शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

एसटी दरात १० टक्के कपात

By admin | Updated: November 24, 2015 05:24 IST

दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्याने वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्याने वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. मात्र, आता उत्पन्नात २४ टक्के वाढ झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने वाढविलेले तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दरात १० टक्के कपात करण्यात येणार आहे. तसे आदेश परिवहन विभागात धडकले आहेत.जिल्ह्यात सर्वाधिक नागरिक एसटीनेच प्रवास करतात. त्यामुळे तिकीट दरवाढीचा फटका सरळ सर्वसामान्य नागरिकांनाच बसला होता. राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीपूर्वी तिकीटदरात १० टक्के वाढ केली होती. ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ही तिकिट दरवाढ लागू झाली होती. दिवाळीच्या तोंडावर वाढलेल्या तिकिटदराने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. एसटीने दर वाढविताच खासगी वाहनांचेही दर वाढले होते. दिवाळीचा कालावधी संपताच परिवहन महामंडळाने नवा आदेश काढला आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांनी दर कमी करण्याच्या सूचना आहेत. यामुळे ४ नोव्हेंबरपूर्वीचेच तिकिटदर २६ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना यातून दिलासा मिळणार आहे. वणी, उमरखेडचे उत्पन्न वाढले४दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहन चालकांनी भाडे ३०० पटीने वाढविले होते. त्या तुलनेत एसटीचे दर कमी होते. यामुळे नागरिकांची पहिली पसंती राज्य परिवहन महामंडळाला होती. यातून एसटीचे उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढले. गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात परिवहन महामंडळाला दिवाळीच्या पर्वावर चार कोटी २८ लाख १९ हजारांचे उत्पन्न झाले होते. २०१५-१६ मध्ये दिवाळीच्या पर्वात परिवहन महामंळाला पाच कोटी २१ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षाच्या तुुलनेत उत्पन्नामध्ये २४ टक्केने वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६२ लाख २७ हजाराचे उत्पन्न वणी विभागाला मिळाले. त्या खालोखाल उमरखेड विभागाला ६२ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.पुणे बसला पहिली पसंती४पुणे बसफेऱ्या फायद्याच्या ठरल्या. ट्रॅव्हल्स चालकांनी दिवाळीच्या तोंडावर भाड्यात ३०० टक्क्यां वाढ केली होती. परिणामी विद्यार्थी आणि नागरिकांना ३५०० रूपये तिकिटासाठी मोजावे लागले होते. परिवहन महामंडळाने नियमित दरात प्रवाशांची बुकींग केली. यामुळे प्रवाशांचा लोंढा राज्य परिवहन महामंडळाकडे वळला होता.राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीच्या पर्वातच १० टक्के दरवाढ केली. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे. या विषयीचे आदेश धडकले आहेत. यामुळे जुन्या तिकिट दरात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.- शिवाजी जगताप विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ