शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

स्वानंदाच्या कार्यातूनच समाजसेवा घडते

By admin | Updated: August 13, 2014 00:00 IST

इतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील

रवींद्र आणि स्मिता कोल्हे : ‘आम्ही बी-घडलो, तुम्ही बी-घडाना’ उपक्रमकाशीनाथ लाहोरे - यवतमाळइतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी येथे केले. ‘प्रयास’ यवतमाळच्यावतीने आयोजित ‘आम्ही बी-घडलो, तुम्ही बी-घडाना’ या उपक्रमांतर्गत येथील महेश भवन येथे झालेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. भान ठेवून योजना आखाण्यात आणि बेभान होऊन काम करावे. या बाबा आमटेच्या शिकवणीनुसार काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर परतीचे दोर निग्रहाने कापून टाकावे लागतात. आज देशासाठी विचारपूर्वक जगण्याची गरज असून, सेवाभावी माणसांची मेळघाटला आजही गरज आहे. यापुढे कुपोषितांसाठी काम करणाऱ्यांना आमची शेती हेलिपॅडसारखी उपयोगी पडणारी असेल. तरूणांनी या कामात झोकून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपल्या शेतीचे आम्ही मालक नसून ट्रस्टी आहेत, नोकर आमचे सहकारी आहेत, या विश्वासाने आम्ही कार्य करतो म्हणून यशस्वी झालो असे ते म्हणाले. यावेळी डॉ. उल्हास जाजू, करूणाताई फुटाणे, शेषरावजी डोंगरे, शंकर बडे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विजय देशपांडे, उपस्थित होते. मृणालिनी चितळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिताने हसतखेळत उत्तरे दिली. अनेक थरारक अनुभवही त्यांनी सांगितले. बैरागड सारख्या दुर्गम ठिकाणी काम करताना येणाऱ्या अडचणी चित्तथराक होत्या. आपल्या लगनची गोष्ट स्मितातार्इंनी मनोरंजक पद्धतीने सांगून वातावरण मोकळे केले. लग्नासाठी ठेवलेल्या चार अटीत स्वधर्म दडलेला आहे, असे जाणवल्यामुळेच मी त्यांच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला असेही त्यांनी सांगितले. स्वत:वर बेतले की माणसे तत्व बाजूला ठेवून वागतात मात्र कोल्हे परिवाराने कथनी आणि करणी यात साम्य ठेवल्याने सर्वांचा विश्वास संपादित करण्यात त्यांना यश आले असेही नम्रपणे त्यांनी सांगितले.