शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

जलयुक्त शिवार अभियानात लहान कामे अपेक्षित नाही

By admin | Updated: August 1, 2015 03:47 IST

जलयुक्त शिवार अभियानातून अतिशय छोटी कामे अपेक्षित नाही. यामधून मोठी आणि अधिक शेतकऱ्यांना फायदा देणारी कामे घेणे आवश्यक आहे.

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानातून अतिशय छोटी कामे अपेक्षित नाही. यामधून मोठी आणि अधिक शेतकऱ्यांना फायदा देणारी कामे घेणे आवश्यक आहे. यासोबतच नवीन सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे घेण्यापेक्षा जुन्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीची कामे प्राधान्याने घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी गुरूवारी दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवाय अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, रोहयो उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, लघु सिंचन स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता कुंभारे यांच्यासह जलयुक्त यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियान लहान कामांसाठी नाही. अशी कामे नियमित निधीतून केली जावू शकतात. अभियानातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अधिक फायदा देणारी कामे अपेक्षित आहे. त्यामुळे लहान कामे घेऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर्षी बरेच सिमेंट नाला बंधारे बांधण्यात आले. जुनेही अनेक बंधारे आहेत. नवीन बंधारे प्रस्तावित करण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याच्या कामांसह दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य द्या. जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीचे नादुरूस्त बंधारे अभियानातून पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. यावर्षीच्या पावसामुळे बंधारे पाण्याने भरले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यातील गाळ काढणे सद्या शक्य नाही. मात्र डिसेंबरमध्ये बंधाऱ्यात पाणी राहण्याची शक्यता कमीच असते. अशा यावर्षी बांधलेल्या किंवा जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सदर कामे जलयुक्त सोबतच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतूनसुद्धा घेता येणार असल्याने त्यांचे प्रस्ताव तयार ठेवण्यात यावे. जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग फार महत्वाचा आहे. त्यासाठी जनजागृतीवर भर देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात याव्या. या स्पर्धेत चांगला सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्याबाबतही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त अभियानाशी संबंधीत सर्व यंत्रणांचा काम व तालुकानिहाय आढावा घेतला. त्यात कृषी विभाग, वन विभाग, लघु सिंचन स्थानिक स्तर, जिल्हा परिषद सिंचन विभाग, पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्व्हेक्षण विभाग आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)