने खरीपाची पिके वाळू लागली आहे, तर रबी पिकांची वाढ झालीच नाही. यावर्षी कपाशीचे भाव चांगले असले तरी उत्पादनात घट झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतात वीज कनेक्शन मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळून शेतातील पिके वाचवू शकतात. गहू, हरभरा या पिकांच्या उत्पादनातही घट होणार आहे, असा अंदाज काही शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीवर अजुनही वीज कनेक्शन मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. अधिकारी बैठका घेऊन कागदोपत्री मोकळे होतात. परंतु कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा धोरणामुळे अर्ज कार्यालयातच प्रलंबित असतात. शेतकरी कार्यालयाच्या येरझारा मारून त्रस्त झाले आहे. कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या, असे सांगण्यात येत आहे. मात्र कंत्राटदार वीज कनेक्शनचे काम केव्हा सुरू करणार की, पावसाळ्याची प्रतीक्षा करणार, असा प्रश्न आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना वीज जोडणी करून देण्यात यावी, अशी मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)