शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

१४ हजार सिंचन विहिरींच्या निर्मितीचा मार्ग सुकर

By admin | Updated: November 18, 2014 23:03 IST

शासनाने २०१४ मध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेत जिल्ह्यात १४ हजार सिंचन विहिरी निर्माण करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्धता न झाल्याने

यवतमाळ : शासनाने २०१४ मध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेत जिल्ह्यात १४ हजार सिंचन विहिरी निर्माण करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्धता न झाल्याने या विहिरी रखडल्या. आता जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी विहिरींच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला असून, त्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आल्या आहे. त्यामुळे या विहिरी पूर्णत्वास जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करून २०१४ मध्ये १४ हजार धडक सिंचन विहिरी जिल्ह्यात निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने आणि तांत्रिक अडचणी आल्याने पात्र लाभार्थ्यांची नावे घोषित होण्यास विलंब झाला. परिणामी सिंचन विहिरींचे कामच रखडले. त्यामुळे या विहिरी पदरात पडतील अशी अपेक्षाच शेतकरी वर्गाने सोडून दिली होती. दरम्यान याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी प्रगतीपथावरील पात्र लाभार्थ्यांच्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली. ऐवढेच नव्हे तर पात्र लाभार्थ्यांच्या याद्यासुद्धा तलाठी, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, तहसीलदार, पंचायत समिती आदी ठिकाणी लाभार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. पात्र लाभार्थ्यांनी विहिरी पूर्णत्वास नेण्यासाठी रोजगार हमी योजनेचे ई-मस्टर यंत्रणेकडून प्राप्त करून घ्यावे आणि विहिरींची कामे तत्काळ पूर्ण करावी. पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी महिवाल यांनी कळविले आहे. त्यामुळे आता धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत रखडलेल्या विहिरी पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला. (स्थानिक प्रतिनिधी)