शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

ज्योतिरावांचा लढा पुढे न्या

By admin | Updated: April 12, 2017 00:06 IST

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शेतकऱ्यांची मुलं शाळेत जावी अन् शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती करावी,...

सत्यपाल महाराज : नेर येथे उत्सव समितीतर्फे प्रबोधन कार्यक्रमनेर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शेतकऱ्यांची मुलं शाळेत जावी अन् शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती करावी, यासाठी शाळा उघडल्या. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथाच्या माध्यमातून जोतिरावांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार मांडला. आता शेती करून आत्महत्या करण्यापेक्षा ज्ञानाची उपासना करून जोतिरावांचा लढा पुढे न्या, असे आवाहन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.येथील काळे स्टेडियमवर सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन झाले. महात्मा फुले जयंती उत्सव समितीद्वारा महात्मा फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष वनिता मिसळे, उपाध्यक्ष पवन जयस्वाल, नगरसेवक सुभाष भोयर, उद्योजक संजय ठाकरे आदी उपस्थित होते. सत्यपाल महाराजांनी आपल्या खुमासदार शैलीत विविध विषयांना हात घातला. अनेक प्रश्न विचारून लोकांच्या मनात एक नवी जागृती घडवून आणली. शेतीत जास्तीत जास्त राबण्यापेक्षा छोटे-छोटे व्यवसाय करा, पोरीच्या लग्नात जास्त खर्च करू नका, व्यसने सोडा आणि ज्ञानाची उपासना करा, येणाऱ्या काळात आपणास ज्ञानाची लढाई लढावी लागेल, तरच आपलं भविष्य सुखकर होईल, असे ते म्हणाले. यावेळी येथील पूजा दुधे, वृषाली मेहर या सावित्रीच्या लेकींचा सत्कार करण्यात आला. महात्मा फुले यांच्या स्मारकासाठी जागा दान देणारे सुधीर कुळकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. सत्यपाल महाराजांना मानपत्र देण्यात आले. या मानपत्राचे वाचन विनोद गोबरे यांनी केले. संचालन संतोष अरसोड, प्रास्ताविक संदीप चौधरी, आभार संदीप ठक यांनी मानले. आयोजनासाठी महात्मा फुले जयंती उत्सव समिती कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)