शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन, कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 24, 2014 23:47 IST

यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़

नांदेपेरा : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ कपाशीवर दुधाळ, पांढरी माशी, मर्ग यांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रोग आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे़ शिवाय पावसाअभावी सोयाबीन हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ अगोदरच शेतकरी दुबार-तिबार पेरण्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या जवळील पैसा खर्च झाला आहे. परिणामी या रोगांना नियंत्रण आणण्याकरिता किटकनाशके कसे खरेदी करावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.कपाशी, सोयाबिनला जगविण्यासाठी किटकनाशके खरेदी करावे, की पोळा सण साजरा करावा, अशा विवंचनेत शेतकरी भरडले जात आहे. तरीही सणासाठी जमा केलेले पैसे शेतकरी किटकनाशक खरेदीसाठी वापरत आहे़ यामुळे शेतकऱ्यांचा महत्वाचा सण यावर्षी कोरडाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे़ पिकांचे रोगांपासून संरक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली जाते. पर्यायी पीक म्हणून कपाशीसोबत सोयाबीनचीही लागवड केली जाते. सोयाबिनचे पीक दिवाळी साजरी करण्यासाठी उपयोगी पडते, असा शेतकऱ्यांचा समज आहे़ परंतु यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाला अजूनपर्यंत फुलेसुध्दा लागली नाही़ त्यामुळे अळीने आक्रमण केले असून झाडे रिकामी होत आहे़ काही शेतांतील सोयाबीन पूर्णत: नष्ट झाले आहे़ कृषी विभागामार्फत अनुदानावर कोणत्याही प्रकारचे किटकनाशक पुरविले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे़ शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नही उभा ठाकला आहे़ पाऊस आज ना उद्या पडेल, या आशेने शेतकरी चातकासारखे आकाशाकडे टक लावून पावसाच्या प्रतीक्षेत आहे़ परंतु बळीराजा संकटात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन सुस्तच असल्याचे दिसून येत आहे़ कृषीप्रधान देशात शेतकरी संकटात असताना कोणत्याही सामाजिक संस्थाही त्यांना आर्थिक मदत देण्यास समोर येताना दिसून येत नाही़ शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने बाजारपेठही थंडावल्या आहे़ (वार्ताहर)