शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
2
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
3
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
4
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
5
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
6
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
7
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
8
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
9
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
10
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
11
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
12
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
13
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
14
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
15
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
16
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
17
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
18
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
19
प्रेम, अनैतिक संबंध अन् ३ हत्या! घरात सुरू होती दिवाळीची तयारी, पण पत्नीची एक चूक जीवावर बेतली
20
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स

दैवतांना निरोप देताना प्रदूषणाला पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले.

ठळक मुद्देसंडे अँकर । जलस्त्रोतांमध्ये कचरा, यवतमाळ नगर पालिकेची यंत्रणा करतेय स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गणेशोत्सवाचे दहा दिवस मोठ्या जल्लोषात साजरे झाले. विसर्जनही तेवढ्याच उत्साहात पार पडले. मात्र विसर्जनानंतर गणरायाच्या मूर्तींची अवस्था काय, असा प्रश्न निर्माण व्हावा, असे चित्र शहरानजीकच्या विविध जलस्त्रोतांमध्ये सध्या दिसत आहे. भाविकांनी पाण्यात सोडलेल्या मूर्ती दोन दिवसानंतरही विसर्जित होण्याचीच वाट पाहात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या यंत्रणेलाच त्यांची व्यवस्था करावी लागत आहे.मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या सामान्य नागरिकांनाच हे विचित्र चित्र आढळले, हे विशेष. त्यांनी याबाबत खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, सध्याचे दिवस हे सणावारांचे आहेत. नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले. तेलकट असणारे हे नष्ट न होणारे द्रोण -पत्रावळी पुढे अनेक वर्ष पर्यावरणाचे नुकसान करत राहणार आहे. पाण्यात राहणारे जीव या तेलाच्या तवंगाने आणि द्रोण पत्रावळीच्या कचऱ्याने गुदमरून जाणार आहेत.घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या गणरायाला आम्ही ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत नुकताच निरोप दिला. ढोल ताशांच्या, भजनांच्या गजरात गणराया विसर्जित झाले. आम्ही फार मोठे धार्मिक कार्य संपन्न झाल्याच्या भावनेने कृतकृत्य झालो. आजकाल आमचे लाडके बाप्पा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमधून विराजमान होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला गणपती बाप्पाला विराजमान तर करायचे असते, पण महाग नको म्हणून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमधील बाप्पांना घातक रंगासहीत आम्ही विराजमान करतो.दहा दिवस अगदीच मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर आम्हाला लगबग असते ती बाप्पांना विसर्जित करण्याची. गणरायांना आम्ही सार्वजनिक अथवा नैसर्गिक स्वच्छ जलस्रोतांमध्ये भक्तिभावाने विसर्जित करतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रासायनिक रंगांमुळे गणराया प्रत्यक्षात विसर्जित होतच नाहीत. आम्ही मात्र बाप्पांचे विसर्जन झालेय या पूज्य भावनेने घरी जाऊन प्रसादाचे वाटप करतो. इकडे आमचे लाडके बाप्पा मात्र पाण्यात इतस्तत: पडून विसर्जित होण्याची वाट पाहत आहेत.एरवी प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत काहीच करीत नाहीत असे ओरडणारे आम्ही सर्वत्र प्रदूषण करीत असतो. स्थानिक प्रशासन मात्र विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध मानव यंत्रणेला सोबत घेऊन जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी आणि आमच्या आराध्य गणरायाची विटंबना रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. दैवतांचे देवत्व आणि पर्यावरणाचे संरक्षण हेसुद्धा धार्मिक कार्यच आहे. धर्माचे पालन उन्मादाने नव्हे तर उन्मेषाने केले पाहिजे.- मिलिंद देशपांडेशिक्षक (यवतमाळ)

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन