शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

डिमांड भरूनही वीज जोडणी नाही

By admin | Updated: January 19, 2017 01:16 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे.

महावितरणचे दुर्लक्ष : वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मनस्ताप वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे. मात्र वीज जोडणीचे डिमांड नोट भरूनही अद्याप शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. अनेक शेतकरी कार्यालयात उंबरठे झिजवत असूनसुद्धा त्यांना कार्यालयातील कर्मचारी ‘सर्कल झोन’चे नाव सांगून परत पाठवित आहेत. ‘आमच्या कार्यालयात कोणतीही माहिती नाही’, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोअरवेल, शेततळे, विहिरी असून पाण्याचा उपयोग घेता येत नाही. त्यामुळे या सुविधा कोणत्या कामाच्या, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी शेतकऱ्यांना योजनाचे नाव समोर करून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा देखावा करतात. यवतमाळ जिल्ह्याची ‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ या नावाने ओळख बनली आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहिर, शेततळे ही योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी शेतात विहिरी, शेततळे खोदले. मात्र पिकांना पाणी देण्यासाठी वीज जोडणी न झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी पावसाने मध्येच दगा दिल्याने खरीपाची पिके वाळू लागली आहे, तर रबी पिकांची वाढ झालीच नाही. यावर्षी कपाशीचे भाव चांगले असले तरी उत्पादनात घट झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतात वीज कनेक्शन मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळून शेतातील पिके वाचवू शकतात. गहू, हरभरा या पिकांच्या उत्पादनातही घट होणार आहे, असा अंदाज काही शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीवर अजुनही वीज कनेक्शन मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. अधिकारी बैठका घेऊन कागदोपत्री मोकळे होतात. परंतु कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा धोरणामुळे अर्ज कार्यालयातच प्रलंबित असतात. शेतकरी कार्यालयाच्या येरझारा मारून त्रस्त झाले आहे. कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या, असे सांगण्यात येत आहे. मात्र कंत्राटदार वीज कनेक्शनचे काम केव्हा सुरू करणार की, पावसाळ्याची प्रतीक्षा करणार, असा प्रश्न आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना वीज जोडणी करून देण्यात यावी, अशी मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)