शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

आर्णी बाजार समितीत रास्ता रोको

By admin | Updated: May 28, 2017 00:49 IST

तूर खरेदीच्याबाबतीत शासन उदासीनता दाखवत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

शेतकऱ्यांना लाठीमार : तुरी पाठोपाठ भुईमूग खरेदीचाही वांदा लोकमत न्यूज नेटवर्क आर्णी : तूर खरेदीच्याबाबतीत शासन उदासीनता दाखवत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यातच आता येथील बाजार समितीमध्ये भुईमूग खरेदीचेही वांदे झाल्याने शेतकऱ्यांनी शनिवारी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी संतप्त शेतकऱ्यांना लाठीने मारहाण केली. सध्या आर्णी बाजार समितीच्या आवारात भुईमुगाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परंतु त्या तुलनेत बाजार समितीकडून तातडीने खरेदीची प्रक्रिया केली जात नाही. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या खरेदीमुळे शेतकरी संतपलेले आहे. त्यातच शनिवारी सकाळी भुईमुगाची खरेदी अत्यल्प काळ चालली आणि नंतर मात्र बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. खरेदी सुरू करा या मागणीसाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन बराच वेळ झाला तरी शमण्याची चिन्हे नव्हती. त्यामुळे अखेर पोलीस ताफा आंदोलनस्थळी पोहोचला. शेतकऱ्यांची समजूत काढून रास्ता रोको आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी करून पाहिला. परंतु शेतकरी ऐकायला तयार नव्हते. अखेर शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी त्यांना लाठीने मारहाण केली. या लाठीहल्ल्यानंतरच वाहतूक सुरळीत करणे पोलिसांना शक्य झाले. बाजार समितीमध्ये तूर आणि भुईमूग मोठ्या प्रमाणात आल्याने मार्केट यार्डात आता जागाच शिल्लक नाही. खरेदी अत्यंत धिम्यागतीने होत आहे. व्यापारी वर्ग खरेदीसाठी इच्छुक दिसत नाही. त्यामुळे आर्णीतील परिस्थिती स्फोटक बनली आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांची बोलणी सुरू असून, उद्या रविवार असूनही खरेदी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे तहसीलदार सुधीर पवार यांनी सांगितले.