शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

निधी आहे, पण मंजुरी नाही

By admin | Updated: October 19, 2015 00:20 IST

जिल्हा नियोजन समितीकडे स्वत:चा निधी उपलब्ध असतानाही त्यातील विकासाच्या कामांना गेल्या चार महिन्यांपासून मंजुरी दिली न गेल्याने शासकीय यंत्रणेत अस्वस्थता पहायला मिळते.

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीकडे स्वत:चा निधी उपलब्ध असतानाही त्यातील विकासाच्या कामांना गेल्या चार महिन्यांपासून मंजुरी दिली न गेल्याने शासकीय यंत्रणेत अस्वस्थता पहायला मिळते. याच मुद्यावर २५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेली ‘डीपीसी’ची बैठक गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहे.राज्यात भाजप-सेना युती शासन सत्तेत आल्यापासून विकास कामांच्या निधीची प्रचंड चणचण जाणवत असल्याचा अधिकाऱ्यांमधील सूर आहे. विकास कामांचे विविध विभागातील शेकडो कोटी रुपयांचे प्रस्ताव, अंदाजपत्रक तयार आहेत. अनेक कामांना प्रशासकीय मंजूरीही मिळाली आहे. मात्र या कामांसाठी शासनाकडून निधीच प्राप्त झालेला नाही. नवी कामे तर दूर कालव्यांच्या डागडुजीसाठीही पैसा नाही. तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीकडे स्वत:चा पैसा आहे. ‘डीपीसी फंड’ म्हणून त्याची ओळख आहे. मात्र त्यानंतरही गेल्या चार महिन्यांपासून डीपीसीच्या निधीतील विकास कामांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आलेली नाही. ही मंजूरी हेतुपुरस्सर तर थांबविली जात नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. निधी असताना गेल्या चार महिन्यांपासून शासनाच्या विविध विभागांना विकास कामासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या संथगतीने सुरू असलेल्या डीपीसीच्या कारभारावर राजकीयस्तरावरून आक्षेपही घेतला जात आहे. निधी असूनही मंजूरी थांबविण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. आता २५ आॅक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. या बैठकीत चार महिन्यांपासून रखडलेले विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. युती सरकारमध्ये विकास कामे होत नाहीत, जनतेचे प्रश्न सुटत नसल्याचा खुद्द अधिकारी वर्गातील सूर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना निवडून आणणारे आणि त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन मते मागणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही त्रस्त झाले आहेत. कारण त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सुचविलेल्या उमेदवाराला मते देणारी जनता आता या कार्यकर्त्यांनाच जाब विचारत आहे. निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या या कार्यकर्त्यांनाच आता लोकप्रतिनिधी दूर लोटत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. या कार्यकर्त्यांऐवजी ‘मार्जीन’ची कामे घेऊन येणारे कंत्राटदार या लोकप्रतिनिधींना जवळचे वाटत आहेत. त्यामुळे या सामान्य कार्यकर्त्यांची कोंडी झाली असून तोंड लपविण्याची वेळ आली आहे.