शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल राज्यमंत्र्यांनी गड राखला

By admin | Updated: February 24, 2017 02:32 IST

शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनाच सर्वकाही असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

दिग्रस मतदारसंघ : भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी चीत यवतमाळ : शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनाच सर्वकाही असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शिवसेनेने दारव्हा तालुक्यातील पाच, नेर तालुक्यातील तीन तर दिग्रस तालुक्यातील तीन अशा जिल्हा परिषदेच्या सर्व ११ जागा जिंकल्या आहेत. दिग्रस तालुक्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण माजी राज्यमंत्री संजय देशमुख काँग्रेस सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झाले. त्यामुळे दिग्रस तालुक्यात भाजपाला ‘परिवर्तन’ अपेक्षित होते. परंतु मतमोजणीच्या निकालाअंती हे ‘परिवर्तन’ भाजपासाठी फुसका बार ठरले. दिग्रसमधील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा सेनेने काबीज करीत भाजपाला धूळ चारली. देशमुखांना जिल्हा परिषदेची एकही जागा खेचून आणता न आल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे वजन घटल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. कालचा काँग्रेसचा, आजचा भाजपाचा संजय नव्हे तर शिवसेनेचाच संजय राजकारणात भारी असल्याचे राठोड यांनी दाखवून दिले आहे. दिग्रसच नव्हे तर नेर व दारव्हा तालुक्यातही शिवसेनेने अन्य कुणाला खाते उघडू दिले नाही. विद्यमान सभापती व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दिग्गजांना तेथे सेनेने पराभूत केले. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळातही शिवसेनेने जिल्हा परिषदेचे चार पैकी दोन जागांवर विजय मिळविला. या दोन जागा सेनेने भाजपाकडून खेचून आणत आपणच वरचढ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. पंचायत समित्यांमध्येसुद्धा शिवसेनेची सरशी राहिली. दिग्रसमध्ये सहा पैकी तीन, दारव्हामध्ये १० पैकी नऊ तर नेरमध्ये पंचायत समितीच्या सहा पैकी पाच जागा सेनेने जिंकल्या. संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपालाही चित केले. शिवसेनेकडून निवडणूक प्रचारासाठी कुणीही स्टार प्रचारक आले नव्हते. संजय राठोड यांनी खासदार भावनाताई गवळी व संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांच्यासह स्टार प्रचाराकाची भूमिका वठवून जिल्हा परिषदेत शिवसेनेला सर्वाधिक २० जागा मिळवून दिल्या. शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांनी पाटणबोरीपासून उमरखेडपर्यंत ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन शिवसैनिकांना ताकद दिली. प्रचारात त्यांची साथ लाभल्याने सेनेने जिल्हा परिषदेचा गड सहज सर केला.पालकमंत्री पद काढल्याने ना. राठोड यांनी हीच निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना शिवसैनिकांचीही तेवढीच समर्थ साथ लाभली. (जिल्हा प्रतिनिधी)