शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

स्वानंदाच्या कार्यातूनच समाजसेवा घडते

By admin | Updated: August 13, 2014 00:00 IST

इतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील

रवींद्र आणि स्मिता कोल्हे : ‘आम्ही बी-घडलो, तुम्ही बी-घडाना’ उपक्रमकाशीनाथ लाहोरे - यवतमाळइतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी येथे केले. ‘प्रयास’ यवतमाळच्यावतीने आयोजित ‘आम्ही बी-घडलो, तुम्ही बी-घडाना’ या उपक्रमांतर्गत येथील महेश भवन येथे झालेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. भान ठेवून योजना आखाण्यात आणि बेभान होऊन काम करावे. या बाबा आमटेच्या शिकवणीनुसार काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर परतीचे दोर निग्रहाने कापून टाकावे लागतात. आज देशासाठी विचारपूर्वक जगण्याची गरज असून, सेवाभावी माणसांची मेळघाटला आजही गरज आहे. यापुढे कुपोषितांसाठी काम करणाऱ्यांना आमची शेती हेलिपॅडसारखी उपयोगी पडणारी असेल. तरूणांनी या कामात झोकून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपल्या शेतीचे आम्ही मालक नसून ट्रस्टी आहेत, नोकर आमचे सहकारी आहेत, या विश्वासाने आम्ही कार्य करतो म्हणून यशस्वी झालो असे ते म्हणाले. यावेळी डॉ. उल्हास जाजू, करूणाताई फुटाणे, शेषरावजी डोंगरे, शंकर बडे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विजय देशपांडे, उपस्थित होते. मृणालिनी चितळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिताने हसतखेळत उत्तरे दिली. अनेक थरारक अनुभवही त्यांनी सांगितले. बैरागड सारख्या दुर्गम ठिकाणी काम करताना येणाऱ्या अडचणी चित्तथराक होत्या. आपल्या लगनची गोष्ट स्मितातार्इंनी मनोरंजक पद्धतीने सांगून वातावरण मोकळे केले. लग्नासाठी ठेवलेल्या चार अटीत स्वधर्म दडलेला आहे, असे जाणवल्यामुळेच मी त्यांच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला असेही त्यांनी सांगितले. स्वत:वर बेतले की माणसे तत्व बाजूला ठेवून वागतात मात्र कोल्हे परिवाराने कथनी आणि करणी यात साम्य ठेवल्याने सर्वांचा विश्वास संपादित करण्यात त्यांना यश आले असेही नम्रपणे त्यांनी सांगितले.