शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

माध्यमिक शिक्षणाधिकारी कक्षात विद्यार्थ्यांचा ठिय्या

By admin | Updated: July 22, 2016 02:15 IST

वणी येथे अकरावी प्रवेशाचा गुंता निर्माण झाल्याने गुरुवारी विद्यार्थ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत आंदोलन केले.

अकरावी प्रवेशाचा गुंता : विद्यार्थ्यांची प्रचंड नारेबाजी यवतमाळ : वणी येथे अकरावी प्रवेशाचा गुंता निर्माण झाल्याने गुरुवारी विद्यार्थ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत आंदोलन केले. प्रवेश मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. वणीतील दोनशे विद्यार्थ्यांना यंदा अकरावीमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. यंदा दहावीचा निकाल उत्तम लागला. अनेकांनी ८० टक्केपेक्षा अधिक गुण घेतले आहेत. मात्र, लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाने तब्बल ८४ टक्क्यांवरच प्रवेशप्रक्रिया ‘क्लोज’ केली आहे. या दोन्ही महाविद्यालयात अकरावीच्या अनुदानित तुकड्या आहेत. त्यामध्ये अनुक्रमे १२० आणि ८० असे दोनशे विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून महाविद्यालये सुरूही झाली आहेत. मात्र, अद्यापही दोनशे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. वणीत यंदा अकरावीच्या वाढीव तुकड्या मंजूर झाल्या. मात्र, त्या स्वयंअर्थसहायित तुकड्या आहेत. तेथे प्रवेश घ्यायचा असल्यास शुल्क भरावे लागते. मात्र, शेतकरी, शेतमजूरांची मुले शुल्क भरण्यासाठी असमर्थ आहेत. त्यामुळे आपल्यालाही मोफतच प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ५ जुलै रोजी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी लवकरच प्रवेश मिळेल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु, १५ दिवस लोटूनही मोफत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे गुरुवारी पुन्हा दोनशे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यवतमाळात आले. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी कक्षात ठिय्या दिला. ‘लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा’, ‘असा कसा मिळत नाही, भेटल्याशिवाय राहात नाही’ अशा नारेबाजीने शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक एकाच वेळी बोलत असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात एकच हलकल्लोळ उडाला होता. स्वप्नील धुर्वे, विकेश पानघाटे, अखील सातोकर, प्रवीण खानझोडे, वैभव डंभारे, संदेश तिखट आदींनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले. (स्थानिक प्रतिनिधी) याला फोन त्याला फोन...ऐकतो कोण? विद्यार्थी काही केल्या ऐकत नाही म्हटल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी विविध वरिष्ठांना फोन करून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला. मात्र, आता शुल्क भरण्याशिवाय या विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याचेच त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षांनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी फोन केला. बळीराजा चेतना अभियानातून, डीपीसीतून या विद्यार्थ्यांच्या शुल्काविषयी काही तजवीज करता येईल का, अशी विचारणा केली. मात्र, यावरही शिक्षणाधिकाऱ्यांना समाधानकारकरीत्या आश्वस्त करण्यात आले नाही. वणीतील अनुदानित तुकड्यांमधील जागा भरल्या आहेत. आता विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयाचे जे काही शुल्क असेल, ते विद्यार्थ्यांना भरावेच लागेल. त्याशिवाय दुसरा कोणताही तोडगा नाही. - चिंतामण वंजारी शिक्षणाधिकारी, यवतमाळ