शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सभापतींनी पांघरले घोंगडे

By admin | Updated: March 9, 2017 00:08 IST

बाजार समित्यांमध्ये तूर साठवणुकसाठी बारदाना उपलब्ध नसल्याने बुधवारी जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी पोत्यांचे घोंगडे घालून

बारदान्यासाठी आंदोलन : व्यापाऱ्यांचे हित जोपासले जात असल्याचा आरोप यवतमाळ : बाजार समित्यांमध्ये तूर साठवणुकसाठी बारदाना उपलब्ध नसल्याने बुधवारी जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी पोत्यांचे घोंगडे घालून अभिनव आंदोलन केले. त्यांनी प्रशासनाला दोन दिवसांत बारदाना उपलब्ध करून देण्याचा अल्टीमेटम निवेदनाव्दारे दिला. शेवटच्या दान्यापर्यंत तुरीची खरेदी करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असली, तरी जिल्ह्यात काही केंद्रांवर गेल्या सहा दिवसांपासून बारदान्याअभावी तूर खरेदी ठप्प पडली आहे. यामुळे संतप्त सभापतींनी येथील तिरंगा चौकात आंदोलन केले. त्यांनी राज्य शासनाचा निषेध केला. येत्या दोन दिवसात प्रश्न न सुटल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला. पोत्यांची घोंगडी पांघरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासकीय तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली आहे. ३० हजार क्विंटलपेक्षा जादा तूर १५ केंद्रांवर खरेदीच्या प्रतीक्षेत पडून आहे. मात्र सहा दिवसांपासून बारदाना पोहोचला नाही. खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. राज्य शासनाला त्याची चिंता नाही. बारदाना निघाला, अशी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा, तसेच राज्य शासनाने व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठीच बारदान्याचे नाटक केल्याचा आरोप सभापतींनी केला. सरकार केवळ बोलघेवडे असून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याचा घणाघातही त्यांनी केला. नाफेडच्या केंद्रांना केवळ १५ मार्चपर्यंत तूर खरेदी करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे. त्यांना न्याय देण्याची मागणी सभापतींनी केली. या आंदोलनात कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, मारेगावचे नरेंद्र ठाकरे, यवतमाळचे रवींद्र ढोक, बाभूळगावचे नरेंद्र कोंबे, आर्णीचे राजेश पाटील, घाटंजी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, पणनचे संचालक सुरेश चिंचोळकर, मसंद्र घुरडे, अरूणा खंडाळकर, छायाताई शिर्के, दिनेश गुल्हाने, अमोल कापसे, शाम जगताप, समीर घारफळकर, अनिल गायकवाड आदी सहभागी झाले. (शहर वार्ताहर) शेतकऱ्यांच्याच पोत्यात तूर खरेदी करावी गोंदिया व भंडारा येथील शासकीय केंद्रांवर नाफेडचे पोते पडून आहे. ते येथे आणावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या पोत्यातच तूर खरेदी करावी, अशी मागणी बाजार समिती सभापतींनी केली. ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना झिरो टक्के व्याज आकारणी होते. मात्र तुरीचा चुकारा मिळत नसल्याने शेतकऱ्याना कर्जाचे परतफेड करणे अशक्य झाले आहे. त्यातच बँकांनी वसुलीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कर्ज परतफेडीची मुदत वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दान्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन पाळावे, तत्काळ चुकारे द्यावे, बारदाना व जागेचा प्रश्न दोन दिवसात सोडवावा, असा अल्टीमेटमही देण्यात आला.