शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सोयाबीन, कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 24, 2014 23:47 IST

यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़

नांदेपेरा : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ कपाशीवर दुधाळ, पांढरी माशी, मर्ग यांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रोग आल्याने शेतकरी संकटात सापडले आहे़ शिवाय पावसाअभावी सोयाबीन हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ अगोदरच शेतकरी दुबार-तिबार पेरण्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या जवळील पैसा खर्च झाला आहे. परिणामी या रोगांना नियंत्रण आणण्याकरिता किटकनाशके कसे खरेदी करावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.कपाशी, सोयाबिनला जगविण्यासाठी किटकनाशके खरेदी करावे, की पोळा सण साजरा करावा, अशा विवंचनेत शेतकरी भरडले जात आहे. तरीही सणासाठी जमा केलेले पैसे शेतकरी किटकनाशक खरेदीसाठी वापरत आहे़ यामुळे शेतकऱ्यांचा महत्वाचा सण यावर्षी कोरडाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे़ पिकांचे रोगांपासून संरक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली जाते. पर्यायी पीक म्हणून कपाशीसोबत सोयाबीनचीही लागवड केली जाते. सोयाबिनचे पीक दिवाळी साजरी करण्यासाठी उपयोगी पडते, असा शेतकऱ्यांचा समज आहे़ परंतु यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकाला अजूनपर्यंत फुलेसुध्दा लागली नाही़ त्यामुळे अळीने आक्रमण केले असून झाडे रिकामी होत आहे़ काही शेतांतील सोयाबीन पूर्णत: नष्ट झाले आहे़ कृषी विभागामार्फत अनुदानावर कोणत्याही प्रकारचे किटकनाशक पुरविले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे़ शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नही उभा ठाकला आहे़ पाऊस आज ना उद्या पडेल, या आशेने शेतकरी चातकासारखे आकाशाकडे टक लावून पावसाच्या प्रतीक्षेत आहे़ परंतु बळीराजा संकटात असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन सुस्तच असल्याचे दिसून येत आहे़ कृषीप्रधान देशात शेतकरी संकटात असताना कोणत्याही सामाजिक संस्थाही त्यांना आर्थिक मदत देण्यास समोर येताना दिसून येत नाही़ शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने बाजारपेठही थंडावल्या आहे़ (वार्ताहर)