शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

गुरुजी प्रशिक्षणाला, शाळेला कुलूप

By admin | Updated: July 12, 2014 23:56 IST

येथून जवळच असलेल्या जवराळा या गावातील जिल्हा परिषद शाळेचे एकमेव शिक्षक गेल्या दहा दिवसांपासून प्रशिक्षणाला गेले आहे. त्यामुळे शाळेला कुलूप आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहे.

बिटरगाव : येथून जवळच असलेल्या जवराळा या गावातील जिल्हा परिषद शाळेचे एकमेव शिक्षक गेल्या दहा दिवसांपासून प्रशिक्षणाला गेले आहे. त्यामुळे शाळेला कुलूप आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहे. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची व्यवस्था व्हावी, यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासन करते. परंतु नियोजनाचा अभाव व अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांची उदासीनता यामुळे शासनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्या जात आहे. पैनगंगेच्या किनाऱ्यावरील घनदाट अभयारण्यात जवराळा या एक हजार लोकवस्तीच्या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. तेथे एक ते पाच वर्ग आहेत. परंतु या पाचही वर्गावर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ एकच गुरुजी आहे. गेल्या दहा दिवसांपासून हे गुरुजीसुद्धा प्रशिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे शाळेला कुलुप आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या अशा कारभारामुळे देशातील भावी पीढिचे भविष्य अंधकारमय झाले आहे. पायाभरणीच कमी असेल तर विद्यार्थ्यांच्या मनात पुढे शिक्षणाची आवड कशी निर्माण होईल. एकीकडे विद्यार्थी शाळेत यावे, पटसंख्या कमी होऊ नये म्हणून शासन प्रयत्न करीत असते. परंतु येथे मात्र विद्यार्थी आहेत पण गुरुजीच नसल्याने पालकवर्ग त्रस्त आहेत. या गावाला आजपर्यंत कधी एसटीचे दर्शनच झाले नाही. तालुक्याला जाण्यासाठी ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास दराटीला जाऊन बस गाठून करावा लागतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून पटसंख्येनुसार शिक्षक देण्यात यावे, अन्यथा शाळा बंद करू, असा इशारा पोलीस पाटील विजय घुले, विजय जाधव, संतोष घुले व अनिल जाधव यांच्यासह गावातील नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)