शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

डिमांड भरूनही वीज जोडणी नाही

By admin | Updated: January 19, 2017 01:16 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे.

महावितरणचे दुर्लक्ष : वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मनस्ताप वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे. मात्र वीज जोडणीचे डिमांड नोट भरूनही अद्याप शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. अनेक शेतकरी कार्यालयात उंबरठे झिजवत असूनसुद्धा त्यांना कार्यालयातील कर्मचारी ‘सर्कल झोन’चे नाव सांगून परत पाठवित आहेत. ‘आमच्या कार्यालयात कोणतीही माहिती नाही’, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोअरवेल, शेततळे, विहिरी असून पाण्याचा उपयोग घेता येत नाही. त्यामुळे या सुविधा कोणत्या कामाच्या, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी शेतकऱ्यांना योजनाचे नाव समोर करून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा देखावा करतात. यवतमाळ जिल्ह्याची ‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ या नावाने ओळख बनली आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहिर, शेततळे ही योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी शेतात विहिरी, शेततळे खोदले. मात्र पिकांना पाणी देण्यासाठी वीज जोडणी न झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी पावसाने मध्येच दगा दिल्याने खरीपाची पिके वाळू लागली आहे, तर रबी पिकांची वाढ झालीच नाही. यावर्षी कपाशीचे भाव चांगले असले तरी उत्पादनात घट झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतात वीज कनेक्शन मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळून शेतातील पिके वाचवू शकतात. गहू, हरभरा या पिकांच्या उत्पादनातही घट होणार आहे, असा अंदाज काही शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीवर अजुनही वीज कनेक्शन मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. अधिकारी बैठका घेऊन कागदोपत्री मोकळे होतात. परंतु कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा धोरणामुळे अर्ज कार्यालयातच प्रलंबित असतात. शेतकरी कार्यालयाच्या येरझारा मारून त्रस्त झाले आहे. कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या, असे सांगण्यात येत आहे. मात्र कंत्राटदार वीज कनेक्शनचे काम केव्हा सुरू करणार की, पावसाळ्याची प्रतीक्षा करणार, असा प्रश्न आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना वीज जोडणी करून देण्यात यावी, अशी मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)