शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

स्थायी, बांधकामवर सदस्यांच्या उड्या

By admin | Updated: May 5, 2017 02:08 IST

जिल्हा परिषदेतील ‘मलाईदार’ विषय समितींवर वर्णी लागावी म्हणून सर्वपक्षीय मातब्बर सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्हा परिषद : विषय समित्यांसाठी स्पर्धा यवतमाळ : जिल्हा परिषदेतील ‘मलाईदार’ विषय समितींवर वर्णी लागावी म्हणून सर्वपक्षीय मातब्बर सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात स्थायी व बांधकाम समितीसाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. जिल्हा परिषदेत स्थायी समितीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ‘मिनी कॅबीनेट’ म्हणून या समितीची ओळख आहे. याच समितीत सर्व महत्त्वाचे विषय येतात. या समितीच्या मंजुरीनंतरच अनेक ठरावांना मूर्त रूप मिळते. त्यामुळे या समितीवर आपली वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी व विरोधी पक्षांतील वजनदार सदस्यांचे प्रयत्न सुरू आहे. मात्र प्रत्येकालाच ही समिती मिळणे कठीण असल्याने अनेकांनी आपल्या पक्षाच्या गॉडफादरकडे या समितीवर वर्णी लागावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थायी समितीवर प्रत्येक पक्षाचे जवळपास दोन सदस्य राहण्याची शक्यता आहे. यात खरी चुरस काँग्रेस सदस्यांमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसमधील अनेक इच्छुकांनी स्थायी समितीसाठी प्रयत्न चालविले आहे. मात्र अद्याप नेत्यांनी कुणालाही होकार दिला नाही. ऐनवेळी काँग्रेस नेते या समितीसाठी काँग्रेस सदस्यांची नावे सुचविण्याची शक्यता आहे. त्यानुसार निवड होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीत स्थान मिळत नसेल, तर किमान बांधकाम समिती तरी द्या म्हणून सर्वच पक्षातील सदस्यांनी पक्षाकडे तगादा लावला आहे. जिल्हा परिषदेत स्थायी आणि बांधकाम या दोन समित्या मलाईदार म्हणून ओळखल्या जातात. या दोन समितींवर वर्णी न लागल्यास सदस्यांची शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन समितीवर वर्णी लागणार आहे. तथापि खरी चुरस स्थायी व बांधकामसाठीच दिसून येत आहे. या समितींवर वर्णी लावून घेण्यात कोणते सदस्य यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी) पदाधिकाऱ्यांची खलबते मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात पदाधिकाऱ्यांची गुप्त खलबते झाली. त्यात स्थायी आणि बांधकाम समितीवर नेमके कुणाला घ्यायचे, याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची नावे जवळपास निश्चित आहे. मात्र काँग्रेसमध्ये अद्याप एकवाक्यता नाही. स्थायी समितीत कुणाला घ्यायचे, यावरून या पक्षात गटबाजी उफाळली आहे. ९ मे रोजी होणार विशेष सभा विषय समित्यांच्या गठनासाठी येत्या ९ मे रोजी विशेष सभा बोलविण्यात आली. यापूर्वी ८ मे रोजी सभा घेण्याचे ठरले होते. मात्र त्या दिवशी काही अधिकारी उपस्थित राहणार नसल्याने सभा एक दिवसाने पुढे ढकलली गेली. तत्पूर्वी हीच सभा ४ मे रोजी घेण्याचे निश्चत झाले होते. त्यावेळी विरोधकांनी सभा पुढे ढकलण्यास भाग पाडले. त्यांच्यापुढे गुडघे टेकवून सत्ताधाऱ्यांनी ती पुढे ढकलली. आता अधिकाऱ्यांसमोर नतमस्तक होऊन ती पुढे ढकलण्यात आली. यामुळे सत्ताधारी आपल्या निर्णयावर ठाम नसल्याचे स्पष्ट झाले. तीन पक्ष व अपक्षाची सत्ता असल्याने पदाधिकारी निष्प्रभ ठरत असल्याचे दिसून येत आहे.