शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी दरात १० टक्के कपात

By admin | Updated: November 24, 2015 05:24 IST

दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्याने वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्याने वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. मात्र, आता उत्पन्नात २४ टक्के वाढ झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने वाढविलेले तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दरात १० टक्के कपात करण्यात येणार आहे. तसे आदेश परिवहन विभागात धडकले आहेत.जिल्ह्यात सर्वाधिक नागरिक एसटीनेच प्रवास करतात. त्यामुळे तिकीट दरवाढीचा फटका सरळ सर्वसामान्य नागरिकांनाच बसला होता. राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीपूर्वी तिकीटदरात १० टक्के वाढ केली होती. ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ही तिकिट दरवाढ लागू झाली होती. दिवाळीच्या तोंडावर वाढलेल्या तिकिटदराने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. एसटीने दर वाढविताच खासगी वाहनांचेही दर वाढले होते. दिवाळीचा कालावधी संपताच परिवहन महामंडळाने नवा आदेश काढला आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांनी दर कमी करण्याच्या सूचना आहेत. यामुळे ४ नोव्हेंबरपूर्वीचेच तिकिटदर २६ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना यातून दिलासा मिळणार आहे. वणी, उमरखेडचे उत्पन्न वाढले४दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहन चालकांनी भाडे ३०० पटीने वाढविले होते. त्या तुलनेत एसटीचे दर कमी होते. यामुळे नागरिकांची पहिली पसंती राज्य परिवहन महामंडळाला होती. यातून एसटीचे उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढले. गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात परिवहन महामंडळाला दिवाळीच्या पर्वावर चार कोटी २८ लाख १९ हजारांचे उत्पन्न झाले होते. २०१५-१६ मध्ये दिवाळीच्या पर्वात परिवहन महामंळाला पाच कोटी २१ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षाच्या तुुलनेत उत्पन्नामध्ये २४ टक्केने वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६२ लाख २७ हजाराचे उत्पन्न वणी विभागाला मिळाले. त्या खालोखाल उमरखेड विभागाला ६२ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.पुणे बसला पहिली पसंती४पुणे बसफेऱ्या फायद्याच्या ठरल्या. ट्रॅव्हल्स चालकांनी दिवाळीच्या तोंडावर भाड्यात ३०० टक्क्यां वाढ केली होती. परिणामी विद्यार्थी आणि नागरिकांना ३५०० रूपये तिकिटासाठी मोजावे लागले होते. परिवहन महामंडळाने नियमित दरात प्रवाशांची बुकींग केली. यामुळे प्रवाशांचा लोंढा राज्य परिवहन महामंडळाकडे वळला होता.राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीच्या पर्वातच १० टक्के दरवाढ केली. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे. या विषयीचे आदेश धडकले आहेत. यामुळे जुन्या तिकिट दरात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.- शिवाजी जगताप विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ