शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

स्वतेज, श्रीतेज अन् शुभ्राला हवे हक्काचे आई-वडील

By admin | Updated: December 17, 2015 02:31 IST

कोणत्याही कुटुंबात मूल जन्माला येणे हा त्या कुटुंबासाठी अतिव आनंदाचा क्षण. मात्र काही अपरिहार्य कारणांनी हा आनंदाचा क्षण नकोसा वाटतो ...

चिमुकल्यांचा टाहो : सापडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांच्या शोधासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडपड यवतमाळ : कोणत्याही कुटुंबात मूल जन्माला येणे हा त्या कुटुंबासाठी अतिव आनंदाचा क्षण. मात्र काही अपरिहार्य कारणांनी हा आनंदाचा क्षण नकोसा वाटतो आणि मुलाला बेवारस सोडून दिले जाते. अशाच स्वतेज, श्रीतेज आणि शुभ्रा या तीन बालकांना आपल्या हक्काच्या आई-वडिलांची प्रतीक्षा आहे. यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्ष धडपडत आहे. दीड महिन्यांपूर्वी लाडखेड, घाटंजी आणि कळंब येथे अनुक्रमे स्वतेज, श्रीतेज आणि शुभ्रा ही तीन बालके बेवारस सोडून दिल्याचे आढळून आले. जन्म होताच या बालकांच्या नशिबी उपेक्षिताचे जीणे आले. काही कळायच्या आत त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आले. ७ नोव्हेंबर रोजी लाडखेड आणि घाटंजी परिसरातील एका शेतात पुरुष जातीचे बाळ स्वतेज आणि श्रीजेत आढळून आले, तर २६ सप्टेंबर रोजी कळंबच्या बसस्थानकावर शुभ्रा सापडली. संपूर्णपणे आईवर अवलंबून असलेल्या या चिमुकल्यांना त्यांची आई सोडून गेली. तीनही ठिकाणच्या पोलिसांनी शोधाशोध केली. परंतु थांगपत्ता लागला नाही. अखेर या बालकांना बालकल्याण समिती यवतमाळच्या आदेशाने संत गाडगे महाराज शिशुगृह वर्धा येथे दाखल करण्यात आले. शिशुगृहातील कर्मचारी या बालकांसाठी आई-वडिलांची भूमिका बजावत आहे. मात्र या तिघांनाही हक्काचे आई-वडील मिळावे म्हणून बालसंरक्षण समितीने पुढाकार घेतला आहे. ज्या कुणाला या बाबत माहिती असेल त्यांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रवी आडे यांनी केले आहे. आणखी एक महिना या बाळांच्या नातेवाईकांची वाट बघण्यात येईल. त्यानंतर बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मुलांना दत्तक विधानाकरिता मुक्त घोषित करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)