शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दैवतांना निरोप देताना प्रदूषणाला पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले.

ठळक मुद्देसंडे अँकर । जलस्त्रोतांमध्ये कचरा, यवतमाळ नगर पालिकेची यंत्रणा करतेय स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गणेशोत्सवाचे दहा दिवस मोठ्या जल्लोषात साजरे झाले. विसर्जनही तेवढ्याच उत्साहात पार पडले. मात्र विसर्जनानंतर गणरायाच्या मूर्तींची अवस्था काय, असा प्रश्न निर्माण व्हावा, असे चित्र शहरानजीकच्या विविध जलस्त्रोतांमध्ये सध्या दिसत आहे. भाविकांनी पाण्यात सोडलेल्या मूर्ती दोन दिवसानंतरही विसर्जित होण्याचीच वाट पाहात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या यंत्रणेलाच त्यांची व्यवस्था करावी लागत आहे.मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या सामान्य नागरिकांनाच हे विचित्र चित्र आढळले, हे विशेष. त्यांनी याबाबत खंतही व्यक्त केली. ते म्हणाले, सध्याचे दिवस हे सणावारांचे आहेत. नुकतेच घरोघरी गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन केले गेले. महालक्ष्मी गौरीचे मोठ्या प्रमाणात पूजन करून सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली गेली. महाप्रसादाचे कार्यक्रम झाल्यावर वापरलेले प्लास्टिक, थर्माकोलचे द्रोण पत्रावळी मात्र स्वच्छ वाहत्या पाण्यात टाकून दिले. तेलकट असणारे हे नष्ट न होणारे द्रोण -पत्रावळी पुढे अनेक वर्ष पर्यावरणाचे नुकसान करत राहणार आहे. पाण्यात राहणारे जीव या तेलाच्या तवंगाने आणि द्रोण पत्रावळीच्या कचऱ्याने गुदमरून जाणार आहेत.घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या गणरायाला आम्ही ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत नुकताच निरोप दिला. ढोल ताशांच्या, भजनांच्या गजरात गणराया विसर्जित झाले. आम्ही फार मोठे धार्मिक कार्य संपन्न झाल्याच्या भावनेने कृतकृत्य झालो. आजकाल आमचे लाडके बाप्पा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमधून विराजमान होऊन आमच्याकडे येतात. आम्हाला गणपती बाप्पाला विराजमान तर करायचे असते, पण महाग नको म्हणून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमधील बाप्पांना घातक रंगासहीत आम्ही विराजमान करतो.दहा दिवस अगदीच मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर आम्हाला लगबग असते ती बाप्पांना विसर्जित करण्याची. गणरायांना आम्ही सार्वजनिक अथवा नैसर्गिक स्वच्छ जलस्रोतांमध्ये भक्तिभावाने विसर्जित करतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रासायनिक रंगांमुळे गणराया प्रत्यक्षात विसर्जित होतच नाहीत. आम्ही मात्र बाप्पांचे विसर्जन झालेय या पूज्य भावनेने घरी जाऊन प्रसादाचे वाटप करतो. इकडे आमचे लाडके बाप्पा मात्र पाण्यात इतस्तत: पडून विसर्जित होण्याची वाट पाहत आहेत.एरवी प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत काहीच करीत नाहीत असे ओरडणारे आम्ही सर्वत्र प्रदूषण करीत असतो. स्थानिक प्रशासन मात्र विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध मानव यंत्रणेला सोबत घेऊन जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी आणि आमच्या आराध्य गणरायाची विटंबना रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. दैवतांचे देवत्व आणि पर्यावरणाचे संरक्षण हेसुद्धा धार्मिक कार्यच आहे. धर्माचे पालन उन्मादाने नव्हे तर उन्मेषाने केले पाहिजे.- मिलिंद देशपांडेशिक्षक (यवतमाळ)

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन