शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

नळ आले की शिट्टी वाजते..!

By admin | Updated: May 24, 2016 00:11 IST

आज सगळीकडे पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहे. याला आपणच जबाबदार आहोत.

पाणी वाचविण्यासाठी अभिनव शक्कलआर्णीच्या शाखा व्यवस्थापकाने शोधला उपायहरिओम बघेल आर्णीआज सगळीकडे पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले आहे. याला आपणच जबाबदार आहोत. पाण्याची बचत कशी करता येईल, याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अनेकदा गरज नसताना नळ सुरू राहतो. पाणी वाया जाते. आपल्या डोळ्यांना दिसूनही आपण नळ बंद करत नाही. ही बेफिकीरीच आज आपल्या अंगाशी आली आहे. अनेकदा नळाला पाणी कधी आले, कधी गेले, हे आपल्याला माहिती पडत नाही. त्यामुळे विनाकारण बहुमूल्य पाणी वाया जाते. ही परिस्थिती सर्वच गावांमध्ये आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असते. मात्र ही बाब रोखण्यासाठी आर्णीत अभिवन उपाय शोधण्यात आला आहे. आर्णी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची बिकट स्थिती आहे. नळ कधी येतील अन् कधी जातील याचा नेम राहिला नाही. वेळापत्रकच नाही. नळ आल्यानंतर नळाला लावलेले झाकन (कॅप) हवेच्या दाबाने फेकले जाऊन पाणी वाया जाते. त्यामुळे नळ कधीही येतील म्हणून महिला भर उन्हात ताटकळत उभे राहतात. ही बाब पाहून येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेचे व्यवस्थापक पनिधर भावराव आत्राम अस्वस्थ झाले. यावर त्यांनी एक सोपा उपाय शोधून काढला. नळला बसविलेल्या कॅपला त्यांनी एक शिट्टी बसविली. नळ येताना सुरुवातीला पाईपमधून जी हवा बाहेर फेकली जाते, त्याद्वारे शिट्टी वाजू लागते. नळाला पाणी आले हे नागरिकांना तातडीने कळते आणि पाणी वाया जाण्याचा धोका टळतो. शिवाय, नळ कधी येणार म्हणून उन्हात उभे राहून वाट पाहण्याचीही गरज उरली नाही.शहरात आणि गावातही अनेकदा नळावाटे बरेच पाणी वाया जाते. नळ कधी आले हे कळत नसल्याने ही बाब घडते. मात्र नळाच्या कॅपला शिट्टी बसविल्याने आता आम्हाला नळ आला हे लगेच कळते. त्यामुळे पाणी वाया जात नाही.- पनिधर आत्राम, आर्णी