शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कॅन्सर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: March 19, 2015 02:06 IST

कॅन्सरकडे दुर्लक्ष केल्यास आजाराची तीव्रता वाढते. या आजाराचे चार टप्पे आहेत. मात्र ‘झिरो स्टेज’ हासुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

यवतमाळ : कॅन्सरकडे दुर्लक्ष केल्यास आजाराची तीव्रता वाढते. या आजाराचे चार टप्पे आहेत. मात्र ‘झिरो स्टेज’ हासुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अर्थात यासाठी नियमित संपूर्ण आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे, असे डॉ. अजय मेहता यांनी सांगितले. निदान झाल्यास कॅन्सरवर तत्काळ नियंत्रण मिळविणे सहज शक्य होते. ‘झिरो स्टेज’मधील कॅन्सर १०० टक्के बरा होतो. कॅन्सरबाबत दक्षता, जनजागृती तेवढीच महत्त्वाची आहे. कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नाही. कॅन्सरला वयाचे बंधन नाही. तो आबालवृद्धांपैकी कुणालाही होवू शकतो. अनुवांषिकतेनेसुद्धा तो नव्या पिढीच्या शरीरात प्रवेश करू शकतो. वाढत्या वयानुसार कॅन्सरही वाढत जातो. त्यात तंबाखु सेवन करणारे आणि महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. मुलींकरिता प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. पूर्वी ती नऊ हजार रुपयात मिळत होती. मात्र आता सरकारने काही अनुदान दिल्याने त्याची किंमत तीन हजार रुपये (तीन इंजेक्शन) झाली आहे. मात्र ही लस शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. पर्यायाने बीपीएलधारकांना ती मोफत अथवा सवलतीने मिळत नाही. कीटकनाशकांच्या अतिवापराचा दुष्परिणाम मानवी शरीरावर होत असून त्यामुळे कॅन्सरच नव्हे तर सर्वच आजार उत्पन्न होत असल्याचे डॉ. मेहता यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी महिला व नागरिकांच्या प्रश्नांना डॉ. मेहता यांनी दिलखुलास उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे समाधान केले. त्यानंतर रुग्ण तपासणी करण्यात आली. ज्योत्स्ना दर्डा यांना आदरांजली अर्पण करून शिबिराला सुरूवात झाली. प्रास्ताविक जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले. विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात डॉ. संजय दर्डा व डॉ. अनिता दर्डा प्रत्येक रविवारी बुटीबोरी येथे रुग्णांची आरोग्य तपासणी करीत असल्याचे आवर्जून सांगितले. (शहर वार्ताहर)