शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक फिरताहेत गावोगाव !

By admin | Updated: July 15, 2014 00:13 IST

पांढरकवडा : पांढरकवडा व पुसद विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची प्रचंड दैनावस्था पुढे आली आहे. तीन आठवडे होऊनही या शाळा सुरू झालेल्या नाहीत.

प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा पांढरकवडा : पांढरकवडा व पुसद विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची प्रचंड दैनावस्था पुढे आली आहे. तीन आठवडे होऊनही या शाळा सुरू झालेल्या नाहीत. शाळांमध्ये नोंदणी असलेले विद्यार्थीच अद्याप फिरकलेले नाहीत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शिक्षक व शाळेचे कर्मचारी फिरत आहे. सदर प्रतिनिधीने सोमवार १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील वांजरी येथे आदिवासी आश्रमशाळेला भेट दिली. महाकाली आदिवासी विकास संस्था, झटाळाच्यावतीने वांजरी येथे ही प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा चालविली जाते. तेथे वर्ग १ ते १० चे ४०९ विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. परंतु प्रत्यक्षात आज तेथे १५ ते २० विद्यार्थी आणि तीन ते चार शिक्षक हजर आढळले. शाळेत इतरत्र सर्व शुकशुकाट होता. प्राथमिकचे मुख्याध्यापक एच.एम. मांडवगडे व माध्यमिकचे एम.के. वानखडे उपस्थित होते. शाळेत विद्यार्थी होते, मात्र आखाडी निमित्त ते गावाला गेल्याचे या मुख्याध्यापकांनी सांगितले. शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता, ते परिसरातील खेड्यांवर विद्यार्थ्यांना आणायला गेल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी नजीकच्या चालबर्डी येथील खासगी आश्रमशाळांचे पाच ते सहा विद्यार्थी पेटी-दप्तर घेऊन दिसले. त्यांना विचारणा केली असता आम्ही सुटीवर गावाकडे जात असल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले. अशीच अवस्था तालुक्यातील वाघोलीच्या शाळेवर दिसून आली. स्व. देवराव गेडाम प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा वाघोली येथे सदर प्रतिनिधीने दुपारी १ वाजता भेट दिली. तेथे सर्व वर्ग खोल्या बंदच दिसल्या. ३६६ विद्यार्थ्यांची नोंद असली तरी प्रत्यक्षात अवघे बोटावर मोजण्याऐवढे उपस्थित होते. प्राथमिक मुख्याध्यापक रजेवर होते. तर प्रभारी माध्यमिक मुख्याध्यापक एम.केळझरकर यांनी आखाडीमुळे विद्यार्थी गावाला गेल्याचे सांगितले. आपल्या शाळेत तीन दिवसांपूर्वी १८४ विद्यार्थी हजर असल्याबाबतचे विस्तार अधिकाऱ्यांच्या भेटीतील स्वाक्षरीचे पत्र दाखविले. अतिरिक्त प्रकल्प अधिकारी तथा प्रशासक शिवानंद पेठेकर यांच्या नियंत्रणातील या शाळांची ही अवस्था आहे. या पेक्षाही वाईट अवस्था शासकीय अनुदानित व खासगी आश्रमशाळांची असेल यात शंका नाही. जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थीच नाहीत, त्यांना बळजबरीने शाळेत आणावे लागते. त्यामुळे वर्ग खोल्या बंदच असतात. तासिका होण्याचा प्रश्नच नाही. विद्यार्थीच नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीही शाळेकडे फिरकत नाही. शासकीय सुट्या नियमित घेतल्याच जातात, त्याशिवाय शिक्षक व विद्यार्थी मनमर्जीने वाटेल तेव्हा सुट्या घेतात. त्यांच्यावर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे यावरून दिसून येते. जिल्ह्यातील खासगी आश्रमशाळा या बहुतांश राजकीय नेत्यांच्या आणि त्यातही सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या आहेत. त्यामुळे तेथील गैरप्रकार उघड्या डोळ्यांनी पाहूनही प्रकल्प अधिकारीच काय चक्क अमरावतीचे आदिवासी विकास अपर आयुक्तसुद्धा कारवाईची हिंमत दाखवित नसल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी आश्रमशाळांच्या काही शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पाच ते सहा महिन्यांपासून आपले वेतन मिळाले नसल्याची फिर्याद ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे नोंदविली. पाऊस लांबल्याने बहुतांश आश्रमशाळांमध्ये पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. अशा वेळी बाहेरुन टँकर आणून काम भागवावे लागते. ही टंचाई पाहता विद्यार्थी येऊच नये, अशीच अनेकांची भावना राहते. आश्रमशाळा विलंबाने सुरू होणार असल्यातरी त्यासाठी मिळणाऱ्या अनुदान, साहित्य पुरवठ्याच्या वेळी मात्र विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती दाखविण्याची खबरदारी घेतली जाते. जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा राजकीय नेते, अधिकारी, पुरवठादार आणि यंत्रणेसाठी जणू कुरण ठरले आहेत. पांढरकवडा प्रकल्पाचे १४५ कोटींचे वार्षिक बजेट पाहूनच अधिकाऱ्यांमध्ये पीओसाठी रस्सीखेच चालते. त्यासाठी मोठी ‘रॉयल्टी’ ही भरली जाते. रॉयल्टी हीच या प्रकल्पात पात्रता बनली आहे. (शहर प्रतिनिधी)