शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

फवारणी उलटतेय शेतकºयांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:00 IST

किडींच्या नियंत्रणासाठी अतिजहाल विषाची फवारणी आता शेतकरी आणि मजुरांच्या जीवावर उलटत आहे.

ठळक मुद्देतिघांचा मृत्यू : २२८ जणांना विषबाधा

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : किडींच्या नियंत्रणासाठी अतिजहाल विषाची फवारणी आता शेतकरी आणि मजुरांच्या जीवावर उलटत आहे. तीन महिन्यात तिघांचा मृत्यू झाला तर २२८ जणांना विषबाधा झाली. ही आकडेवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची असून खासगी रुग्णालयातही अनेकांनी उपचार घेतल्याने हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.गत काही वर्षांपासून कपाशी आणि सोयाबीनवर किडींचे मोठ्या प्रमाणात आक्रमण होते. यामुळे संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी ना-ना उपाय योजतात. त्यातील प्रभावी उपाय म्हणजे कीटकनाशकांची फवारणी होय. पीक वाचविण्यासाठी अतिप्रवाही कीटकनाशकांची शेतकºयांकडून फवारणी केली जाते. परंतु फवारणी करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब होत नसल्याने शेतकºयांच्या जीवावर बेतत आहे. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तब्बल २२८ शेतकºयांना फवारणीतून विषबाधा झाल्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोंद आहे. यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अनेक शेतकºयांनी खासगी रुग्णालयात आणि गावाजवळील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहे. जुलै महिन्यात १६ शेतकरी तर आॅगस्टमध्ये तब्बल १२९ शेतकºयांना विषबाधा झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक ८३ शेतकरी विषबाधेच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहे. किडींचा प्रादूर्भाव वाढताच विषबाधेच्या संख्येतही वाढ झाली आहे. दरदिवशी तब्बल आठ ते दहा शेतकरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत.फवारणी करताना अनेकदा शेतकरी आणि मजूर योग्य काळजी घेत नाही. बरेचदा हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी केली जाते. पंपाचे नोझल दूर धरले जात नाही. फवारणी करताना विषाचे मिश्रण अंगावर पडते. त्यामुळे कपडे ओले होऊन घामाद्वारे विषाचा संसर्ग शरीरात होतो. परिणामी विषबाधा होते. फवारणी करताना कोणताही मजूर तोंडाला मास्क बांधत नाही. अनेकदा तंबाखू व इतर पदार्थही हात न धुताच खाल्ले जातात. त्यातूनही विषबाधेचे प्रमाण वाढते. अनेकदा डोळ्यात विष उडून डोळे निकामी होण्याचीही भीती असते. यामुळे शेतकरी आणि शेतमजुरात भीतीचे वातावरण आहे.फवारणी करताना डोळे निकामीगुंज : महागाव तालुक्यातील हिवरदरी येथील शेतकºयाच्या डोळ्यात फवारणी करताना विष गेल्याने दोनही डोळे गमावण्याची वेळ आली आहे. रमेश पवार असे या शेतकºयाचे नाव आहे. कपाशीवर कीटकनाशकाची फवारणी केली. हवेच्या झोताने कीटकनाशक डोळ्यात गेले. त्याला पुसदच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचे दोनही डोळे निकामी झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे तीन एकर शेती असून संपूर्ण कुटुंबच त्याच्यावर अवलंबून आहे.‘स्टीकर’ ठरतेय घातक४कीड नियंत्रणासाठी कीटकनाशक अधिक काळ झाडावर टिकून रहावे म्हणून स्टीकरचे मिश्रण कीटकनाशकासोबत फवारले जाते. स्टीकरमुळे विष झाडावर अधिक काळ टिकून राहते. तसेच विशिष्ट प्रमाणात पसरतही जाते. मात्र हेच स्टीकर शेतकºयांनी घातक ठरत आहे. कीटकनाशक आणि स्टीकरचे मिश्रण फवारणी करताना विषाचे थेंब हातावर पडतात. स्टीकर मिसळलेले असल्याने शरीरावर पसरुन त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. हात धुतल्यानंतरही ते निघत नाही. यातूनच विषबाधा होते.सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्वचेतून विषबाधा झालेले रुग्ण दाखल होत आहे. फवारणी करताना योग्य काळजी घेण्याची गरज आहे. फवारणीच्या काळात कोणत्याही वस्तूचे सेवन करू नये. पिण्याच्या पाण्याचे भांडे वेगळे ठेवावे. कीटकनाशकाचे मिश्रण करताना हॅन्डग्लोज वापरावे. त्यामुळे विषबाधेचे प्रमाण कमी होते.- डॉ.बाबा येलकेविभाग प्रमुख (मेडिसीन) मेडिकल कॉलेज, यवतमाळ