शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
4
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
5
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
6
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
7
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
8
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
9
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
10
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
11
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
12
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
13
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
14
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
15
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
16
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
17
Priya Bapat: "छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
18
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
19
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
20
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!

जलयुक्त शिवार अभियानात लहान कामे अपेक्षित नाही

By admin | Updated: August 1, 2015 03:47 IST

जलयुक्त शिवार अभियानातून अतिशय छोटी कामे अपेक्षित नाही. यामधून मोठी आणि अधिक शेतकऱ्यांना फायदा देणारी कामे घेणे आवश्यक आहे.

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानातून अतिशय छोटी कामे अपेक्षित नाही. यामधून मोठी आणि अधिक शेतकऱ्यांना फायदा देणारी कामे घेणे आवश्यक आहे. यासोबतच नवीन सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे घेण्यापेक्षा जुन्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीची कामे प्राधान्याने घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गुरूवारी दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवाय अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, रोहयो उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, लघु सिंचन स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता कुंभारे यांच्यासह जलयुक्त यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियान लहान कामांसाठी नाही. अशी कामे नियमित निधीतून केली जावू शकतात. अभियानातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अधिक फायदा देणारी कामे अपेक्षित आहे. त्यामुळे लहान कामे घेऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी बरेच सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले. जुनेही अनेक बंधारे आहेत. नवीन बंधारे प्रस्तावित करण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याच्या कामांसह दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य द्या. जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीचे नादुरूस्त बंधारे अभियानातून पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. यावर्षीच्या पावसामुळे बंधारे पाण्याने भरले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यातील गाळ काढणे सद्या शक्य नाही. मात्र डिसेंबरमध्ये बंधाऱ्यात पाणी राहण्याची शक्यता कमीच असते. अशा यावर्षी बांधलेल्या किंवा जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सदर कामे जलयुक्त सोबतच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतूनसुद्धा घेता येणार असल्याने त्यांचे प्रस्ताव तयार ठेवण्यात यावे. जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग फार महत्वाचा आहे. त्यासाठी जनजागृतीवर भर देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात याव्या. या स्पर्धेत चांगला सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्याबाबतही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त अभियानाशी संबंधीत सर्व यंत्रणांचा काम व तालुकानिहाय आढावा घेतला. त्यात कृषी विभाग, वन विभाग, लघु सिंचन स्थानिक स्तर, जिल्हा परिषद सिंचन विभाग, पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्व्हेक्षण विभाग आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)