शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खरीप हंगामाची लगबग सुरू

By admin | Updated: May 20, 2015 00:23 IST

नवीन खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला आहे.

३० कोटींची उलाढाल : बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी लवकरच वणी : नवीन खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला आहे. पाऊसही लवकर येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यात ३० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस हे नगदी पीक घेतले जाते. गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना निसर्गाने दणका दिला. पहिल्या वर्षी अतिवृष्टी, तर मागीलवर्षी दुष्काळाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. तरीही शेतकरी नव्या उमेदीने नवीन खरीप हंगामाच्या तयारीत गुंतले आहेत. वणी तालुका कापसासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात उच्च दर्जाचा आणि लांब धाग्याचा कापूस निर्माण होतो. त्यासाठी शेतकरी कपाशीचे बियाणे खरेदी करतात. सोबतच मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आणि रासायनिक खतांचीही खरेदी करतात. वणी तालुक्यात जवळपास २६ हजारांच्यावर शेतकरी आहेत. ते सर्व प्रत्यक्ष अथवा मक्ता, बटईने शेती कसतात. ते बियाणे, खत, कीटकनाशके खरेदी करतात. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात जवळपास ३० कोटी रूपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. बियाणे, खत आणि किटकनाशक खरेदीवर ही सर्व रक्कम खर्च होते. खरिपात बियाणे, खत, रासायनिक खत खरेदीवर शेतकरी बांधव कोट्यवधींचा खर्च करतात. आता पावसाचे संकेत मिळत असल्याने शेतकरी आत्तापासूनच खते, बियाणे खरेदी करण्याचे नियोजन करण्यात गुंग आहेत. शेतकऱ्यांची शहरातील लगबग वाढली आहे. तालुका ठिकाणच्या कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. ऐन पेरणीच्या हंगामात बियाणे मिळणे कठीण जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सध्या बियाणे खरेदी सुरू केली. बियाणे, खते खरेदी करताना शेतकरी काळजी तर घेतातच. तरीही अनेकदा त्यांची फसगत होते. अनेकदा बियाणे उगवत नाही. पाऊस वेळेवर येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागते. त्यासाठी त्यांना जादा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यात निसर्ग वारंवार परीक्षा घेतो. तरीही बळीराजा एका दाण्याचे हजार दाणे करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतो. (कार्यालय प्रतिनिधी)शेतकरी वळले सोयाबीनकडे तालुक्यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. आता अनेक शेतकरी बांधव सोयाबीनकडेही वळले आहे. सोबतच खरिपात तूर, ज्वारी, मूग आदी पिकेही घेतली जातात. मात्र कापूस हेच नगदी पीक म्हणून परिचित आहे. आता सोयाबीनही नगदी पीक म्हूणन आता ओळखले जाऊ लागले आहे. बियाणे कंपन्यांची प्रचार मोहीम जोरातखरिपाची लगबग सुरू होताच अनेक बियाणे कंपन्यांनी कपाशीसह विविध पिकांचे बियाणे बाजारात विक्रीस आणले. त्यासाठी मोठ्या प्र्रमाणात प्रचार मोहीम राबविली जात आहे. त्यात कोणते बियाणे चांगले व कोणते बोगस, हे ओळखे कठीण झाले आहे. बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य शासनाने गुणनियंत्रण पथकाची नियुक्ती करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. या पथकात पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांसह काहींचा समावेश राहणार आहे. हे पथक शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त होताच संबंधित वाणांची चौकशी करतील. कृषी साहित्य बोगस असल्याचे आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करतील. ६० हजार हेक्टरवर खरिपाची लागवडवणी तालुक्यात ९२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र लागवडयोग्य आहे. त्यापैकी ६० हजार हेक्टरच्यावर क्षेत्रात खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक ३५ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची, तर १५ हजार हेक्टरवर सोयाबिनची पेरणी होण्याची शक्यता आहे. सोबतच तूर, ज्वारी व इतर पिके घेतली जाणार आहे. कापसाच्या लागवडीसाठी तालुक्यातील जमीन अत्यंत उपयुक्त आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच सोसायटीतर्फे पीक कर्जही उपलब्ध झाले आहे.